सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही.
रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?
पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे?
पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही.
दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात.
तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात.
विचारांचं मनाशी नातं खरं तर आपलं सर्वात जवळचं नातं. जवळचं आणि आयुष्यभर पुरणारं. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा यातला संवाद अधिकाधिक वाढत जातो. निदान वाढायला तरी हवा. हे नातं आपण सर्वार्थानं जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सुदृढ केलं पाहिजे. कारण याच नात्यावर आपली स्वतःची प्रगती आणि प्रकृति अवलंबून असते. याला आपण स्वतःचा स्वतःशी संवाद असं सुद्धा म्हणू शकू. आपल्या मनाला आपण स्वतःच्या विचारांचा लगाम घातला नाही तर ते वाट्टेल तिथे भरकटेल. कधी ते विंचवासारखं आपल्यालाच डसेल तर कधी आपल्या हातून चांगलं कामही करून घेईल.
बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः
माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!
रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला.
"उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली.
आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला. तोंडात राहिलेल्या पाण्याची चुळ भरत पिचकारी मारत म्हणाला " म्हातारे, लग्नाला का आली न्हाय?, वंदीनं तुझ्या नावाचा धोसरा काढला हुता"
नुकतंच माझ्या सासर्यांनी (आम्ही सगळे त्यांना आप्पा म्हणतो) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. त्या निमित्तानी हा लेखनप्रपंच. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.
त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात ते लिहिते.
मी लिहणार आहे तो विषय तसा खुप संवेदनशील आहे त्यामुळे इथे लिहु की नको हा विचार गेले कित्येक महिने मी करतेय. पण माझ्या प्रश्नाला अजुन उत्तर नाही मिळाले म्हणुन मी आज इथे तो प्रश्न मांडतेय तरी तुम्हाला मी हा विषय इथे लिहणे योग्य नाही असे वाटत असेल तर मी हा धागा उडवुन टाकेन. खरतर कोतोबा मध्ये लिहणार होते पण माहितीपण हवी आहे म्हणुन इथे लिहते.
माझी मुलगी दुसर्या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. मग परत कॉलेजला प्रवेश घेतला, सिंबायोसिसमधून D.C.A. केलं आणि डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.
सूर्य उगवतो आणि मावळतो. दिवसा सूर्य प्रकाशमान असताना पृथ्वीवरील सगळेजण त्याचा फायदा घेतात. मावळताना एकटा सूर्य मावळतो. सगळे जग सूर्याबरोबर मावळत नाही. रात्री सूर्य नसतो म्हणून त्याला काहीजण दूषणे लावतात तर काहीजण दिवसभर प्रकाश दिल्याबद्दल रात्री सूर्याचे आभार मानून झोपी जातात. यश हे उगवत्या सूर्यासारखे तर अपयश हे मावळत्या सूर्यासारखे असते....
आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.