माझ्यासाठी तुझे ते गाणे असू दे
सांगायास काही गाऱ्हाणे असू दे
तुझ्यासारखे कैक वेडे इथे रे
मज सारखे काही शहाणे असू दे
नवे यमक काही सुचलेच नाही
जुळलेले शब्द जुने पुराणे असू दे
विरहाचे क्षण आहे मनी पण
आठवणीत चोरून पाहणे असू दे
खरे सुख आहे तुझे तुज पाशी
जरा दुःख गोजिरवाणे असू दे
जीवनास या अर्थ नसेल तरीही
जगायास थोडे बहाणे असू दे
इथे काय सारेच कविवर्य नाही
दोन चार श्रोते दिवाणे असू दे
- अमेय
7387674171
मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी. किंवा, हा लेख म्हणजे काहीतरी गंमतजंमत असणार असाही काहींचा अंदाज असावा.
माझ्यासाठी तुझे ते गाणे असू दे
सांगायास काही गाऱ्हाणे असू दे
तुझ्यासारखे कैक वेडे इथे रे
मज सारखे काही शहाणे असू दे
नवे यमक काही सुचलेच नाही
जुळलेले शब्द जुने पुराणे असू दे
विरहाचे क्षण आहे मनी पण
आठवणीत चोरून पाहणे असू दे
खरे सुख आहे तुझे तुज पाशी
जरा दुःख गोजिरवाणे असू दे
जीवनास या अर्थ नसेल तरीही
जगायास थोडे बहाणे असू दे
इथे काय सारेच कविवर्य नाही
दोन चार श्रोते दिवाणे असू दे
- अमेय
7387674171
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…
बाहेर टीव्हीच्या कुठल्यातरी चॅनेलवर गाणं सुरू होतं.
दांडीचं भांडं
तसा माझा स्वयंपाक घराशी संबंध अधूनमधून येत असतोच, पण बहुतेक वेळा तो "चहा" नामक कॅटेगरी पर्यंतच मर्यादित राहतो. तसा मला स्वयंपाक येतोच (हो! खरंच! कसली शंका?), पण बायको माझ्यावर तशी वेळ येऊ देत नाही. याबद्दल तिचे आभारच मानायला हवेत—स्वयंपाकात प्रयोग करून घर उद्ध्वस्त करण्याचा माझा स्वभाव ती ओळखून आहे बहुतेक.
आता, प्रत्येक घरात एक असं खास भांडं असतं, जे फक्त चहासाठीच वापरलं जातं. बाकी काही त्यात शिजवलं तर स्वयंपाकघरात थेट आणीबाणी लागू शकते. आमच्याकडेही असं एक खास, आदरस्थानी असलेलं चहाचं भांडं आहे—"दांडीचं भांडं"!
६वी / ७वीत असताना 'मोठ्यांची' पुस्तकं वाचण्याची मला गोडी लावली ती दोन लेखकांनी. एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर आणि दुसऱ्या मीनाताई. 'दक्षिणरंग' पासून सुरुवात तर झाली पण अपूर्वरंग अजून अपुराच आहे. पण लेखक / लेखिका हेही एक वलय असतं. त्या वलयाच्या पल्याड आपल्याला जाऊन पाहता येईल असं नाहीच होत. आणि आलं तरी अशी कुठलीही व्यक्ती आपल्या संकल्पनेत जशी असायला हवी तशीच असते असं नाही आणि तसा हट्टही आपण धरू नये. पण माझं नशीब असं की तब्बल ३ वेळा याची देही याची डोळा मीनाताईंना भेटण्याची संधी मिळाली.
माझं त्याच्या आयुष्यात येणं ही पूर्वनियोजितच होत्त. हां तसा थोडा उशीर झाला जरा लवकर येता आलं असतं तर त्याला अजून समजून घेता आलं असतं आणि कदाचित कथेचा शेवट त्याला त्याच्या रीतीने करता आला असता आणि ती कथा तुम्हाला आम्हाला वाचायला मिळाली असती. पण या सर्व जर तर च्या गोष्टी खरंच त्याला कथा संपवायची होती का ही त्याचा तोची जाणे. खरतर तुम्हा सर्वानाच उत्सुकता असेल की कवठीचाफाला ओळखणारी ही आसामी कोण? पण त्याच्या प्रमाणेच मला ही अनभिज्ञ राहून माझा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोण सांगायला आवडेल. हा दृष्टिकोण सगळ्यानाच आवडणार नाही पण मी जेवढा त्याला जवळून पाहिलंय तितका तुम्ही कोणी नसेल अनुभवला.
कोकणातील पहाट अनुभवण्याचा स्वर्गीय अनुभव नक्की वाचा.
कोकणातली मनोहारी पहाट
“या जडशीळ खादाडाला उचलून थेट नदीत टाकला पाहिजे.”
“रोज रोज त्याच्या शक्तीचे कौतुक ऐकायला नको.”
“ दिवस रात्र त्याला घाबरून रहायला नको”.
“यापुढे कधी त्याला पहायलाही नको.”
“प्रत्येक गदायुद्धात हा पहिला येणार! “
“आणि कौरवांचा युवराज कायमच दुसरा!”
“एकदा भीमसेनाचा काटा काढला की, राज्य, गादी आणि अधिकार केवळ कौरवांचाच असेल!”
“ खरंतर, लढाईतच हरवला पाहिजे या शंभर हत्तींचे बळ असणा-या पंडुपुत्राला.”
“पण तेच तर नाही ना जमत भावा!”
“मग जमेल ते करु. त्याला लाडू आवडतात तर लाडू खायला घालू.”
“आणि लाडू मधून विष.”
“मग देऊया टाकून नदीमध्ये.”
तिला तो जाम आवडला होता.
तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं,तेच मुळी मारामारी करताना.
एकदम मॅनली होता तो.
तिला अगदी अस्साच बॉयफ्रेंड हवा होता. बेफाट !
त्याच्याबरोबर तिला अगदी सेफ वाटत असे.
एकदा ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलते अशी नुसती शंका त्याला आली.
अन तिला तिची चूक जाणवली. तिला मॅनली बॉयफ्रेंड हवा होता. पण असा नक्कीच नाही. तिची निवड साफ चुकली होती.
पण आता खूप उशीर झाला होता.
त्याच्या भावना, त्याचं प्रेम कुठे हरवलं होतं, कोणास ठाऊक ?
आणि त्याने तिच्यावर चाकूचा वार केला . तिचे प्राण गेले… तरी तो वार करतच राहिला .