आज सुरेवारसिंगला ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते.
“समोशात साखर टाकली का रे?” पहिला घास घेताच निखिल ओरडला.
“नाही साहेब बटाटे गोड आहेत. नवीन बटाटे पूर्ण तयार व्हायच्या आधीच मार्केटात येते. ते गोड राहते.”
“पण समोशाची चव बिघडते ना.”
बदली
नेहमीचा तो विशिष्ट आवाज करून एसटीचा तो लाल डबा थांबला. बरेचसे प्रवासी आधीच्या थांब्यांवर उतरले होते, त्यामुळे या शेवटच्या थांब्यावर उतरणारी आम्ही पाच-सहाच मंडळी होतो. नुकतीच माझी कोकणातील या गावी बदली झाली होती. नेहमीप्रमाणे इतर प्रवासी उतरल्यानंतर मी शांतपणे उतरलो. शहरामध्ये न रमणारा मी खाली उतरल्यावर आजूबाजूला नजर टाकताच कमालीचा सुखावलो.
आम्ही प्रार्थना केली की याच्या पेक्षा परिस्थिती वाईट होऊ नये आणि tent मध्ये शिरलो.>>>
Tent मध्ये गेल्यानंतर काही तास सुरळीत गेले असतिल तेवढ्यात एक कानाचे पडदे फाडणारा, अंगाचा थरकाप उडवणारा आवाज झाला. असे वाटत होतं की कोणीतरी बॉम्ब ब्लास्ट केला की काय. मी tent च्या कापडा मधून काय दिसतय का ते बघू लागलो तर एक लख्ख प्रकाश आमच्या tent च्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर केंद्रित झाला होता. बाजूच्याच jhadavar विज पडली होती. मी मनातल्या मनात आकाश ला चार सणसणीत शिव्या घातल्या. कारण मी जेव्हा ही शक्यता बोलून दाखवली तेव्हा तो माझ्या भित्रेपणा वर हसला होता.
आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं.
$1,00,000! आकडा ऐकून, पाहूनही गोर्डनचा विश्वास बसत नव्हता. इतके पैसे आयुष्यात कधी दिसतील अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. आपल्यामुळे असं काही घडू शकतं हा तर फार दूरचा विचार. चालून चालून पायाला आलेल्या फोडांकडे तो बघत राहिला. आपणही कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो हे त्याला पहिल्यांदाच कळत होतं. एक वर्ष! या एका वर्षात हे घडलं त्यावर गोर्डनचा स्वत:चाच विश्वास बसत नव्हता. या एका वर्षाने त्याला बदललं होतं आणि आता तो कितीतरीजणांना बदलणार होता.
"बंड्या खोत, अनुपम पटेल, सुदेश जाधव हे सारे एकाच माळेचे मणी. मला जे सांगायचं आहे ते या प्रत्येकाच्या कहाणीत दडलेलं आहे." शेफालीची नजर फोटोंवर स्थिर होती तर समोर बसलेल्या प्राध्यापकांची तिच्यावर. तिच्यावर असंख्य प्राध्यापकांचे डोळे रोखलेले होते पण तिचं लक्ष्य साठेसर होते. साठ्यांना पटलं, आवडलं की काम फत्ते. एकेक करून तिला चित्रातली माणसं जिवंत करायची होती. त्यांची निवड तिने का केली, ही माणसं तिला कुठे भेटली, त्यांच्याशी तिचं काय बोलणं झालं हे सांगत त्यांचं आयुष्य जिवंत करायचं होतं. ही सगळी माणसं भेटली तर त्यांची आपली ओळख आहे असंच प्रत्येकाला वाटायला हवं याची तिने मनाशी खूणगाठ बांधली.
आज खूप दिवसांनी माबोवर आले म्हणून ही लॉकडाऊन काळातच लिहून ठेवलेली एक कथा!
-----
दिवस १