रामजन्माच्या आठवणी !
हंम्म्!
झाला असेल रामजन्म एव्हाना!
इथे ऑफिस मध्ये बसून निरस वाट्ते.
मन हळूच भूतकाळात जाते!
चैत्रातल्या रणरणत्या उन्हात वडिल चटके लागण्यार्या रस्त्यावरून राम मंदिरात घेउन जायचे! तिथे गेल्यावर मात्र एकदम छान वाटायचे! किर्तनकार सुश्राव्य व रसाळ आवाजात रामजन्माचा सोहळा वर्णित असत! रामजन्म झाल्यावर गुलालाने वातावरण एकदम रंगून जायचे! त्यानंतरचे प्रसाद वाट्प! कडकडून भूक लागली असल्याने पोट्भर प्रसादाने मस्त वाटायचे! मग इवल्याशा पाळ्ण्यातल्या बाळरामाच्या मूर्तीला वंदन करून घरी परत जातांन्ना माझ्या छोट्या पावलान्ना मात्र ऊन लागल्याचे आठवणीत नाही!
कुठे गेले ते दिवस?