आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्या भिकार्याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..
किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .
उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .
या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले
दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........
कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.
वेगळी धुंदी इथे अन्
वेगळा हा बाज आहे.
वेगळे हे विश्व आणी
वेगळा हा साज आहे.
शांत सारे हे स्वयंभू
शांत इथला नाद आहे.
शांतिचे संगीत म्हणूनी
कोकिळाही शांत आहे.
बंद होती येथ वाटा
बंदिचे संगीत आहे.
आज बंदी पाहिली मी
मुक्त येथे गात आहे.
बंदिचेही शब्द ऐसे
मानसीचा साज आहे.
सुप्तता अन् शांततेचा
मूळचा आवाज आहे.
बोलण्यासी आतुरे तो
खोल आतलाच आहे.
आज या ही..कारणाने
मुक्त तो ही होत आहे.
शांती आणी मोक्ष सारा
येथ तो मिळणार आहे.
सत्य शामल नम्रतेने
मी इथे झुकणार आहे.
आज काहि मागणे ना
मुक्तिही मोक्षात आहे.
मुक्तिच्या विहरात येथे
समाधिही स्तब्ध आहे...
वाटे मला हा देश भकास आता
शांती कधी लाभेल जगास आता
पेटेल क्रांती देश नवा कराया
लागेल थोडे तेल धगास आता
ॠतू अवेळी रंग नवाच फेकी
आणू नव्या शोधून ढगास आता
मौनी असे राजा ललनेस दारी
सोडायची ना त्यास मिजास आता
गेली कशी गूरे बघ छावणीला
लागेल मोठ्ठ टाळ घरास आता
चेकाळली श्वाने लत वासनेची
जाईल कोण्या देश थरास आता
(मार्गदर्शन अपेक्षीत)
'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणं रेकॉर्ड करायच्या आधी लतानं ते फक्त एकदाच ऐकलं होतं म्हणे. ऐन रेकॉर्डींगच्या दिवशी दुसर्या एका गाण्याचे रेकॉर्डींग लांबल्यामुळे त्या या गाण्याच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही हे गाणं दुसर्या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करा (तात्पुरते म्हणून) असे त्यांनी संगीतकारांना कळवले. म्हणून मग ते रवींद्र साठ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशी लता मंगेशकर रेकॉर्डींगला आल्या. तोपर्यंत त्यांनी हे गाणं किंवा त्याची चाल अक्षरशः एकदाही ऐकली नव्हती. आल्यावर त्यांनी ते गाणं आपल्या अक्षरात लिहून घेतलं.
॥ श्री ॥
‘हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा
बहरल्या दिशा दहा!
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!
रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘
ऋतुराज! म्हणजे वसंतऋतु ! दहा दिशांना बहरून टाकत येतो हा ऋतुंचा राजा ! याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात.आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.
गीतेत विभूतीयोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ पृथ्वीवरचा ‘कुसुमाकर’म्हणजेच वसंतऋतु तो म्हणजे मीच !’
India : Nation of Villages. Its an attempt show case the people, life, culture, landscapes and infrastructure of Indian villages I was lucky to visit.
नमस्कार,
मागे काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे या नावाचा धागा टाकला होता. त्यावर आलेले प्रतिसाद,सुचना मनात घोळवत ८एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत काशीयात्रेला जाउन आलो. अलाहाबाद, विंध्याचल व शेवटी काशी असा प्रवास होता.
त्याचा थोडक्यात वृत्तांत असा.
यात्रेची तयारी नोव्हे.१२पासुनच सुरु होती. जाने.१३ मधे ट्रेन बुकींग केले. ज्ञानगंगा एक्स्प्रेस २४तासात अलाहाबादला पोचवते असं ऐकुन तीचं रिझर्वेशन केलं.
८ एप्रिल १३(सोमवार)
स्थळ: पुणे
वाचन आणि आपण
आज,जागतिक पुस्तकदिनी मनात येतंय की खरंच किती रटाळ झालं असतं जगणं या पुस्तकांशिवाय.आपलं स्वतःचंच जगणं जगण्याची सक्ती. तेही तसं रोमहर्षक असतं म्हणा, उनसावल्यांचं,सुखदु:खांचं,स्थित्यंतरांचं,संकटांचं,संधींचं वगैरे वगैरे,पण आपल्यापुरतंच फक्त.
एखाद्याला (खरं तर प्रत्येकालाच) खूप भूक असते, एका जन्मात अनेक जगणी जगायची असतात, अनेक कथानकं भोगायची असतात त्यातल्या थरारांसकट.
म्हणून तर पुस्तकं भेटतात आपल्याला. प्रतिभेचे अनंत रंग घेऊन पुढे सरकत रहातं जगण्याचं महाकथानक, कधी महाकाव्य..
त्या वाचनप्रवासाचा हा एक धावता आढावा..