ही एका सामान्य माणसाची डायरी आहे. साधं सुधं ममव, नोकरदार आयुष्य जगता जगता वाट्याला आलेले काही बरे वाईट क्षण, त्या क्षणी मनात आलेले विचार, उमटलेल्या भावना, त्या क्षणांच्या मनात कोरलेल्या आठवणी. तसे बघायला गेले तर त्याही काही जणांसाठी माझ्यासारख्याच सामान्य, पण माझ्यासाठी त्या अनमोल आहेत. अशाच क्षणांच्या, आठवणींच्या, भावनांच्या ह्या नोंदी…….
माझी डायरी, माझी खरडवही.
AI मुळे पोटार्थी लेखक आणि अन्य काही कलावंत देखील देशोधडीला लागतील की काय अशी वास्तव भीती आज घोंघावते आहे. नोव्हेंबर 2022मध्ये चॅट जीपीटी सार्वजनिक झाल्यानंतरचा AIचा झंझावात सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच. सुरुवातीस हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानापुरते सीमित राहील अशी एक वेडी आशा सामान्य माणसाला होती. परंतु त्यानंतर या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. लेखन आणि कलाक्षेत्रही या आक्रमणापासून बचावलेले नाहीत.
सोनार बांगला
७ मे हा महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचा दिवस आहे. “गीतांजली” मध्ये त्यांनी निर्भयपणे आणि ताठ मानेने जगण्याचा संदेश दिला होता. त्या काळातील बंगालचे वर्णन त्यांनी केले होते.
स्मार्ट कान आणि डोळे
ऑपरेशन सिंदूरला आता नेमके एक वर्ष पूर्ण झाले आहे. ऑपरेशन सिंदूर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले आणि सात दहशतवादी तसेच अकरा लष्करी टार्गेटचा नाश करण्यात आला. यापैकी काही टार्गेटपाकिस्तानच्या आत २७० किमीपेक्षा अधिक अंतरावर होती. त्याचप्रमाणे, आपल्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या आत ३१४ किमी अंतरावर असलेले उडते रडार विमान पाडले. किमान पाच लढाऊ विमाने नष्ट झाली आणि अनेक F-15 विमाने विमानतळावरच उद्ध्वस्त करण्यात आली. पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन परतवून लावून नष्ट करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांना आपण सलाम करूया.
इराण – इराक
ट्रम्प यांनी इराणविरुद्ध घोषित न केलेले युद्ध सुरू करून जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. अमेरिकेचे व्यावसायिक दृष्टिकोनातून दोन मुख्य उद्देश आहेत. पहिला म्हणजे तेलाची विक्री डॉलरमध्ये करणे आणि दुसरा म्हणजे जगभरात आधुनिक शस्त्रास्त्रे व दारुगोळा पुरवणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर देशांतील विध्वंस आणि मृत्यूबद्दल अमेरिकेला फारशी काळजी नसते.
कल क्या होगा किसने जाना
गेल्या आठवड्यात बीजिंग मध्ये एकवीस किलो मीटरची मॅरेथॉन पळण्यात आली. ही स्पर्धा लायटनिंग नावाच्या खेळाडूने पन्नास मिनिटात जिंकली. पुढच्या स्पर्धकाला एक तास अठरा मिनिटे लागली. एक लक्षात ठेवले पाहिजे कि जिंकलेला स्पर्धक हा रोबो होता. थोडक्यात आता रोबो बुद्धीच्या दृष्टीनेच नव्हे तर शारीरिक तंदरुस्तीने माणसावर मात करू लागले आहे.
अधल्या-मधल्या नोंदी – १
..... एक-एक म्हणता म्हणता अशा क्षणांची मोळीच बनत जाते.. अन् मग आपल्यातलंच माणूसपण निघून जातंय की काय असं वाटायला लागतं..
दूर सारायचे ठरवले तरी सगळे प्रसंग तसेच नजरेसमोर असतात.. गळून नं जाणाऱ्या ओंजळीतच!!! कुठल्याही अपेक्षा करणं नाहीच आता, पण असलेली किमान तत्व.. खूप मोठा शब्द आहे का हा..? मग तत्व नको.. पण ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे..’ असं वाटणं म्हणजे तर खूप नाहीय नं?