मी बिछान्याला खिळून होतो. तिन वर्षाचा भाचा, सकाळपासून अनेकदा बिछान्याजवळ येऊन गेलेला होता. आपल्याबरोबर रोज खेळणारा मामा, आज असा काय करतोय हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर होता.
न राहवून तो म्हणालाच, ‘तू माझ्याशी का खेळत नाहीस? दिवसा झोपायचं नसतं नं?’,
जवळच उभी आई त्याला समजावून सांगू लागली,
‘मामाला बरं नाही. त्याचे हात पाय दुखताहेत, तो औषध खाऊन झोपला आहे, काही दिवसांनी बरा होईल.’
त्यानंतर अनेकदा तो येऊन गेला. त्याच्या चेहऱ्यावरची गहन चिंता त्याला शब्दात व्यक्त करता येत नसावी. शेवटी त्याने मला हात लावून हलवले. हातात त्याची प्राणप्रिय कार होती.
दुपारची उन्हं कलली, सूर्य अस्ताला जाऊ लागला की पश्चिमेच्या क्षितिजावर लालिमा चढते. हळूहळू सूर्य अस्ताला जातो आणि पश्चिमेचे रंग अधिकच गहिरे होत केशरी, गुलाबी, जांभळे, करडे होत होत हळू हळू अंधाराची धार गडद होत जाते आणि त्याच वेळी पश्चिमेला शुक्र चमकताना दिसू लागतो. ज्यावेळी आकाशातील गहिरे होत जाणारे रंग पश्चिम क्षितिजावर लोप पावत असतात, त्याचवेळी शुक्र मात्र एकटाच दिमाखात तेजस्वीपणे उठून दिसत असतो. तसे पाहिले तर शुक्र हा आकाशातील एक ग्रह, आपल्या सूर्य मालेतलाच. तरीही, तो ज्या वेळी आकाशात आपल्या असल्याने आपले लक्ष वेधून घेतो त्यासाठी त्याला शुक्र तारा हे पद मिळालेले आहे.
दुपारची उन्हं कलली, सूर्य अस्ताला जाऊ लागला की पश्चिमेच्या क्षितिजावर लालिमा चढते. हळूहळू सूर्य अस्ताला जातो आणि पश्चिमेचे रंग अधिकच गहिरे होत केशरी, गुलाबी, जांभळे, करडे होत होत हळू हळू अंधाराची धार गडद होत जाते आणि त्याच वेळी पश्चिमेला शुक्र चमकताना दिसू लागतो. ज्यावेळी आकाशातील गहिरे होत जाणारे रंग पश्चिम क्षितिजावर लोप पावत असतात, त्याचवेळी शुक्र मात्र एकटाच दिमाखात तेजस्वीपणे उठून दिसत असतो. तसे पाहिले तर शुक्र हा आकाशातील एक ग्रह, आपल्या सूर्य मालेतलाच. तरीही, तो ज्या वेळी आकाशात आपल्या असल्याने आपले लक्ष वेधून घेतो त्यासाठी त्याला शुक्र तारा हे पद मिळालेले आहे.
दुनिया ये दुनिया – तुफान मेल
.
आमच्या काळी पण हे गाणे भुले बिसरे गीत विभागातच वाजवले जायचे तरीही सातत्याने ऐकल्याने सवयीचे आणि आवडीचे गाणे आहे. माझ्या एका विचाराच्या मध्ये हे गाणे कुठेतरी वाजायला लागले आणि माझ्या मनातला विचार त्या गाण्याच्या चालीत आकार घेऊ लागला.
.
दुनिया ये दुनिया – मायक्रोव्हेव ओवन
.
आता या नव्या शब्दांमध्ये चाल निट बसत नाही वगैरे काही विचार जे तुमच्या मनात येऊ लागले असतील त्यांना जरा बांधून ठेवा, कारण या वाक्यातली परिस्थिती अशी आहे की तिच्यात आपण जगतो आहोत. आपल्याला हे माहिती आहे का याचाच विचार करून बघुया.
.
