नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान

रेहान - कव्हर पेज

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

रेहान : कादंबरी.

लेखिका: नंदिनी देसाई.

छायाचित्रः जिप्सी (योगेश जगताप) आणि नदीम शेख.

कव्हर पेज डीझाईनः प्राजक्ता पटवे-पाटील.

मायबोलीवर मी लिहिलेली मोरपिसे ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तब्बल चार वर्षे लावली होती ती कादंबरी पूर्ण करायला. मात्र, इतक्या तुकड्या तुकड्यांतून लिहिताना कथानक भरकटलं होतं, परिणामी तेच कथानक व्यवस्थित मोट बांधून विस्तारित स्वरूपामध्ये लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित करत आहे.

मायबोलीकरांनी कायमच माझ्या लेखनाला उत्तम प्रोत्साहन दिलेले आहे, आता या नवीन प्रकल्पासाठीदेखील असेच प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा.

विषय: 
प्रकार: 

पीके पीके!!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

१. लेख माझ्या रंगीबेरंगी पानावर आहे. चित्रपट ग्रूपमध्ये नाही.
२. चित्रपट पाहूनअमला काय वाटलं ते लिहिलं आहे. परीक्षण किम्वा समीक्षण नाही.
३. फॅन्स कुणाचेही असा, इथे प्रतिसाद देताना केवळ सिनेमाबद्दलच बोला. (आमिर सलमान शाहरूख तुषार फरदीन किशन कुमार ज्ञानेंद्र चौधरी यांच्या तुलना करायच्या असतील तर वेगळा बीबी शोधा)

/////////////////////////////////////////////

विषय: 
प्रकार: 

दरवाजा भाग ७

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

“नाही, असिफ. आज जोपर्यंत माझ्या मनात काय आहे ते तुला सांगत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही... गेल्या पंधर्रा वर्षातील प्रत्येक क्षणाचा हिशोब तुला दिल्याखेरीज मी आज जाणार नाही....”

“मला काहीही ऐकायचं नाहिये. रेश्मा, मी आता शेवटचं सांगतो... प्लीज इथून जा” असिफ तिच्याकडे पाठ वळवून खुर्चीमध्ये बसला

“असिफ, एकदा फक्त मला बोलू देत.. फक्त एकदा. ऐकून घे”

असिफनं पुढ्यातलं स्केचबूक उघड्लं. काहीही गरज नसताना पांढर्‍य़ा कागदावर निळ्या पेन्सिलीनं रेघोट्या काढत बसला. रेश्मा दोन मिनिटं शांतपणे बसून राहिली.

प्रकार: 
शब्दखुणा: 

दरवाजा (भाग ६)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

“अरे सुन, आज शाम को आयेगा ना?” बाहेर निघालेल्या असिफला मिथुननं हाक मारली.

“पता नही” त्यानं मागं वळूनदेखील न पाहता उत्तर दिलं. पण मिथुन ऐकण्यातला नव्हता, तो असिफकडेच धावत आला. “ऐसा मत कर! साला, आजकी पार्टी मे तो आ जाओ. बघ, आज आपल्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणच नसेल.” मिथुन दोन्ही हात फैलावून फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला. “ये देखो.. अनारकली का ताजमहाल! पुरे २ करोडका. आज हम इसे तोडेंगे, तो पार्टी तो बनती है ना?”

प्रकार: 
शब्दखुणा: 

दुपार

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गणपतीपुळ्यामध्ये दर्शन घेऊन परत निघाले. येताना आपल्या जुन्या कॉलेजवरून जाता यावं आणि जरा वेगळा रस्ता म्हणून माझ्या घराला जवळ पडणारा निवळीचा हायवे न पकडता चाफ़्याकडून शिरगांवला जाणारा रस्ता पकडला. मे महिन्यातली दुपारची टळटळीत वेळ. खरंतर मे महिना म्हणजे आमच्या गावाकडे पूर्वी आंबे काजू फ़णसाचा आणि त्याचबरोबर चाकरमान्यांच्या पाहुणचाराचा महिना. पण हल्ली हाच महिना “टूरीस्ट सीझन” असतो. कुठून कुठून लोकं “कोकण फ़िरायला” म्हणून येतात. इथल्या समुद्राची, निसर्गाची आणि माशांची अप्रूपाने स्तुती करतात. स्थानिक बापडे त्यांची निव्वळ मजा बघत असतात. त्यांना या कशाचं काहीही कौतुक नसतंच.

