हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं गं... पण!
हे सगळं बोलायचं होतं तुझ्याशी! पण बोलताना गहिवरून येतं आणि दुसरं म्हणजे भावना नीट पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत, वक्तृत्वाची उत्कृष्ट पातळी गाठूनही कदाचित तुझंच नीट लक्ष नसलं तर त्या संवादाला फाटे फुटतात असाही एक अनुभव आहे गाठीशी! मग ते पोहोचतं पार पहिल्यापासूनच्या संदर्भांपर्यंत आणि हिशोब करत करत आत्तापर्यंत पुढे यायचं आणि शेवटी पर्याय नसल्याने पुन्हा जुळवून घ्यायचं या नेहमीच्या पायर्या चढल्या की नवीन असमाधानांना जागा मिळण्यासाठी मन मोकळे होते, इतकेच फक्त मिळते त्यातून. पण मला तितकेच नको आहे आज.