कथा
Survival story - भाग 3
आम्ही प्रार्थना केली की याच्या पेक्षा परिस्थिती वाईट होऊ नये आणि tent मध्ये शिरलो.>>>
Tent मध्ये गेल्यानंतर काही तास सुरळीत गेले असतिल तेवढ्यात एक कानाचे पडदे फाडणारा, अंगाचा थरकाप उडवणारा आवाज झाला. असे वाटत होतं की कोणीतरी बॉम्ब ब्लास्ट केला की काय. मी tent च्या कापडा मधून काय दिसतय का ते बघू लागलो तर एक लख्ख प्रकाश आमच्या tent च्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर केंद्रित झाला होता. बाजूच्याच jhadavar विज पडली होती. मी मनातल्या मनात आकाश ला चार सणसणीत शिव्या घातल्या. कारण मी जेव्हा ही शक्यता बोलून दाखवली तेव्हा तो माझ्या भित्रेपणा वर हसला होता.
कायाकल्प!
आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं.
पाचशे मैल
$1,00,000! आकडा ऐकून, पाहूनही गोर्डनचा विश्वास बसत नव्हता. इतके पैसे आयुष्यात कधी दिसतील अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. आपल्यामुळे असं काही घडू शकतं हा तर फार दूरचा विचार. चालून चालून पायाला आलेल्या फोडांकडे तो बघत राहिला. आपणही कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो हे त्याला पहिल्यांदाच कळत होतं. एक वर्ष! या एका वर्षात हे घडलं त्यावर गोर्डनचा स्वत:चाच विश्वास बसत नव्हता. या एका वर्षाने त्याला बदललं होतं आणि आता तो कितीतरीजणांना बदलणार होता.
काटशह
"बंड्या खोत, अनुपम पटेल, सुदेश जाधव हे सारे एकाच माळेचे मणी. मला जे सांगायचं आहे ते या प्रत्येकाच्या कहाणीत दडलेलं आहे." शेफालीची नजर फोटोंवर स्थिर होती तर समोर बसलेल्या प्राध्यापकांची तिच्यावर. तिच्यावर असंख्य प्राध्यापकांचे डोळे रोखलेले होते पण तिचं लक्ष्य साठेसर होते. साठ्यांना पटलं, आवडलं की काम फत्ते. एकेक करून तिला चित्रातली माणसं जिवंत करायची होती. त्यांची निवड तिने का केली, ही माणसं तिला कुठे भेटली, त्यांच्याशी तिचं काय बोलणं झालं हे सांगत त्यांचं आयुष्य जिवंत करायचं होतं. ही सगळी माणसं भेटली तर त्यांची आपली ओळख आहे असंच प्रत्येकाला वाटायला हवं याची तिने मनाशी खूणगाठ बांधली.
लॉकडाऊन
राक्षस
राक्षस
`पितृछाया` बंगल्याचे गेट उघडून मी अंगणात पाऊल टाकले. बंगल्याकडे एक नजर टाकली. बंगल्याची संपूर्ण रयाच गेलेली होती. बंगल्याचा मालक कफल्लक झाला होता वगैरे काहीही परिस्थिती नव्हती. तो श्रीमंतच होता. मात्र गेले सात-आठ वर्ष आजारी होता; गेले दोन वर्ष तर अंथरुणावरच होता. जवळचं असं कुणी जवळ नव्हतं. आणि मी, त्याचा so called मित्र, एक डॉक्टर होतो. रोजच्या माझ्या visitसाठी मी त्या बंगल्यात शिरत होतो.
चूक!
चूक!
सहाचे सुमारास घरी पोचणारा मी आज चारलाच घरी पोहोचत होतो. आमच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर माझी गाडी दिसताच सिक्युरिटीचा माणूस गेट उघडायला धावत आला. माझी गाडी गेटमधून आत घेत असतानाच मला आमच्या दुसऱ्या रिझर्व पार्किंगमध्ये आशुचीही गाडी लागलेली दिसली. रोज सात नंतर येणारी आशुही आज लवकर आलीये की काय! मला प्रश्न पडला. मी सिक्युरिटीवाल्याला विचारलं,
``आशू madamही आल्यात का?``
``हो साहेब. आत्ताच! पाचच मिनिटं झाली असतील.``
मोह
मोह
``साहेब, माझं स्वयंपाक-पाणी आटपलंय. बाईसाहेब त्यांच्या मैत्रिणींकडे गेल्यात न? आता दोन-तीन तास तरी परत यायच्या नाहीत. तुमचं आणखीन काही काम असलं तर सांगा. अगदी कोणतंही!``
पुष्पाचं बोलणं थोडंसं उशीराच माझ्या मेंदूत शिरलं. मी माझी कादंबरी अगदी संपवतच आणली होती. शेवटची आणि अतिशय महत्वाची दोन प्रकरणं तेव्हढी राहिली होती. मग लगेच ती एका दिवाळी अंकाच्या संपादकाकडे पाठवायची होती.
याच विचारात असलेल्या मला, पुष्पा काय बोलतेय ते थोडंसं उशीराच लक्षात आलं. मी पुष्पाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं.
आधी मी कोण ते थोडक्यात तुम्हाला सांगतो.
अक्कड बक्कड...
अक्कड बक्कड बंबे बो
अस्सीs नब्बेs पुरेss सो
सो मे निकला धाssगा
चोर निकल के भाssगा
बाहेर मुलांचा खेळ रंगात आला होता. मातोश्रींनी खिडकीतूनच त्यांच्या वरताण आवाज लावत, "इकडे खेळू नका. किती आवाज करताय?" म्हणत त्यांना पिटाळलं.
"तू जरा खिडकी लावूनच पड ना. दिवसभर आता त्यांचं सुरुच रहाणार असं" या माझ्या वाक्यावर परत तणतणून झालं तिचं, " जर्रा म्हणून झोपू देत नाहीत. सकाळ नाही दुपार नाही, यांचं आपलं सुरुच"
Pages