मभागौदि २०२५ शशक- क्रोध – Sharmila R
लांबूनच दिसला, सिग्नल हिरवा होता. तिने वेग वाढवला. सेकंद संपले..? आहे.. आहे.. मध्येच पिवळा दिवा लागल्यासारखा दिसला तिला.
तिने वेगाने गाडी उजवीकडे वळवली. पलीकडून कर्कश्य हॉर्न वाजला.
‘त्याने हॉर्न का दिला? स्टील इट वॉज माय सिग्नल.’ तिने उजवीकडे मान करत त्याला विचारले.
कुणी हॉर्न देणं हा गाडी चलवणाऱ्याचा अपमान होता येथे.
‘इट वॉज हिज टर्न.. तू थांबायला हवं होतस.’ तो शांतपणे म्हणाला.
‘नो.. माझं लक्ष होतं..’ ती किंचाळतच म्हणाली.
तो गप्पच बसला.
सर्वपित्रीची रात्र
गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या तरस कातड्याच्या आसनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड.
शेवटच्या आहुतीच्यावेळी महामांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे.
ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची.
याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?
आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल.
महामांत्रिकानं दिलेली सुरी अर्भकदेहात भोसकली अन् तिचं ज्वालार्पण तर केलं एकदाचं..
आता फक्त एक महिना..पुढच्या अमावस्येला धनवर्षाव.....
“अरे हाssड!” चार वेळा हाकलूनही कुत्री त्यांच्या पायापाशी घोटाळत राहिली. "भूक्कड साSSली", त्याने शिवी हासडत पेकाटात लाथ घातली.
एका हाताने कम्मोला जवळ ओढत दुसऱ्या हातात अर्धवट खाल्लेला तुकडा धरत त्याने विचारलं “द्यायचा का तीला?”
खुरटलेल्या दाढीवर चिकटलेला रस्सा, कमी ओंगळवाणा वाटत होता आत्ता त्याच्या नजरेतल्या भावापुढे. अंग आकसून घेत ती मागे झाली.
“तिच्यायला! माज आला काय?” परत जवळ ओढून घेत, पकड घट्ट करत तो भेसूर हसला.
.
लिहिण्याची इच्छा आहे पण लेख लिहिण्यासाठी विषय कुठून आणायचे? असा प्रश्न लेखकाच्या मनात येऊ शकतो. एखादा विषय मनात आला तर तो आधीही लिहिला गेला आहे आणि आपण त्यावर लिहिले तर ते काहीच नवे नसेल असे देखील बरेचदा वाटू शकते.
.
.
विवेक अग्निहोत्री या चित्रपट दिग्दर्शकाने एका मुलाखतीत उच्चारलेल्या इतक्यात भागाचा उल्लेख करून त्यांची बरिच हेटाळणी केलेली वाचायला मिळते. देशभक्त या युट्यूब वाहिनीचे अभिषेक बॅनर्जी तर हे वाक्य आणि त्याचबरोबर अग्निहोत्रींचा अनक वेळा उद्दार करायला अजिबात विसरत नाहीत. तुमच्या सारख्या लोकांकडून सांगितली जाणारी तथ्ये ही तथ्ये नसतातच असे ते पूर्ण वाक्य होते असा खुलासा पण वाचायला मिळाला.
.
दार्शनिक नित्शे यांनी लिहिलेले आहे की ‘तथ्ये नसतातच फक्त निष्कर्ष असतात’ यातही त्यांचा निर्देश तथ्यांच्या सापेक्षपणा कडेच असावा.
.
नागपुरात माझ्या सभोवती कवितांचे वातावरण सुरू झाले ते १९८७ पासून. त्याचे कारण त्यावेळी मला कविता आवडायच्या असे काही नसून ते वेगळेच होते. झाले असे की मीच काही लिहून काढले जे मला कवितेसारखे दिसू लागले. आपण कविता लिहिलीय ही भावना खूपच आनंददायी होती, आता ती कविता ऐकून तिला दाद देणारे श्रोते हवे होते आणि त्यासाठी काही जवळचे मित्र कामी यायला लागले. ती कविता वाचून दाखवण्यासाठी एक वही करायची कल्पना साहजिकच सुचली आणि माझ्या कवितांच्या वहीची अश्या प्रकारे सुरवात झाली.