जीवन
एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई!"
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद.
|| ॐ ||
दि. २७ एप्रिल २०१६
ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!
लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती.....
लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती...
आमचे गाईड -आमचा न्हावी
पृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.….
एक वेल नाजुकशी..
एक वेल नाजुकशी..
एक वेल नाजुकशी
झुले दारा-उंबर्यात
येता झुळुक वार्याची
कशी डोलते तालात
वेल झुरते सुकते
सल कळेना कुणास
पान झडुनिया सारे
उरे फांदोर्यांच्या सोस
स्पर्श होता अनामिक
वेल थरारे आतून
रस जीवनाचा पुन्हा
वाहे अंगाअंगातून
कोंब इवलेसे उभे
तेज मावेना दिठीत
वेल आंदोळत स्वैर
शुभ्र फुले ओंजळीत
वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
------------------------------
खेळ जीवनाचा
खेळ जीवनाचा
=====================
खेळता हा जीवनाचा खेळ सारा
जाहला आता जिवाचा खेळ सारा
दान टाके का मनीच्या भावनांचे
संपला होता कधीचा वेळ सारा
का कळेना अर्पितो मी प्रेम माझे
मोडला होता मनांचा मेळ सारा
गुंतलो ना राहिले मज भान माझे
फाटला हा भावनांचा पीळ सारा
माजला कल्लोळ या मनी भावनांचा
मामला या प्रेमिकेचा निर्भेळ सारा
- प्रतिकवी
दोन क्षणांचा प्रवास जीवन...
आपण आपले भले बुरे,
हवे कुणाला हार तुरे?
उभ्या रहिल्या भिंतीना,
प्रेमाचा आधार पुरे...
घरट्यामधले पिलू मोकळे,
आभाळाची कास धरे...
रोख कुणाचा कसा असावा,
कुणी सांगावे; काय बरे?
गोंधळ जगती फार जाहला,
कानी कोण हे गूज करे?
अफलातून ही दुनिया रे,
खोट्याचेही करे खरे...
दोन क्षणांचा प्रवास जीवन,
जगता जगता सहज सरे...
म्हणून जगणे समजून घ्यावे,
सरल्यावरती काय उरे?
------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१/११/१२ - दु. ३.२०)
गणपतींच्या निमित्ताने
तीन एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा २ वर्षाचा भाच्चा बाप्पांचे विसर्जन करायला आला होता तलावावर. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणून माझ्या भाउजीनी विसर्जन केले, आणि इकडे माझा भाच्चा ते पाहून जोर जोरात रडायला लागला. बाप्पा पाण्यात बुडतील, त्यांना त्रास होईल म्हणून तो रडत रडत, बाप्पाला पाण्यातून बाहेर काढायला पाण्यात जात होता. हा प्रकार आजू बाजूच्या लोकांच्या लक्षात आला आणि ते हसू लागले, यामुळे तर तो अजूनच वैतागला. माझे बाप्पा पाण्यात बुडत आहेत आणि हे लोक हसत आहेत, हे त्याच्या बाल मनाला पटत नसावे. कशीबशी समजूत काढून त्याला घरी आणले.
स्वप्न, ती आणि स्वप्नातला मी!
स्वप्नांच्या जगात माझ्या एक फुलांची बाग होती
बागेतल्या त्या कट्ट्यावर फक्त तुझीच मला साथ होती
हातात घेवून तुझा हाथ तिथे कविता मी करत होतो
तुझ्याच प्रेमात ग सजणी वेड्यासारखा मी झुरत होतो
तू स्वप्नातही मला अचानकच सोडून जायचीस
वेड्या ह्या जीवाला माझ्या, एकाकी सोडायचीस
घाबरलेल मन माझ तुला शोधत फिरायचं
थकून भागून बिचार मग एकटच रडायचं
स्वप्नातही कधी तू माझी न झालीस
एकट्याला टाकून मला दूरदेशी गेलीस
दूरदेशीच्या राजकुमारात तू अस काय ग बघितलंस
तुझ्याच ह्या प्रतिबिंबाला अस का ग रडवलस???
आजही तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर शाबूत आहेत
परतीची वाट कधीच नसते रडून मला सांगत आहेत
जीवन
'' जीवन म्हणजे नसतोय
शब्दांचा पोरखेळ;
जीवन म्हणजे कर्तव्याने
केलेला मनाचा छळ !
जीवन म्हणजे नसते नुसती
कुस्ती आणि मस्ती,
जीवन म्हणजे असते
वेदनांची वस्ती,
उद्याची धास्ती,
जेवढी महाग तेवढीच सस्ती;
आणि प्रबोधनाची श्रावस्ती...! ''
- सिद्धार्थ तायडे, चिखलगांव
मो. ९८८१४३३२१०
आस
कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल
ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....
खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय
कधीतरी का होईना,