बर्लिनच्या टीगल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचे विमान उतरलं आणि वीस वर्षांपूर्वीच बर्लिन मधील आमचं वास्तव्य माझ्या डोळ्यावर समोरून झरकन सरकलं. साल 1989 ते 1991 या काळात मला बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये जर्मन गव्हर्मेंटची रिसर्च फेलोशिप मिळाली होती. त्या निमित्ताने आमचं दोन वर्ष वास्तव्य येथेच होत. आमचं म्हणजे आम्हा तिघांचं; मी, मंजिरी आणि नीरज यांचं. प्रथमच भारताच्या बाहेर वास्तव्य करणार असल्यामुळे आमच्या करता हा काळ सनसनाटी तर होताच, इतकच काय तर 1989 हे साल जर्मन इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाणार होतं. कारण याच वर्षी जर्मनीचे युनिफिकेशन झालं होतं.
...माझे पपा. इथेच आहेत ! या घरात ! पण ; वरच्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत का ? ती खोली तर... नाही ; पण ते आता महत्त्वाचं नाहीये. ते माझे पपा असतील तर मला त्यांना भेटायला हवं. झटक्यात अंगावर पांघरलेली चादर फेकून देऊन ती ताडकन बेडवरून उठली. पळतच तिने बेडचा दरवाजा उघडला. आणि ती हॉलमध्ये आली. हॉल अंधारात होता. खिडकीच्या पडद्याच्या एका बारीकशा उघड्या फटीतून दूरवरच्या लाईटच्या उजेडाची तिरीप आत आलेली. त्याचाच परिवर्तित अतिमंद उजेड हॉलमध्ये पसरला होता. स्वतःभोवती फिरत प्रिया भिरभिरत्या नजरेने तिच्या पपांना शोधण्याचा प्रयत्न करत होती.
समोर एक मनुष्याकृती उभी होती
आधीच्या भागावरून पुढे चालू
पावसाची रिमझिम आता संततधार झाली होती.
काही क्षणातच मुसळधार पाऊस पुन्हा सुरू होईल हे दिसत होतं.
आताच नीटसं दिसत नव्हतं.
पावसामुळे एसी चालू ठेवून वायपर मीडीयम स्पीड वर ठेवलेले होते.
एलईडी हायलाईटने शाळेतल्या ढ मुलाप्रमाणे पावसातली आपली हुषारी खांदे उडवत कबूल केली होती.
थांबावं कि जावं ?
कि कोण आहे ते जाता जाता बघावं ?
मी गाडी स्लो केली. आतले दिवेही लावले.
स्त्री होती ती.
(कल्पनाचित्र जालावरून साभार)
आमचं घर गावाच्या बाहेर होतं.
मोठं प्रशस्त. लाकडी बांधकाम होतं.
सागवानी लाकडाचे मोठ मोठे कॉलम आणि बीम्स होत्या.
जोधपूरच्या रातनाडा पॅलेसचं बांधकाम केलेले राजस्थानी कारागीर त्या वेळच्या देशमुखांसाठी इथे राबले होते.
तेव्हांपासून देशमुखांचा पिढ्यान पिढा दबदबा आहे इथे.
मी कोण नाही सांगितलं का मी ?
असंच होतं नेहमी. माझ्याबद्दल सांगायचंच राहतं माझ्याकडून.
म्हणजे माझ्याबद्दल काय आहे सांगण्यासारखं ?
सगळं तर इतर मधेच आहे.
त्यांनी सभोतालच्या पुस्तकावरून नजर फिरवली. अभिमानाने! आणि का नसावा अभिमान? इतकी संपदा लिहायला, इतर लेखकांना चार जन्म घ्यावे लागतील! पाच पन्नास 'चारोळ्या' किंवा 'कविता' लिहल्या कि, यांचं 'कवित्व' कोरड पडत. चार मासिकात (हो, या जमान्यात दिवाळी शिवाय कोणी छापत नाही. सगळं ऑन लाईन!) दोन कथा आल्याकी शेफारून जातात! 'मी लेखक - मी लेखक' म्हणून ढोल पिटून घेतात. आपल्या सारख्या शेकड्याने कथा आणि चाळीशीच्या आसपास कादंबऱ्या लिहणाऱ्या, लेखकाने 'अभिमान' बाळगू नये तर काय करावे?
सर्वप्रथम कथा लिहीण्यापेक्षा लिंक्सच जास्त मागतोय त्याबद्दल क्षमा असावी. २०१५ मध्ये थरारकथा संकलन नावाचा लेख आला होता, तसा धागा पुन्हा सुरू करता येईल का ?
चोरी
सगळं आटपून पिया अंथरुणावर टेकली तोच दारावरची बेल वाजली. पियानं घड्याळ बघितलं. रात्रीचे साडे-दहा झाले होते. `इतक्या रात्री कोण कडमडलय?` या विचाराने आणि थोड्याश्या भीतीनं पियानं मुख्य दरवाजाकडे धाव घेतली. दरवाजाबाहेर कोण आलंय ते बघण्यासाठी असलेल्या गोलातून तिनं बाहेर पाहिलं आणि ती गर्भगळीतच झाली.
दाराबाहेर राघव उभा होता. राघव तिचा नवरा. तोच राघव; ज्यास मृत्यूनंतरचा अग्नी देऊ पंधरवडाच झाला होता.
`पियू, दार उघड न लवकर...` राघव बाहेरून घाई करत होता.
कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता.
म्हातारीने गोष्ट संपवली. “लयच भारी गोष्ट सांगता हो तुमी आज्जी. माझी आज्जी पन मला अशाच भुताच्या गोष्टी सांगायची. लय भ्या वाटायची मला तवा. पन आता मी नाय घाबरत.” सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीतीतर वाटत होती पण तसं बोललो तर आपल्याला बाकीचे दोघे भित्रा म्हणतील या भीतीने दोघेही काहीच बोलत नव्हते. सनी मात्र आता चांगलाच रंगात आला होता. “आज्जी अजून एक गोष्ट सांगा ना.” असं म्हणत त्याने नंदू आणि विनूची आणखीनच पंचाईत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहात असल्यासारखं म्हातारी म्हणाली, “सांगते पण आधी एकेक कप गरमगरम दूध प्या. थंडीमुळे गारठले असाल.