Submitted by विद्या भुतकर on 27 July, 2017 - 10:45
गिलहरियां....- कवि अमिताभ भट्टाचार्य
मला निसर्ग कविता फार कमी आवडतात. कदाचित सर्व प्रकारच्या उपमा प्रत्येक गोष्टीला आणि व्यक्तीला देऊन झाल्याने नवीन काही शिल्लक आहे असं आता वाटत नाही. सिलसिलाच्या 'ये पत्तियों की है सरसराहट....' वाल्या डायलॉग ला लै भारी वाटते हो अजूनही. आणि तितकीच लहान असताना 'हिरवे हिरवे गार गालिचे' आवडली होती. ती आता इतकी आवडते की नाही माहित नाही. मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधलं एक गाणं ऐकलं होतं,'सूरज की बाहो में'. अगदीच बोर वाटलं होतं. त्यामुळे दंगल मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळाला.