मी छाटल्या ठिकाणी उमलून आज आलो
ग्रीष्मातला बहावा होऊन आज आलो
चांभारचौकश्यांना चकवून आज आलो
कुप्रश्न धाडसाचे उठवून आज आलो
वेड्यांमुखी प्रशंसा वदवून आज आलो
हेटाळणीस त्यांच्या टाळून आज आलो
जे लागले जिव्हारी लपवून आज आलो
मौनात संयमाला सजवून आज आलो
चिंता - नव्हे - चितांना फसवून आज आलो
माया अशाश्वताची सोडून आज आलो
- मंदार.
रस्त्यापासून दूर... एक भलामोठा डोंगर.
डोंगराच्या पायथ्याशी छान टुमदार दुमजली बंगल्यांची वस्ती.
शहरापासून दूर... अलिप्त.
मुद्दामहून राखलेली...
...नाहीतर त्या अजस्त्र, महाकाय, आकाशालाही गिळंकृत करणाऱ्या स्कायस्क्रेपरच्या गर्दीत झाडीत असलेली ही वस्ती कधीचीच संपली असती...
...पण त्या वस्तीला आशीर्वाद होता त्याचा, म्हणून तिचं नावच होतं...
...सोडा तो विषय पुन्हा कधीतरी.
तर तिथल्याच एका बंगल्यात तो राहायचा...
...वयाच्या खुणा स्पष्ट चेहऱ्यावर उमटलेल्या, मात्र तरीही ताठ मानेने आकाशाकडे बघणारा.
सतत काही ना काही वाचत असलेला, लिहीत असलेला.
सहवासे जुळती धागे
‘ह्या घरात एक तर ती तरी राहील, किंवा मी तरी..’ हे ओठावरचं वाक्य मी पोटात ढकललं. कारण अगदी कोरस मधे ‘तीssssss..’ हे उत्तर यायचीच शक्यता जास्त होती.
मायबोली गणेशोत्सवाच्या धूमधामीतही तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कारणही तसंच होतं. १०० आकडा तिच्या नकळत गाठलाच होता. त्याच विचारात तिने संयोजकांच्या धाग्यावर नो मैदा, नो शुगरचा संकल्प लिहून टाकला. ‘त्या निमित्ताने शंभरातले काही तरी कमी होतील’’ तिने विचार केला.
——
नीट चाललेल्या संकल्पाला ग्रहण लावण्यासाठीच की काय आज नवऱ्याने तिच्या आवडीच्या करंज्या आणल्या. ‘प्रसाद म्हणून खाव्याच लागणार’ असा विचार करत पाच सहा करंज्या ताटलीत घेत ती मायबोली चाळू लागली.
इथे आल्यापासून मायलेकांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.घरून शिदोरी बांधून घेऊन येता आली नव्हती.
सर्वत्र रंगीत वातावरण.सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्न भाव.पण कोणाच्या घरी आवर्जून जाऊन हात पसरणं फार भीतीदायक. अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये.अगदी ओसरीपर्यंत भुकेने नेलंही होतं.पण आतलं दृश्य पाहून परत फिरावं लागलं होतं.शिवाय बाहेर अखंड कोसळता पाऊस.
ते अंत्यविधी नंतरच्या आठवड्याचे दिवस होते. तिने आपल्या मेहनती शाखा व्यवस्थापक पतीचा अंत्यविधी गेल्या आठवड्यातच आटोपला होता ,तिचा प्रिय पती,ज्याने दिवस रात्र कष्ट करून साध्या लिपिकापासून बँकेच्या व्यवस्थापकापर्यंतची प्रगती केली होती, आपल्या दोन मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण दिले होते,परदेशात नोकरीला पाठवले होते आणि तिला एक संपूर्ण व सुखी जीवन दिले होते.
दहा वर्षांनी कॉलेजमेट्सच्या रियुनियनचा योग आला. पावसाळ्यात करायचे ठरले.
वर्षाविहार रियुनियन!
सारे आले होते. "ते दोघे" वगळून! पाऊसही तसाच धुंद होता. दहा वर्षांपूर्वी असायचा तसाच. आणि आम्ही सारेच रेनडान्स करत होतो. दहा वर्षांपूर्वी करायचो तसेच. पण माझ्या मनात प्रश्न येत होते. ते दोघे का आले नसावेत? कॉलेजमध्ये त्यांचे प्रेमप्रकरण किती गाजलेले. आता कुठे असतील? काय झाले असेल?
आणि अचानक माझे लक्ष गेले. ते दोघे सुद्धा आम्हाला जॉईन झाले होते. "अरे तुम्ही दोघे कधी आलात?", असे विचारत मी त्यांच्याकडे निरखून पाहीले. एकमेकांसोबत डान्स करत होते खरे.
पुन्हा एक सकाळ. पुन्हा एक दिवस. तो यंत्रवत ऑफिसच्या दिशेने जाऊ लागला.
"किती दिवस असे रटाळवाणे जगायचे? काहीतरी वेगळे करायला हवे. रिस्क घ्यायला हवी" त्याच्या मनात पुन्हा तेच सारे विचार.
आणि एके ठिकाणी कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्याने गाडी सरळ ऑफिसकडे न नेता डावीकडे एका डोंगरवाटेला दामटली. तसेही आजवर त्याला नेहमीच त्या वाटेने डोंगरमाथ्यावर जायची तीव्र इच्छा व्हायची. आज त्या इच्छेने उचल खाल्ली.
माझे स्थित्यंतर- आपुलाची संवाद आपणासी..
प्रिय,
बघ, तुझ्या करता मी ‘प्रिय’ लिहिलं, अन् मायन्यालाच अडखळले. हल्ली कुठल्याही पत्रात ‘प्रिय’ शब्द लिहिल्या जातो, तो निव्वळ सवयीने.