भाषा
मिसइंटरप्रिटेशन - संवादांचे, वर्तणुकींचे, घटनांचे चुकीचे अन्वयार्थ
खूपदा असं होतं, की आपण आपल्याशी संबंधित बोलण्याचे, आजुबाजुच्या व्यक्तींच्या वागण्याचे किंवा वर्तमानपत्रात किंवा पुस्तकातून वाचनात येणा-या आपल्याशी अजिबात संबंध नसणा-या घटनांचेही चुकीचे अन्वयार्थ लावतो. कुणाकुणाबद्दल ओळख नसतानाही आपले काही पूर्वग्रह असतात, कुणाकुणाकडून आपल्याला चांगले अनुभव आलेले नसतात, काही वेळेला ह्यापैकी कोणतंही कारण नसलं तरी उगीचच त्यांच्याबद्दल आपलं मत चांगलं नसतं. अशा बाह्य घटनांच्या मिसइंटरप्रिटेंशन्सनी आपल्या आयुष्यावर तसा फारसा दृष्य परिणाम होत नाही.
अहिराणी लगिनघाई!
नमस्कार!
२०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' आपल्या मायबोलीने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.
त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय.
सर्वांना समजेल अशी आशा आहे..
प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय.
.....
येतील का ते दिवस...?
माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.
देह देवाचे मंदिर.
लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.
" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "
तिचा सूड....... भाग १
तिचा सूड....... भाग १
प्रीती आणि रिया...... एकविसाव्या शतकातील आणि आजच्या आधुनिक युगाला साजेश्या (प्रातिनिधिक म्हणू शकतो) अशा जिवलग मैत्रिणी. एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. प्रीती नावाप्रमाणेच प्रेमळ आणि रिया तितकीच बिनधास्त.
.....................................................................................................................................
"रिया लवकर यार.... किती स्लो चालवतेस. सगळे एव्हाना पोहोचले सुद्धा असतील आणि आपण, ६ वाजत आले तरी अजून वाईला सुद्धा पोहोचलो नाही. काय करतेयस. चल ना, पळव ना गाडी."
मराठी..... भाषा आणि जात !!!!
मराठी..... भाषा आणि जात !!!!
खूप ऐकतो, खूप चर्चा करतो....... कुठे आहे मराठी भाषा...... कशी टिकणार आपली मायबोली.....
पण मराठी भाषा म्हणजे नक्की कोणती............. कारण इथेही मराठी भाषेपेक्षा जातीवर अवलंबून असणार्या मराठी भाषेवरून मराठी माणसांतच जुंपते.
पण त्यापलीकडे आपण काही करतो का????
बघायला छोटा पण खूप मोठा प्रश्न आहे हा..................
नाही नाही, इथे पुन्हा एकदा ह्या विषयावर चर्चा नाही करणार; तर एक किस्सा सांगणार आहे..... परवाच नकळत घडलेला...... पण पुन्हा ह्या विषयावरील विचारांत घेऊन जाणारा.
फुलपाखरू
जाऊ घरी तेंव्हा तुझ्या प्रॉब्लेमवर चर्चा करू
बागेत असतानातरी बघ फूल बघ फुलपाखरू
आधी जरा डोक्यातली ही जळमटे काढूत का
मग सावकाशीने मनाचा पोटमाळा आवरू
भाडेकरारावर सही केलीच नव्हती मी मुळी
देहा तुझ्या वट्यातला हा टॅक्स मग मी का भरू
प्रेमात पडले की म्हणे दुनिया दिवाणी वाटते
होऊ शहाणे एकदा ही सोय आपण वापरू
मिष्टान्न वाढावे तश्या तू ठेवल्या एकेक ह्या
नाही कळत आहे मला मी कोणती इच्छा धरू
होते दिवेलागण , तुझा पान्हा मला हाकारतो
येते पुन्हा गोठ्याकडे माझ्या मनाचे वासरू
~वैवकु
स्वप्निल जोशी, कोण होईल मराठी करोडपती २०१६ !
शेहनशाह अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान या बॉलीवूड सुपर्रस्टार्सनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली मालिका कौन बनेगा करोडपती यंदाच्या मराठी वर्जनमध्ये घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी !
या मालिकेविषयी चर्चा करायला हा धागा !
पण नुसती चर्चाच करत बसू नका, तर खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून या पटकन..
कोणास ठाऊक स्वप्निल जोशी सोबत बसण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईलही.. 
ऑल द बेस्ट !!!!!!
आवड
तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं?
हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का? माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना?
अगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे ? विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.