जीवनाचं सार
समुद्र एक माझ्या मनात
खूपच गोष्टी भरल्यात त्यात
एक खडक,एक किनारा, एकेक नातं
जबाबदा-यांनी भरलेलं एकेक पोतं
संकटांचे दगड
तर अक्षरश: रग्गड
सौख्य आनंदाचे शिंपले
जे इथे तिथे वेचले
सगळंच हे ओझं
अखेर फेकायचंय माझं
पण सगळ्यात प्रश्न मोठा
म्हणजे किना-यावर फुटणा-या लाटा
त्या कसल्या, कशाच्या, कुठून उद्भवल्या, काहीच नाही कळत
खळाळत, उसळत, भळाळत
थेट काळजात घुसतात नकळत
मला आता खात्री वाटतीय
नक्कीच त्या आहेत जवळच्या व्यक्तींविषयीच्या भावनांच्या
उदा. पत्नी, मुलं, भावंडं, मित्र, नातवांच्या
त्यांच्याबद्दल आपली काय निरिक्षणं आहेत यांच्या
प्रत्येकाच्या जिवनाची
वेगळी वाट होती
जसा दिवस आंनदाचा
विरहाची हुरहुर होती
जुळलेले स्नेहसंबध
तुटले जाणार होते
विरहाचा विषाद होता
मुखावर संमीश्र भाव होते
वियोगाच्या विषादाने
ह्रदय भरुन होते
मानवी जिवनाची तर्हा
विचीत्रच म्हणावी लागते
मैत्रीची "जीवनसरीता"
अखंड वाहत राहते
हा दोष कुणाचा
माझ्यामधील संस्कारांचा कि
कायद्याला भिऊन रहा या शिकवणीचा,
माझ्यातील हळवेपणाचा कि
चाकोरीबाहेर पाउल न टाकणार्या भित्रेपणाचा,
हा दोष कुणाचा
तुझ्यामधील मस्तीचा कि
मन मानेल तसे वागणार या बेदरकारपणाचा,
तुझ्यातील उन्मत्तपणाचा कि
चाकोरीबाहेरचे जीवन जगणार्या जोषाचा,
हा दोष कुणाचा
माझ्यामधील अवयवांचा कि
सहन करु शकले नाहीत आक्रोश वेदनांचा,
माझ्या डोक्यातील विचारांचा कि
स्तब्धच झाले अर्थ न जाणवे यातनांचा
हा दोष कुणाचा
माझ्यामधील सुरिक्षत कारचालकाचा कि
नियम पाळून दुखावल्या गेलेल्या मनाचा,
हा दोष कुणाचा
तुझ्यातील बेफाम वेगाचा कि
अपघात करूनही शीळ वाजिवणार्या तारुण्याचा

नकळत जीवनात
मोड असा लागला
गेले सारे कसे कुठे
राहिलो मी एकला...
गरजेस्तव जो तो
संगती ने चालला..
मखरात स्थापुनी मला
कुठे चालता जाहला...
शिखरावर भोगतो मी
एकान्ती असली सजा
मीच इथे माझा राजा
मीच असे माझी प्रजा...
माणूस स्वतःसाठी कधी जगतच नसतो
त्याला जगावे लागते मनाची कवाडं बंद करून,
खोटे चेहरे लावावे लागतात
मुखवट्यावर मुखवटे चढ्वावे लागतात
मनात कढ असले तरी
ओठावर हसू दाखवाव लागतं,
मनातली वेदना दाबून ठेऊन
डोळ्यात आनंद दाखवावा लागतो,