असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
https://www.maayboli.com/node/84934
असेल माझा हरी..(३)
छत्तीस तासांचा प्रवास करून वसुधा हयूस्टनं ला पोहोचली, तेव्हा तिला रिसीव करायला श्रेयस प्रिया दोघंही एयरपोर्ट वर हजर होते. त्या दोघांना मिठीत घेतलं, तेव्हा आपल्याला इथे यायचं नव्हतं हे वसुधा विसरलीच. प्रिया खूपच गोड दिसत होती. शेवटी आपली मुलं ती आपलीच मुलं.
असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
आता ह्या वेळची गोष्ट जरा वेगळी होती...
आता वसुधाला जावच लागणार होतं अमेरिकेला..
प्रियाला नुकताच सहावा महिना सुरू झाला होता. नातवंड येणार ह्याचा आनंद तर होताच. पण तिथे राहून तिचं.. पुढे बाळाचं सगळं करणं आपल्याला कसं जमेल ह्याची वसुधाला शंका वाटत होती. तेही त्यांच्या पद्धतीने..!
असेल माझा हरी..(१)
“खरं सांगायचं…, तर मला जरा टेंशनच आलंय.. सगळं कसं जमणार…., मला एकटीला.. माहीत नाही..” वसुधा जरा घाबरतच बोलली. तिचा हा खालच्या आवाजात, घाबरत बोलण्याचा टोन. मुलाशी त्याला आवडणार नाही, असं बोलण्याकरता राखीव असायचा.
“त्यात कसलं आलंय टेंशन..? तिथे बसायचं, इथे उतरायचं.. मी असणारच आहे इथे घ्यायला.. तुला काय प्रॉब्लेम आहे..?” श्रेयसच्या बोलण्यातला हा कडक टोन खास आई करताच असायचा.
अखेर आपण आत्महत्या करायची, असा माझा ठाम निश्चय झाला!
खरे पाहता ; माझ्या निधनाने देशाची अपरिमित हानी व्हायला, मी कुणी समाजसुधारक, समाजसेवक नाही. माझ्या मरणाने अवघा देश पोरका व्हायला मी कुणी मुत्सद्दी राजकारणी नाहीये. देशात न भरता येण्याजोगी पोकळी निर्माण व्हायला; ज्येष्ठ तत्वज्ञ, शास्त्रज्ञ नाहीये. औद्योगिक क्षेत्राचा आधारस्तंभ निखळून पडायला, उच्चभ्रू समाजातील उद्योगपती नाहीये. इतकेच काय पण, एखादी बहुमूल्य कला उघड्यावर पडायला; मी कवी, लेखक, चित्रकार, गायक अथवा अभिनेतादेखील नाहीये.
कथालेखकाची पार्श्वभूमी
मी काही हौशी लेखक वगैरे नाही. शेवटचे लेखन हे कैक वर्षांपूर्वी बारावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये जो निबंध लिहिला तेव्हा झाले होते. सध्या फक्त एखाद्या सरकारी खात्यास माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अर्ज करणे, एखाद्या कंपनीस तक्रार अर्ज पाठविणे इतपतच लेखन मर्यादित झाले आहे! (या कथेतील संवाद मालवणी भाषेत आहेत, माझे स्वतःचे गाव मालवण तालुक्यात असले तरीही मी कधी मालवणीत संवाद साधलेला नाही. मालवणी बोललेली मला समजते परंतु मी बोलत नाही. त्यामुळे यात मालवणी भाषेत काही चुका आढळल्यास क्षमस्व!!!)
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
राजहंस
‘वाहत्या गंगेत हात धुतले, तर निदान पापातून मुक्त झाल्याचं मानसिक समाधान तरी मिळत असेल. पण गटारातल्या पाण्याचे शिंतोडे दुसऱ्यांवर उडवून, काय.. मिळतं काय लोकांना..? कसलं आसुरी समाधान शोधतात ही सगळी माणसं..? आणी आज जे पाणी आपण दुसऱ्यांवर उडवतोय, अगदी मजेत.. तेच उद्या आपल्या अंगावर येणार नाही. ह्याची एवढी खात्री असते लोकांना..?’ संतापाने शलाकाच्या कपाळावरची शिर ताडताड उडत होती.
द्वेष : एक भय गूढकथा
भाग ११
शिखरावरून कोसळणार्या जलप्रपाताला
विचारलेस का कधी
तू इतका उनाड का?
आणि कोसळ झेलणार्या प्रवाहाला
विचारलेस का कधी
तू असा गंभीर का ?
कधी विचारलेस
जंगलच्या राजाला
सुमारांच्या झुंडीपुढे
असा शांतावलेला कसा ?
आणि कळवंड दुभंगल्यावर
पुन्हा गरजतोस कसा ?
जंगलात आताशा श्वानांच्या
झुंडीच फिरतात बहुमताने
बेशिस्तीच्या थव्याने
जंगलचे कायदे हाती घेऊन