माझं नाव नार्या - म्हणजे नारायण कांबळे पण नार्याच म्हणतात मला. शिक्षण - B.Com. तीन वेळा बसून नापास. सध्या क्लार्क आहे एका खाजगी कंपनीत. तर असा मी साधा-सुधा माणूस. पण गम्मत अशी आहे की सर्वांनाच मी साधा-सुधा नाही वाटत. पण लोकांचं काय, त्यांची आणि एखाद्याची मतं नाही जुळली की लगेच त्या माणसाला विचित्र ठरवून मोकळे! माझ्या शेजार्या-पाजार्यांनी , ऑफिसमधल्या सहकार्यांनी मला असच विचित्र माणूस ठरवलय. एवढच काय माझी आई सुध्दा कधी कधी माझ्या बोलण्यावर एकदम टीपं गाळते. म्हणते "देवा, कसं व्हायचं माझ्या या वेड्या लेकराचं?" आता मी काही वेडा आहे का? पण "जाऊ देत", मी म्हणतो.
काटकसर
महाबळेश्वरच्या त्या जराश्या आडवाटेवरच्या खोल दरीच्या वरच्या उंच कड्यावरील जराशा सपाट जागेवर आम्ही दोघं बसलो होतो. सगळीकडे तशी भयाण शांतताच होती. त्या शांततेचा भंग करत सुधा मला म्हणाली,
`हा जो सगळा खर्च तुम्ही चालवला आहे...`
`सुधा... मी तुला काय म्हटलंय, अजिबात पैशाचा विषय काढायचा नाही.` मी तिला मध्येच थांबवत म्हणालो.
सकाळी उठल्या उठल्या माझी धावपळ चालू होते. फिल्मसिटीला वेळेत पोहोचणं माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. मी वेळेचा एकदम पक्का असणारा एक अतिशय यशस्वी चित्रपट कलाकार आहे... असा जर तुमचा समज झाला असेल तर तो साफ चुकीचा आहे. मी आहे एक स्ट्रगलींग अॅक्टर. शिक्षण आणि पुणं सोडून चित्रपटात नाव कमवायचं अशा महान(?) ध्येयाने प्रेरित होऊन मी घरच्यांना काहीही न सांगता मुंबईला पळून आलो त्याला आता दहा-एक वर्ष होऊन गेली. आता खरं तर ते ध्येय पार धुळीला मिळालंय. उरलीय ती फक्त आजच्या जेवणाची चिंता. उद्याचाही फारसा विचार करणं आता बाजूला ठेवलंय.