काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.
नवरात्र आली की मुंबईत नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.
पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही असं माझ्या ओळखीत तरी दिसलं.
स्वातंत्र्यदेवतेचा जयघोष ही अशी मात्रा आहे की जी चाटवल्यामुळे ग्लानी आलेला समाजात चैतन्य फुंकले जाते. स्वाभिमानी मन हे कायमच कुठलेही दास्य पत्करायला तयार होत नसते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हे सत्य जाणणारे अनेक पराक्रमी योद्धे या भारतभूमीवर होऊन गेले. परकीयांच्या ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा स्वराज्याचा एल्गार करणारे शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. अकबराचे दास्य पत्करणे मान्य नाही म्हणून हल्दीघाटीचा संग्राम मांडणारे राणा प्रताप आपल्याला स्फूर्ती देतात. परंतु यांच्याइतकाच एक पराक्रमी योद्धा आपल्या पूर्वांचलात होऊन गेला याची माहिती फार थोडक्या मंडळींना असते.
शोध पुस्तक वाचले का? मला तर खूप छान वाटले. इतिहास आणि तंत्रज्ञानाची जोड चांगली घातली आहे. केतकी व शौनक जोडी, तसेच तो गोंदाजी आणि ते गावातले वातावरण, तो भायाचा सण सर्व अगदी मनोरंजक आहे. ह्या पुस्तकावर चर्चे साठी धागा.
ह्याची खरे तर फिल्म बनवली पाहिजे. खूप मस्त होईल. असे पाने उलटताना वाटत होते. पोस्टी लिहीताना फार रहस्य भेद होनार नाही ह्याची कृपया काळजी घ्यावी. ह्या पुस्तकावर आधारित काही मर्चं डाइज उपलब्ध असते तरी मी ते घेतले असते. उदा. पहिला तो श्लोक मोडीत लिहीलेले सुलेखन असलेला मग, भूदेवीची मूर्ती, मॅप चे चित्र असलेला टीशर्ट वगैरे.
१. माझ्या लग्नाला सुमारे आठ वर्षे होऊन गेली. मी मुंबईत नव्यानेच आलो होतो. नोकरी होती. बायकोही गावाकडचीच . सुमारे महिनाचभर सुखाचे दिवस पाहिले. तदनंतर तिला नोकरी लागली आणि सगळा बट्ट्याबोळ झाला. तिच्या बापाला असलेल्या अनेक मुलींपैकी एक रिकामट्व्कडी तिची बहीण व तिचा रिकामटेकडा नवरा याना सगळा पगार देणार , त्याग करणार या हट्टाने घरात भांडणे सुरु झाली... माहेरी पगार द्यायला माझा विरोध नव्हता. पण भविष्यात होणार्या आपल्या मुलाला चार पैसे तरी ठेवावेत हीच माझी इच्छा होती. उरलेली रक्कम सुमारे ७० % तिने रिकामटेकड्याना द्यावेत ही माझी अपेक्षा होती.
ह्या भागात म्हटल्याप्रमाणे मिर्जा़ मोहम्मद रफी सौदा ह्याचा परिचय करून घेऊ. (दर्द वर लिहायला आज शक्य होईल असे वाटत नाहीए). सौदाचा काळ १७१३-१७८०. तो प्रसिध्द शायर मीर तकी मीरचा समकालीन. समीक्षक रामनाथ सुमन ह्यांच्या कथनानुसार मीरच्या समकालीन कवींमध्ये मीर व्यतिरिक सर्वात प्रसिध्द कुणी असेल तर तो सौदा. हे समजून घेतले पाहिजे की सौदाच्या कवितेत निश्चित काही गुण असणार ज्यामुळे हे घडले. मीर गझलेसाठी तर सौदा हा कसीदा (प्रशंसात्मक कविता) साठी मोठे मानले जातात. सौदाला ही बोच असावी म्हणून तो म्हणतो:
लोग कहते है कि सौदाका क़सीदा है खू़ब
उनकी खिदमतमें लिये मैं यह ग़ज़ल जाऊंगा
इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने १८३७ ते १९०१ या काळात इंग्लंडवर (आणि भारतावरही!) राज्य केलं. मुंबईतील व्ही.टी. स्टेशन - व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), कलकत्याचं व्हिक्टोरिया मेमोरियल आदी वास्तूंना याच व्हिक्टोरियाचं नाव दिलं गेलं होतं. या व्हिक्टोरियाने आपल्या मुलानातवंडांची लग्नं युरोपातील विविध राजघराण्यात लावून दिली. म्हणूनच तिला ’युरोपची आजी’ (Grandmother of Europe) असंही म्हणतात.