प्रकार: 

महाबलिपुरम (भाग ३)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाबलिपुरमचे अजून एक वैशीष्ट्य असलेले हे शोअर टेम्पल. असे म्हणतात की पूर्वी ही अशी एकसारखी सात देवळे होती म्हणून महाबलिपुरमला "सेव्हन पॅगोडा" असे म्हटले जायचे. सध्या त्यापैकी ही दोनच मंदिरे शिल्लक आहे.
ही मंदिरे पल्लव राजा नरसीम्हराय याच्या काळात बांधली गेली.

हिंदीमधे बोर्ड लिहायलाच हवा का? घ्या एकदाचा!!!!! Proud

विषय: 

महाबलिपुरम (भाग २)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आता हे प्रमुख आकर्षण
अर्जुनाची तपश्चर्या किंवा गंगेचे आगमन.

माझ्या कॅमेरामधे याचा पूर्ण पॅनोरमा शॉट घेता आला नाही, लांब जाऊन शॉट घेणे शक्य नव्हतं कारण इथे प्रचंड ट्राफिक होतं. पूर्वी हे अर्धं शिल्प वाळूमधे गाडलेले होते. काही दशकांपूर्वी पूर्ण उत्खनन करून काढलेले आहे. पूर्ण शिल्प विकीपीडीया पेजवरती आहे. हे शिल्पदेखील अर्धवट स्थितीमधेच आहे, मात्र जेवढे खोदलेले आहे तेवढे मात्र अप्रतिम आहे:

हा हिमालयाचा देखावा असून मधल्या खोबणीमधे गंगा अवतीर्ण होताना दिसत आहे. आजूबाजूला यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा वगैरे दिसत आहेत.

विषय: 

महाबलिपुरम (भाग १)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाबलिपुरम म्हणजेच मामल्लापुर हे चेन्नईपासून ६० किमी अंतरावर असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. पल्लव राजघराण्यामधे हे शहर एक विकसित बंदर होते आणि इथून बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडच्या देशाशी व्यापार केला जात होता. तमिळमधे याच शहराला कौतुकाने "कडल मल्लै" म्हटले जाते (समुद्र टेकडी).

इथे असलेली बरीचशी शिल्पे ही खोदकाम करून बनवण्यात आली आहेत. (रॉक कट). यापैकी अर्जुनाची तपश्चर्या हे एकाच दगडात खोदलेले भव्य बास रीलीफ (मराठी शब्द सांगा) हे इथले एक प्रमुख आकर्षण आहे. ही बहुतेक शिल्पे सातव्या ते नवव्या शतकामधे खोदलेली आहेत. संपूर्ण शिल्पांवर महाभारताचा प्रभाव जाणवत राहतो.

विषय: 

स्लॅमबूक

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भाग मिल्खा भाग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

चित्रपट पाहिला नसेल तर हे वाचू नका, कारण हा चित्रपट आवर्जून बघा अशी विनंती आहे.

शाळेत असताना जनरल नॉलेजच्या स्पर्धांची वगैरे तयारी करताना एक हमखास विचारला जाणारा प्रश्न होता, "फ्लाईंग सीख असे कोणाला म्हणतात?" उत्तर पाठ करून ठेवलं होतं "मिल्खा सिंग, भारताचा धावपटू" पण हा मिल्खा सिंग कोण आणि काय आहे ते काल राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा भाग मिल्खा भाग हा चित्रपट बघून समजलं.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान