कुटुंब
या सदरातील शेवटचा प्रश्न सोडता सर्व प्रश्न अनिवार्य होते. कुटुंबातील घरकामाचे लिंगाधारित विभाजन, परंपरेनुसार घरातील जबाबदार्या, दिवसाकाठी स्वयंपाकघरात देण्यात येणारा वेळ आणि तीन पिढ्यातील फरक याभोवती या विभागातील प्रश्न गुंफले होते.
हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
विवाह व लग्नसंस्था
'भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे लग्न' हे परंपरागत गृहितक तपासून पहाण्याच्या दृष्टीने या सदरातील सर्व प्रश्न योजले होते. खरंतर या सदरातील केवळ ३ प्रश्न अनिवार्य ठेवले होते तरीही बहुतांशी विवाहित मैत्रिणी असल्याकारणाने की काय. यातील प्रत्येक प्रश्नाला भरभरुन प्रतिसाद आले.
- वैवाहिक स्थिती व लग्नाचे वय:
श्रुतीला मी ती प्राथमिक शाळेत असल्यापासून ओळखते. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. 'संयुक्ता' च्या 'महिला दिन' कार्यक्रमाबद्दल मैत्रिणीशी बोलत असताना ती सहज म्हणून गेली की श्रुती यानिमित्ताने काहीतरी लिहू शकेल. श्रुती एवढी मोठी झाली हे तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली कश्या प्रकारचं लेखन हवं, Serious, stat-oriented, or whimsical, personal-oriented? थोडं 'हलकंफुलकं' असलं तर बरं अस मी कळवल्यानंतर पुन्हा आठवण करुन देण्याआधीच आठवड्याभरात लेख माझ्याकडे आलासुद्धा!
मुंबईपुढचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात दुर्लक्षिला गेलेला प्रश्न कोणता असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. मुंबईपुढचे पाणीटंचाईचे संकट दरवर्षी उग्र स्वरुप धारण करत आहे. पावसाळ्यात तानसा,वैतरणा,विहार्,मोडकसागर तलाव भरुन वाहू लागल्याच्या बातम्या एकेकाळी वर्तमानपत्रांमधे आल्या की आता उन्हाळ्यापर्यंत पाणी नक्की पुरणार असं समजून मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडायचा.
नमस्कार मंडळी,
संवाद साधणं ही सजीवांची जवळपास मूलभूत गरजच! प्राणीपक्षीसुद्धा अन्न सापडल्याची किंवा धोक्याची सूचना विशिष्ट ध्वनी करून आप्तस्वकीयांना देतात. माणसाची धाव त्यापुढची. 'भाषा' हे त्याच्यासाठी केवळ 'माहितीची देवाणघेवाण' करण्याचं माध्यम किंवा साधन नाही. ते त्याच्या जगण्यातलं एक आनंदनिधान आहे. तो भाषा 'वापरत' नाही, तो एखाद्या शिल्पासारखी भाषा 'घडवतो', तिला अलंकारांची लेणी चढवतो.. आणि हे करतांना नकळत स्वतःही अधिक सुसंस्कृत घडत जातो.