जणू काहीच वेगळं घडत नाही अशा अविर्भावात, संथ बेफिकीरपणे श्री पायऱ्या चढून वर आलाआला. राजाभाऊ ही मनाची तयारी करीत मागून आले. अगदी सहजगत्या श्री कडी बाजूला सरकवून दरवाजा पुढे लोटला. आजूबाजूच्या पूर्ण शांततेत तो दरवाजाचा करकरण्याचा आवाज राजाभाऊंना पुढील भयानकतेचा सूचक वाटला ; पण त्यांनी तो विचार झटकून टाकला. एव्हाना दिव्यांची झकपक थांबली होती. दारं कडे कडेला आत गेली. तसा आतला काळोख एका नव्या, निराळ्या अधिकच गडद रूपात त्यांच्यासमोर साकार झाला. हात मागे घेऊन श्री जागेवर उभा राहिला त्याचे टप्पोरे, निळे डोळे त्या अंधारावर खिळलेले.
प्रिया रागारागाने ताडताड पावलं टाकत रूममध्ये आली. आणि तिने सरळ आपली बॅग भरायला घेतली.
" प्रिया.. प्रिया थांब. काय करतीयेस ? " तिच्या पाठोपाठ घाईघाईने खोलीत येत सोनालीने विचारलं.
" मी जाते आहे." प्रिया.
" अगं कुठे जाणार आहेस ? "
" कुठे म्हणजे ? माझ्या घरीच. मला माझ्या पपांना भेटायचं आहे. मी दुखावलं त्यांना. " प्रिया भावूक होत म्हणाली. " आजही रात्री येतील ते नक्की मला भेटायला.
" प्रिया अगं अशी अविचाराने घाई करू नकोस. तुला काही माहित नाहीये. तिथे धोका आहे."
तरुण मुलांना हे सगळं रिलेट होणं कठीण आहे पण आमच्या लहानपणी आम्ही काय खेळत होतो, शून्य साहित्यातून ही आम्ही खेळाचा आनंद कसा घेत होतो त्याची ही गोष्ट. तुमचे ही असे काही स्पेशल खेळ आणि आठवणी असतील तर ते ही इथे लिहा.
आमचे अनोखे खेळ
"माणसात जायला लाग आता." लेकीला म्हटलं.
"म्हणजे कुठे?" चेहर्यावरची माशीही न हलवता तिने विचारलं.
"सुट्टी आहे ना. तुझी लसही घेऊन झाली आहे. कुठेतरी काम कर. तेवढाच माणसांशी संपर्क."
"दादा गेला नव्हता माणसात." लेक माणसात जायला तयार नव्हती.
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता. आम्ही सगळे जण मग सकाळी लवकरच पुण्याहून अलिबागला निघालो.
श्री आणि राजाभाऊ थेट रात्री उशिरा घरी परतले. प्रियाला त्याचं काय सुरू आहे तेच समजत नव्हतं. तो आपल्या घरी जाऊन त्याचे काहीतरी विधी करेल, असा तिने मनाशी तर्क केला होता ; पण तो तर तिकडे फिरकलाही नव्हता. मात्र तो जे काही करीन ते योग्यच करीन असाही तिला विश्वास होता. आला तेव्हा श्रीच्या चेहऱ्यावर जरासं समाधान दिसत होतं. प्रियाच्या मनात खूप उत्सुकता होती ; पण त्याच्या तपासाची दिशाच निराळी असल्याने कसं आणि काय विचारावं अशा संभ्रमात ती पडली होती. ते ओळखून श्री स्वतःहून तिला म्हणाला -
व्ही फॉर - भाग चार - अंतिम
--------------------------------
त्यांच्या गॅंगमध्ये एक उत्तमसिंग नावाचा पोरगा होता. मध्य प्रदेशातला. त्याच्या सहाय्याने तिकडून भारीभारी शस्त्रास्त्रं यायची . थातूरमातूर गुन्हेगारीपण आता काळाबरोबर बदलली होती .
दिप्या आणि आणखी चार पोरं पळाली . आधी नाशिक , गुजरात आणि मग तिथून मध्यप्रदेशांत एके ठिकाणी .
व्ही फॉर - भाग तीन
----------------------------
रियाला किडनॅप केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितलं होतं . बापरे! साधी मध्यमवर्गीय माणसं ती . घाबरलीच . पोरीला किडनॅप केलं, त्यात तो नामचीन गुंडा ! पण पुढे त्यांच्या कानावर असं आलं की त्याच्यावर हल्ला झालाय . तो वाचेल याची शक्यता फारच कमी आहे. पण त्यांनी एक केलं . त्या क्षणापासून त्यांनी रियासाठी स्थळ बघायची सुरुवात केली.
पण दिप्या त्याच्यातून वाचला. तो वाचणारच होता . त्याची इच्छाशक्ती जबर होती आणि अंगातली रगही !
व्ही फॉर – भाग दोन
------------------------
मयत उरकून ते परत निघाले.
गाडीत खास पोरं होती ; पण सगळेच शांत होते . कारण दिप्या शांत होता. पोरांना वाटत होतं की भाई दुःखात आहे - मोठ्या भाईच्या . ते खरंही होतं; पण दिप्या या क्षणाला डबल दुःखात होता .