गद्यलेखन

अंधारयात्रा

Submitted by anudon on 1 May, 2025 - 19:28

खुप वर्षांपूर्वी मी Palomar observatory माऊंटनला गेले होते. ही observatory Palomar State Park आहे, म्हणजे पर्वतावरच्या जंगलातच! observations मुळे रात्रीचं जेवण ५ वाजताच करुन आशिषबरोबर observatory ला गेले. थोड्या वेळानं मी monastery ला परतायचं ठरवलं. Observatory ते monastery अगदीच अर्धा किलोमीटर अंतर. मी बाहेर पडले, मागे भल्यामोठ्या telescope च्या dome चा दरवाजा बंद झाला आणि मी फक्त ओरडण्याची बाकी राहीले होते. इतका मिट्ट काळोख. काळोख ह्या शब्दाचा अर्थ जाणवला, त्या क्षणाला. अगदी आपलं अवघं अस्तित्व त्या काळोखात विरघळून जाईल असा तो काळाकभीन्न अंधार.

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

Submitted by ओबामा on 23 April, 2025 - 10:31

हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
*******************************
हे आलमगीर,

बंद दरवाजे

Submitted by शिवानी बलकुंदी on 16 April, 2025 - 04:59

बंद दरवाजे
लाडक्या लेकीचं जयंतराव आणि शामा ताईंनी थाटात लग्न करून दिले, आजी आजोबा, आई बाबा आणि दादा अशा भरलेल्या घरातली मयूरी लग्न होऊन सासरी आली तेव्हा लग्न घर पाहुण्यांनी भरलेल होतं, लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांचा हास्य विनोद सुरू होता.

शब्दखुणा: 

आहारशैली आणि अन्नसंवेदशीलता : काय, कसे, कधी, कशासोबत खावे?

Submitted by रानभुली on 15 April, 2025 - 21:29

परंपरेने आलेल्या अनेक गोष्टी आपण खाण्या पिण्याच्या बाबतीत पाळत असतो. हल्ली या गोष्टींचं विस्मरण पण होत चाललंय.
कुठले फळ, भाजी कुणी खावी, कधी खावी, कशाबरोबर खावी कशासोबत खाऊ नये, कुठल्या वेळेला खावे असे आजीबाई सांगायच्या. आता आपल्या पिढीला हे माहिती नाही. अशा काही पारंपारिक गोष्टींची जंत्री करण्यासाठी हा धागा. काही चुकीचे समज, धारणा असतील तर त्यावर चर्चा झाली तर उत्तमच. जे योग्य असेल ते टिकून रहावे आणि एकत्रित रित्या सापडावे म्हणून हा धागा.

सुरूवात सध्या उन्हाळा चालू असल्याने कलिंगडापासून.

शब्दखुणा: 

रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?

Submitted by तुष्कीनागपुरी on 21 March, 2025 - 00:10

रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
.
या प्रश्नाचे एक मला पटणारे एक उत्तर वाचायला मिळाले, ते पुढे सांगतोय.
.
मला हा प्रश्न नेहमी पडायचा की उदाहरणार्थ लॉगॅरिदम, कॅलकुलस सारखे विषय अभ्यासात का शिकवले जातात. जर रोजच्या आयुष्यात जगतांना या गोष्टी लागणारच नाहीयेत तर हे शिकण्यासाठी वेळ का वाया घालवायचा? शिक्षण पद्धती अशी बदलायला नको का की ज्यात खरेच आवश्यक असतील तेच विषय आणि कौशल्ये शिकवले जातील. तसे केल्याने वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही का?
.

पिंजरा

Submitted by ध्येयवेडा on 12 March, 2025 - 00:11

वाड्यात आत शिरताच लक्ष जाते ते भिंतीवर लावलेल्या पक्ष्यांच्या भल्या मोठ्या पिंजऱ्याकडे. जेमतेम दोन जोड्यांपासून सुरू झालेलं पिंजऱ्यातील हे कुटुंब आता पंचवीसेक पक्ष्यांचा मोठा परिवार झालेला आहे. कधी त्यांचा चिवचिवाट तर कधी कंठातून निघणारा मंजुळ स्वर मनाला भुरळ घालतोच.

इतका मोठा पिंजरा आणि इतके सारे पक्षी बघून येणाऱ्या-जाणाऱ्यांना खूप कुतूहल वाटते.
असंच एके दिवशी एक मित्र म्हणाला, "किती सुंदर आहेत रे पक्षी, पण पिंजऱ्यात असे बंद केलेले बघवत नाहीत."

श्रावणातील पद्मालयच्या वाटा

Submitted by अविनाश कोल्हे on 5 March, 2025 - 01:20

श्रावणाच्या पहिल्या पावसात ओल्या झालेल्या वाऱ्यासारखी, आमच्या गावातही एक ताजेपणाची लाट यायची. हा महिना सुरू झाला की श्रावणी सोमवारची अर्ध्या दिवसाची सुट्टी आमच्या पायांना सायकलच्या पेडल्सवर ठेवायला भाग पाडायची. सकाळी शिक्षकांचा शेवटचा शब्द संपताच, आम्हा चार-पाच मित्रांचा गट आपापल्या सायकली उचलून पद्मालयच्या रस्त्याने मस्तीत निघालेला असे. एरंडोलपासून जवळपास दहा किलोमीटरवर वसलेल्या या प्राचीन मंदिरापर्यंतचा प्रवास केवळ अंतर नव्हते, तर आमच्यासाठी त्या काळातला एक रोचक अनुभव होता.

मभागौदि २०२५- शशक - परिवर्तन - रसरंगी

Submitted by रसरंगी on 2 March, 2025 - 08:44

कठीण निर्णय होता. पण काय करणार?

शेवटी आपलीच मुलगी. आई वडील म्हणून आपण जितकं समजवायचं ते सगळं केलं.

तिचीच तीव्र इच्छा होती की तिला मुलगी नाही तर मुलगा बनायचंय.

म्हणूनच आपण त्याला मान्यता दिली. ती म्हणाली तिचं स्वप्न ती मुलगा बनूनच पूर्ण करू शकेल.

आज आपल्या मुलीचं एका मुलामधे यशस्वीपणे परिवर्तन झालं आहे.

आपण अजूनही त्याचा उल्लेख 'ती' असाच करतोय.

तोंडात बसलंय ना. पण प्रयत्न करू संबोधन बदलायचा. नावही बदलायला हवं. लोकांनाही सांगायला हवं. काय लपवणार?

काय ठेवूया नवीन नाव?

समन्वयाच्या दिशेने एक पाऊल

Submitted by तुष्कीनागपुरी on 28 February, 2025 - 05:28

एका समाजाचे एकत्र राहताना काही आदर्श गुण मान्य झालेले असतात. त्या सगळ्या आदर्श गुणांचा गोषवारा करून त्या समाजातल्या सगळ्या व्यक्तींच्या गुण काढण्याचे जर एक सूत्र असेल तर त्या समाजातल्या सर्व लोकांचे गुण काढून त्यांना एका तक्त्यावर मांडले तर एक ग्राफ तयार होईल.
.
समाजातले फार कमी लोक सगळ्यांच्या साठी आदर्श गुण घेऊन असणार असे गृहित धरले तर या ग्राफ मधे फार कमी लोक उच्चबिंदू वर असतील आणि बहुतांश लोक त्या उच्चबिंदू पेक्षा खाली असतील. ही एम विचार करण्याची पद्धत सध्या मांडतोय.
.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन