गद्यलेखन

अपहरण - भाग ८

Submitted by स्मिताके on 10 March, 2024 - 09:52

भाग ७ - https://www.maayboli.com/node/84756

बिजली किनाऱ्याजवळ चालली होती. कर्नल पाहत उभे होते. त्यांनी आपल्या मुलाला बाहेर जाऊ दिलं नाही. दोघे एकमेकांशेजारी उभे राहून संतप्त जमाव न्याहाळत होते. कोस्ट गार्डचे सैनिक सज्ज होते. बिजली कधी धक्क्याला लागते याची वाट पाहत होते. ती पन्नास फुटांवर येताच कोस्टगार्डच्या प्रमुखाने मोठ्याने गर्जना केली, "थांबा!"

शब्दखुणा: 

चित्रावरून लिखाण- मुखवटा

Submitted by अतरंगी on 4 March, 2024 - 15:37

माझ्या स्वतःच्या नजरेत मी कायमच उच्च स्थानावर राहिलेलो आहे. मी कायम सर्वांना समान वागविणारा आणि कोणतेही भेदभाव न मानणारा आहे, मी कोणालाही त्यांच्या आर्थिक परिस्थिती वरुन, रंगरुपावरुन, राहणीमानावरुन जज करत नाही, ते बघून त्यांच्याशी मैत्री करत नाही, संबंध ठेवत नाही, माझ्या साठी सगळे समान आहेत वगैरे वगैरे. पण आपणच स्वतःला ओळखण्यात अनेकदा कमी पडतो. एखाद्या प्रसंगात आपल्याकडून अशी कृती घडून जाते की ती घडून गेल्यावर आपल्याला वाटतं की शी: मी हा असा कसा वागलो. मी माझी एक छान प्रतिमा माझ्या मनात उभी केलेली आहे आणि स्वतःला मखरामधे बसवून ठेवलेले आहे.

माझा लेखन प्रपंच!

Submitted by चिमण on 4 March, 2024 - 06:17

माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे.

द्वेष : एक भय गूढकथा, भाग ९

Submitted by प्रथमेश काटे on 2 March, 2024 - 00:56

वेळ हळू हळू पुढे सरकत होता. अस्वस्थता... चित्त विचलित करणारी. शिवाय या अस्वस्थतेसोबत काहीशी भीतीही होतीच. ' करावं तरी काय ?' - राजाभाऊंना उमजत नव्हतं. ते फक्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते. निष्फळ प्रयत्न. परिणाम काही नाही. उलट हे मळभ कणाकणाने दाटतच चाललं होतं.

चित्रावरून लिखाण - पाणीच पाणी..

Submitted by SharmilaR on 1 March, 2024 - 03:21

पाणीच पाणी..

चार दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत होता. मध्ये मध्ये पाऊस जर्रा कमी झाल्यासारखा वाटला, तेव्हा चंदाने बाहेर डोकवायचा प्रयत्न केला, पण पावसाची रिपरिप अखंड चालूच होती. बाहेर सगळा चिखल झाला होता. खिडकीच्या एवढ्याशा फटीतून सगळीकडे वहाणारं पाणी दिसत होतं.

बाहेरच कशाला, आता खोलीतही पाणीच पाणी दिसत होतं, आणी ते कसं आवरावं हे तिला कळत नव्हतं. तिचं घर म्हणजे होतंच काय..? तर जेमतेम दहा बाय दहा ची ही एवढीशी खोली.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन