नातीगोती

अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:02

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.

प्रांत/गाव: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:00

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.

एक अधिक एक म्हणजे एक हजार !

Submitted by स्वीटर टॉकर on 30 September, 2015 - 06:23

ही सत्यकथा नाही त्याचप्रमाणे काल्पनिकही नाही. गोपनीयतेसाठी सत्यापासून फारकत घेणं जरूरीचंच असतं.

चित्रपटाआधी एक Disclaimer येतो. Any resemblance of these characters to persons living or dead is purely coincidental. यावर कोणीतरी केलेला विनोद माझ्या वाचण्यात आला होता. Any resemblance of these characters to persons living or dead is purely their bad luck. तशी या कथेची स्थिती आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्या हुवा तेरा वादा आणि शीना बोरा मर्डर केस

Submitted by नितीनचंद्र on 16 September, 2015 - 02:19

मुंबई पोलिस कमीशनर राकेश मारीया जो पर्यंत चार्ज मधे होते तो पर्यंत शीना बोरा मर्डर केस मधील उलट सुलट बातम्या, संभाव्य आरोपी इंद्राणी मुखर्जी तीचे तीन पती, ड्रायव्हर आणि अन्य यांचे धक्कादायक खुलासे यानी वर्तमानपत्रांची पाने आणि उपग्रह वाहिन्यांचे अनेक तास खर्ची पडले.

माकडीण आपल्या मुलाला नाकातोडांत पाणी जाऊ लागल्यावरच नाईलाजाने पाण्याखाली दाबते पण सामाजीक प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पना घेऊन एक आई आपल्या मुलीला मारत असेल अशी कल्पना हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या तद्दन गल्लाभरु चित्रपटांच्या लेखकांच्या मनाला सुध्दा स्पर्शुन गेली नसावी.

एक प्रेमपत्र

Submitted by मार्गी on 13 September, 2015 - 21:24

मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे! तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय! खूप भरून येतंय.

तू! तुझ्याबद्दल काय लिहू? लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू!

सूरूवात – ३ - अंतिम भाग

Submitted by स्फिंक्स on 13 September, 2015 - 19:47

सूरूवात – ३ - अंतिम भाग
मागचा भाग: http://www.maayboli.com/node/55298

“अग पण, त्यांचे काय हाल झाले असतील?” राघुनाथाराव काकुळतीला आले होते.
“ते आपण उद्या सकाळी बघू. आता त्या वाड्यात सकाळशिवाय मी जायची नाही आणि तुम्हाला दोघानाही जाऊ देणार नाही.” रेवातीबाई ठामपणे म्हणाल्या आणि तिथेच ओसरीवर आडव्या झाल्या.

======================================================================
कीर्ती बिछान्यावर पडल्या-पडल्या विचार करत होती.

नात्यातले लहान मोठे

Submitted by निमिष_सोनार on 3 September, 2015 - 01:44

कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का मोठ्यांनी लहानांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लहानांना मोठे होऊन मोठ्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"

तडका - माणसांनो

Submitted by vishal maske on 2 September, 2015 - 11:00

माणसांनो

माणसांच्या झूंडीत या
आज माणूस शोधतो मी
माणसांच्या वागण्यातुन
आज माणूस बोधतो मी

रासवी विचारांचे कधीही
ना कुणालाही फूस द्यावे
अन् माणसांशी वागताना
माणसांनी माणूस व्हावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सुरुवात -२

Submitted by स्फिंक्स on 26 August, 2015 - 23:52

सुरुवात -२

मागचा भाग: http://www.maayboli.com/node/55155

कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. “झाली का रडारड सुरु या काव्याची? “ आत शिरत असणाऱ्या रघुनाथारावाना त्या म्हणाल्या.
“रडारड? काव्या तर कधीच झोपली. प्रवासाने थकली होती.” रघुनाथाराव पलंगावर बसत म्हणाले.
“मग आत्ता धावत कोण गेले? आणि तो रडण्याचा आवाज?” रेवतीबाई जवळजवळ ओरडल्याच.

=================================================================== ===

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

Submitted by निमिष_सोनार on 26 August, 2015 - 02:16

अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:

आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती