मी त्याच्यापाशी पोचलो तेंव्हा तो डाराडूर झोपला होता. त्याला उठवावे का? माझे मन म्हणाले, हो, तेच योग्य आहे. पण माझे दुसरे मन म्हणाले, नको. त्याच्याजागी तू असतास तर त्याने तुला मदत केली असती का?
शेवटी मी त्याला उठवायचे ठरविले. पण मी त्याला उठवणार इतक्यात मला त्याचे दर्पोक्तीपूर्ण शब्द आठवले. “तू? अन माझी बरोबरी करतोस? तू यत्किंचित मंदगती आहेस, तर मी वाऱ्याशी स्पर्धा करणारा.”
त्याला धडा शिकविणे गरजेचे होते.
मी त्याला तसाच सोडून पुढे निघालो. मी अंतिम ठिकाणापाशी पोचलो तेंव्हा तो अजूनही तिथे आला नव्हता.
आज बऱ्याच दिवसांनी मला बक्षिस मिळाले होते. ते घट्ट पकडून मी लगबगीने घरी चाललो होतो.
वाटेत विश्रांतीसाठी मी क्षणभर थांबलो. इतक्यात माझे लक्ष खाली गेले. आणि मला “तो” दिसला. तो माझ्याकडेच रोखून पाहत होता.
त्याच्याकडे असलेली गोष्ट पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले. ती मला मिळाली तर? पण त्यासाठी मला त्याच्याशी दोन हात करावे लागणार होते.
क्षणभर वाटले, त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या वाटेने निघून जावे. पण अशी संधी सोडायचे माझे मन होईना.
तो अंगापिंडाने माझ्याएवढाच होता. पण मी त्याला सहज लोळवू शकेन. हि संधी मी सोडता काम नये.
मध्यरात्रीच्या दाट अंधाराच्या छायेत अनेक अमानवी सावल्या खेळत होत्या. एकमेकांच्या कानात वेगवेगळे गूढ गुपित सांगत होत्या. असे गुपित जे फक्त त्यांच्या जगातील लोकांनाच माहीत होते.
कोणत्यातरी एका सावलीने उत्साहाच्या भरात एक गुपित दुसऱ्या सावलीच्या कानात नेहमीपेक्षा जास्त जोराने बोलले. अर्थात तिथे कोणी माणूस असता तर त्याला ते ऐकू आले नसते. कारण ते साधेसुधे तुम्ही आम्ही बोलतो तसे शब्द नव्हते.
“आई…, जेवण तयार झालं का?” पायातल्या चपला काढत दारातूनच मी आवाज दिला. “माझं ताट कर लवकर. उशीर झालायं, गाडी चुकेल.”
“आत तर ये आधी. का दारात उभा राहून जेवणार आहेस?” माझी आई बोलण्यात माघार घेणारी नव्हती.
मी गडबडीनं आत आलो, कपडे बदलले आणि हात धुवायला गेलो.
संध्याकाळचे सात वाजले होते. आठला शहराकडे जाणारी शेवटची गाडी होती. ती चुकवून चालणार नव्हतं. नाहीतर उद्या कामावर जायला उशीर झाला असता आणि मग बॉसची बोलणी खावी लागली असती.
गावाच्या शेवटच्या टोकाला, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं. तिथंच राहायचा अर्णव, एक शांत आणि गूढ स्वभावाचा तरुण!
गावाच्या दुसऱ्या टोकाला राहायची सायली, जणू चंद्राच्या शीतलतेसारखी. सुंदर आणि हळवी!
पहिल्यांदा त्यांची भेट झाली गावातील जुना वडाच्या झाडाखाली.
सायलीला वाचनाची आवड होती, आणि अर्णवला लेखनाची.
थंडीचे दिवस होते. विराज आणि त्याचे 3 मित्र ट्रेकिंगसाठी एका घनदाट जंगलात गेले होते. दिवसभराच्या प्रवासानंतर जंगलाजवळ एका उंच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले आणि त्यांनी तिथेच तंबू ठोकण्याचा निर्णय घेतला. चंद्राच्या शीतल प्रकाशात झाडांची सावली एकमेकांत मिसळून अजब आकृत्यांसारखी दिसत होती. पक्ष्यांचे आवाजही बंद झाले होते, फक्त झाडांच्या पानांवर वाऱ्याची सळसळ ऐकू येत होती.
इथे या फेस्टिव्हलसंबंधी थोडी माहिती/अनुभव शेअर करत आहे.
एक डिस्क्लेमर म्हणजे, ही माहिती वैयक्तिक अनुभवावर आधारलेली असल्याने सगळ्यांना लागू पडेलच, असं नाही.
यासंबंधी आणखी कुणी जाणकार असतील तर यामध्ये भर घालू शकतील, किंवा सुधारणा करू शकतील.
१. यंदा हा फेस्टिवल १३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आहे. कॅंपातील आयनॉक्समध्ये, सेनापती बापट रोडवरच्या पीव्हीआर पॅव्हेलियनमध्ये आणि औंधमधल्या सिनेपोलिसमध्ये हा फेस्टिवल होणार आहे.
हा भयपट आहे. यामध्ये बिपाशा बासू तिच्या वडिलांसोबत साऊथ बॉंबेमध्ये एका बंगल्यात राहत असते. त्यावर बिल्डरांचा डोळा असतो. जागा बळकावण्यासाठी बिल्डर तिच्या वडिलांवर दबाव टाकतात. त्यामुळे वडील आत्महत्या करतात. बिपाशाचा पूर्वेतिहास दुर्दैवी आहे.
पण बिपाशा या धक्क्यातून बाहेर पडलेली आहे. तिनं आता मुंबई सोडलीय. आणि हिमाचल प्रदेशात एका जंगलात एक रिसॉर्ट टाकलाय. चांगलं चाललंय रिसॉर्ट. शिवाय तिथे कुणाल नामक एक हिरोछाप तरूणही मुक्कामी आलेला आहे.
कमान ओलांडून अठरावी
अधीर आलो अनङ्ग-देशी
इथल्या अणु-रेणूवर अविरत
प्रथम-रसाची(#) झाक जराशी
पर्वत इथले अवघड, दुस्तर
घळीत त्यांच्या नजर न ठरते
चेटूक त्यांचे नजरबंदीचे
स्वप्नातही ना पाठ सोडते
गुहा निसरड्या, फसव्या इथल्या
दुर्लभ अतिशय त्यांचे दर्शन
गारूड गूढाचे पण त्यांच्या
पंचप्राणा छळते निशिदिन
अनङ्ग-देशी एक उमजले
नाद खुळा पर्वत कुहरांचा
हात आपुला जगन्नाथ - जो
मुष्टित दे अनुभव तुष्टीचा 