त्यांनी सभोतालच्या पुस्तकावरून नजर फिरवली. अभिमानाने! आणि का नसावा अभिमान? इतकी संपदा लिहायला, इतर लेखकांना चार जन्म घ्यावे लागतील! पाच पन्नास 'चारोळ्या' किंवा 'कविता' लिहल्या कि, यांचं 'कवित्व' कोरड पडत. चार मासिकात (हो, या जमान्यात दिवाळी शिवाय कोणी छापत नाही. सगळं ऑन लाईन!) दोन कथा आल्याकी शेफारून जातात! 'मी लेखक - मी लेखक' म्हणून ढोल पिटून घेतात. आपल्या सारख्या शेकड्याने कथा आणि चाळीशीच्या आसपास कादंबऱ्या लिहणाऱ्या, लेखकाने 'अभिमान' बाळगू नये तर काय करावे?
सर्वप्रथम कथा लिहीण्यापेक्षा लिंक्सच जास्त मागतोय त्याबद्दल क्षमा असावी. २०१५ मध्ये थरारकथा संकलन नावाचा लेख आला होता, तसा धागा पुन्हा सुरू करता येईल का ?
चोरी
सगळं आटपून पिया अंथरुणावर टेकली तोच दारावरची बेल वाजली. पियानं घड्याळ बघितलं. रात्रीचे साडे-दहा झाले होते. `इतक्या रात्री कोण कडमडलय?` या विचाराने आणि थोड्याश्या भीतीनं पियानं मुख्य दरवाजाकडे धाव घेतली. दरवाजाबाहेर कोण आलंय ते बघण्यासाठी असलेल्या गोलातून तिनं बाहेर पाहिलं आणि ती गर्भगळीतच झाली.
दाराबाहेर राघव उभा होता. राघव तिचा नवरा. तोच राघव; ज्यास मृत्यूनंतरचा अग्नी देऊ पंधरवडाच झाला होता.
`पियू, दार उघड न लवकर...` राघव बाहेरून घाई करत होता.
कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता.
म्हातारीने गोष्ट संपवली. “लयच भारी गोष्ट सांगता हो तुमी आज्जी. माझी आज्जी पन मला अशाच भुताच्या गोष्टी सांगायची. लय भ्या वाटायची मला तवा. पन आता मी नाय घाबरत.” सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीतीतर वाटत होती पण तसं बोललो तर आपल्याला बाकीचे दोघे भित्रा म्हणतील या भीतीने दोघेही काहीच बोलत नव्हते. सनी मात्र आता चांगलाच रंगात आला होता. “आज्जी अजून एक गोष्ट सांगा ना.” असं म्हणत त्याने नंदू आणि विनूची आणखीनच पंचाईत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहात असल्यासारखं म्हातारी म्हणाली, “सांगते पण आधी एकेक कप गरमगरम दूध प्या. थंडीमुळे गारठले असाल.
"आता अजून एक गोष्ट ऐका.” आज्जी म्हणाली तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. आज्जीने गोष्टीला सुरुवात केली-
तिने डोळे उघडले व ढगांच्या गडगडाटासारखी हसली. तोंडात दात नव्हते. तिघांचीही आता चांगलीच टरकली होती. नंदू आणि विनूने एकमेकांच्या हातावरची पकड आणखीनच घट्ट केली. सनीही एक पाऊल मागे आला. ते तिथून पळणार होते तितक्यात “माझे पाय उलटे आहेत का हे पाहायलाच आलात ना?” असे म्हणून म्हातारीने पांघरूण थोडं वर केलं तसे तिचे सुरकूतलेले अशक्त पाय दिसले. ते पाय सरळ होते उलटे नव्हते हे पाहून तिघांनीही निःश्वास सोडला.
ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? मला लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. “तरी तुला म्हनत हुतो नको घ्यायला याला. लय भित्र हाय हे.” सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला “भित्रा” बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशात येऊन म्हणाला, “मला भित्रा म्हंता व्हय. मी कुनाच्या बापाला बी भीत नाय. चला….” असे म्हणून तो एखाद्या योध्याच्या आवेशात पुढे आला.
रावसाहेब वाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांचं मन पश्चातापाने व्यापलं होतं. बाळूवर आपल्या मुलावर आपण किती अन्याय केले हा एकच विचार त्यांच्या मनात घोळत होता. वाड्यात येताच बाळूला शोधत पूर्ण वाडा त्यांनी पालथा घातला. शेवटी ते गोठ्यात गेले. तिथे बाळू गाईंना चारा देण्यात मग्न होता. बाळूला पाहताच रावसाहेबांनी त्याला आलिंगन दिले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले. रडक्या घोगऱ्या आवाजात ते बोलत होते, “मला माफ कर बाळा, माफ कर!