गावाच्या शेवटच्या टोकाला, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं. तिथंच राहायचा अर्णव, एक शांत आणि गूढ स्वभावाचा तरुण!
गावाच्या दुसऱ्या टोकाला राहायची सायली, जणू चंद्राच्या शीतलतेसारखी. सुंदर आणि हळवी!
पहिल्यांदा त्यांची भेट झाली गावातील जुना वडाच्या झाडाखाली.
सायलीला वाचनाची आवड होती, आणि अर्णवला लेखनाची.
समोर पसरलेला मोठा कोरा कागद.. त्याशेजारी कोरून ठेवलेली पेन्सिल, पांढराशुभ्र खोडरबर.. आणि कागदावर काय चित्र काढावं याचा विचार करत तिथेच अडकून पडलेलं तिचं मन.
खूप कठीण निर्णय होता हा. पण काय करणार?
हो ना. शेवटी आपलीच मुलगी ती. तिचं मन, तिची इच्छा सर्वात महत्वाची.
खरं आहे. एका मर्यादेपलीकडे आपण काही करू शकत नाही.
आता आई वडील म्हणून आपण जितकं सांगायचं, समजवायचं ते सगळं केलं. काही कमी केलं का आपण? पण काय उपयोग झाला?
आपले प्रयत्न कमी नाही पडले. पण तिचीच आतून तीव्र इच्छा होती की तिला मुलगी नाही तर मुलगा बनायचंय. तिचा ठाम विश्वास होता की ती चुकीच्या शरीरात आहे आणि तिला त्याच्यात कैदेत पडल्यासारखं वाटतंय.
परसेप्शन.. सत्य.. सौंदर्य.
मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली.
संक्रांतीची ओटी
मिनू आणी चिनूच्या वयामध्ये मध्ये अंतर होतं तिनेक वर्षांचं, पण त्या दोघी भांडायच्या मात्र अगदी बरोबरीने. त्यात कुणी लहान, कुणी मोठी नव्हतीच. ‘मी लहान आहे म्हणून माझ्यावर ती ताईगिरी करते.’ असं चिनूला वाटायचं, तर ‘ती लहान आहे म्हणून मीच का नेहमी पडतं घ्यायचं?’ असं मिनूचं म्हणणं असायचं. त्यामुळे त्यांची भांडणं ही रोजचीच.
कधी कधी अकस्मात काय घडेल काही सांगता येत नाही. मी एकदा रात्री साडे अकराच्या सुमारास मित्राकडून परत येत होतो. तो रहातो ऑक्सफर्ड पासून सुमारे 100 मैल लांब! निम्मा अधिक रस्त्ता कापून झाला होता आणि शेवटी एका हायवेला लागायचं होतं. हायवेची एक खासियत आहे. चुकून भलत्याच बाजूकडे जाणारा रस्ता पकडला की 10/15 मैलांचा फटका बसू शकतो कारण मधेच कुठे यू-टर्न घ्यायची सोय नसते. पुढचा एक्झिट घेऊन तिथे हायवे ओलांडून उलट्या बाजूचा रस्ता घ्यावा लागतो. त्या रात्री मी नेमका चुकीच्या बाजूचा हायवे धरला. अशा चुका मला नवीन नाही म्हणा! आत्तापर्यंत पुष्कळ वेळा ते करून बसलोय.
इथे या पुस्तकाचे दोन परिचय आहेत.
परिचय क्र. १ (कधीच काहीच न वाचणाऱ्यांसाठी) :
तुम्हाला वाचनाचा तिटकारा किंवा आळस किंवा निरूत्साह असेल. पुस्तक हातात घ्यायचं जीवावर येत असेल किंवा पुस्तक बघताच अंगावर काटा येत असेल. पण तरीही कधीकधी पुस्तकांबद्दल कुतूहल वाटत असेल, तर खास तुमच्यासाठी हे पुस्तक आहे-- झोरान झिवकोविचचं 'द लायब्ररी'.! अलीकडेच नीतीन रिंढे या व्यासंगी व्यक्तीनं हे मराठीत भाषांतरित केलं आहे.
फर्ग्युसनच्या ग्राऊंडवर पुस्तक महोत्सव सुरूय, १४ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ पर्यंत. फार म्हणजे फार म्हणजे फारच मोठं प्रकरण आहे. पुस्तकांचं मायाजाल वगैरे. एकदा आत शिरल्यावर माणूस चार-पाच तास शांतपणे हरवून जाईल, एवढं मोठं. तीन दालनं, त्यात सातशे स्टॉल्स. एका फेरीत एक दालनही नीट कव्हर होत नाही. पहिली धाड झाली, अजून दोन तीन वेळा तरी जावं लागेलसं दिसतंय. वर्षभराची लूट एकदमच करावी म्हणतो. विशेषतः राजकमल, राजपाल, हिन्द युग्म, वाणी, नॅशनल बुक ट्रस्ट वगैरेची गंगा वर्षातून एकदाच दाराशी येते, तर हात धुवून घ्यावेत. हे miss करणं सरळसरळ पापच होईल म्हणजे.
१. गुणवंत शाह यांचं 'अस्तित्वाचा उत्सव'.!
हे ईशावास्य उपनिषदावर आहे. म्हणजे त्यातला एकेक श्लोक चिंतनासाठी घेऊन लाईफटाईम रिलॅक्सिंग मैफिल रंगवलेली आहे. रजनीशांनीही ईशोपनिषदावर प्रवचनं दिलेलीयत पूर्वी, पण हा आशय त्याहून उजवा वाटतो.
प्रदीर्घ डिप्रेशन, सिनीसीझम, ठराविक काळाने येणारं सेल्फ डिस्ट्रक्टींग विचारांचं आवर्तन, पराकोटीची व्याकुळता, परात्मभाव, विलगता, मिनींगलेसनेस, नथिंगनेस अशा जीवन-अवस्थांसाठी हे चांगलं आहे.