मित्राने त्याच्या गावी बऱ्याचदा येण्याचा आग्रह केला होता.
एकतर त्याचे गाव बरेच दूर होते आणि हातात असलेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस सुट्टी काढून जाण्याचा योग येत नव्हता. यावेळेस त्याच्या घराची वास्तुशांती असल्याने त्याचे
आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष जवळून बघण्याचा अनुभव घ्यायला मिळणार होता. हातातील कामे थोडे जास्त वेळ काम करून पूर्ण केली.
सर्पमित्र म्हणून काही दिवस केलेल्या कामाचे अनूभव.
"मी धामापूर तलाव बोलतोय'' लघुपटाचे मुंबई आणि पुण्यात पहिल्यांदा सादरीकरण:
गेल्याकाही वर्षात आरोग्य आणि पर्यावरण विषयी जागृती निर्माण सायकल, लोकांचा कल परत सायकल वापरण्याकडे होत आहे. शक्य तिथे दैनंदिन कामांमधे दुचाकीचा वापर टाळून सायकलचा वापर करायला हवा. अनेक जण अतिशय उत्साहाने आरोग्य, पर्यावरण वगैरे कारणांनी सायकल घेतात खरे पण नव्याचे नऊ दिवस सरल्यावर ती सायकल धूळ खात पडलेली दिसते. कारण रोजच्या कामाच्या रगाड्यात ती सायकल घेऊन अगदी अर्धा किमी जायला पण जिवावर येते. ऑफिस, कामाचे अंतर वगैरे अगदी ८-१० किमीच्या परिघामधे असले तरी १०-१२ तास काम करुन परत एवढे सायकलिंग करायचा कंटाळा येतो. अशा अनेक कारणांनी माझे स्वतःचेही सायकल घेणे लांबणीवर पडत गेले आहे.
हॅलो मित्रा,
कसा आहेस? गेले कित्त्येक वर्षे, नव्हे काही दशकं आपण भेटलोच नाही. आपण गावामध्ये एकत्र हुंदडत घालवलेलं बालपण आठवलं, आणि इतक्या वर्षांनी का होईना तुला पत्र लिहावसं वाटलं.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सायकल वरच्या प्रभातफेरीला निघालो. आज रविवार असल्याने जरा लांबचा पल्ला गाठणार होतो. मावळातल्या खेड्यापाड्यातून सकाळी सकाळी सायकल चालवायचा आनंद काही वेगळाच आहे. मंदिराच्या घंटानादाशी जुगलबंदी करणारा बैलांच्या गळ्यातला घंटेचा आवाज. थंड हवेवर पसरलेला गोठ्यातील गोमुत्राचा गंध. अश्या वातावरणात सायकल चालवायचा आनंद काही औरच. अंगणात पहाटेची झाडलोट सुरु होती. एवढ्यात, अश्या सुरेल सकाळी (बे)सूर कानावर पडले. समोरच्या गल्लीत दोन बायका हे (बे)सूर आलापत होत्या. एवढ्या सकाळी भांडण? अश्या रामप्रहरी या बायांना भांडणासाठी कोणता वैश्विक मुद्दा मिळाला असेल?
मला लहानपणी, बस स्टॅण्डवर मिळतात तसली पॉकेट बुक्स वाचायची सवय लागली होती. खुनी कौन? गहरा सच, वगैरे डिटेक्टिव्ह कहाण्या वाचत बकऱ्या चारताना, शेतात बांधावर बसून, झाडावर बसून, अंगणात खाट टाकून किंवा छतावर चटई टाकून या रहस्यकथा वाचण्यात मी रंगून जायचो. मोठेपणी आपण डिटेक्टिव्ह होऊ असं ठरवलं होतं. कहाणीतील डिटेक्टीव्हने खुन्याला पकडला की, त्याची कॉलर पकडून मीच त्याला पोलिसांच्या तावडीत देतोय असं दिवास्वप्न मी पाहायचो. गावात एकमेव टीव्ही आला तेव्हा कृष्णधवल 'व्योमकेश बक्षी' ने त्या विचारांना अजून खतपाणी घातलं. मोठं झाल्यावर डिटेक्टिव्ह होता आलं नाही. पण ते कसब जागोजागी कामाला आलं.
आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच!, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील अशी भीती घालायची. आणि उत्तर दिलं की मात्र मौन भंगल म्हणून प्रेतासह परत झाडावर जाऊन लटकायचं. असा 'चीत भी मेरी, और पट भी' चा पिशाच्ची खेळ सुरु होता.
गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे चालत जाऊन सावलीत बसू शकतात त्यांनीआपलं सावलीतील अढळपद शोधलंय. पण जे चालू शकत नाहीत आणि ज्यांच्या पायांनी अन्नपाण्यासाठी जमिनीला जखडून घेतलंय ती झाडं मात्र सूर्याचा जाळ सोसत आणि पायवाल्यांना सावली देत उभे आहेत.
ब्रह्मदेवाला वाटलं एकदा
करावं काहीतरी अफाट!
पृथ्वी बनवण्याचा घेतला मक्ता
नवनिर्मितीचा गिरवत कित्ता,
पृथ्वीभोवती दिला एक पहारेकरी
त्याच्या हाती समतोलाची दोरी,
चंद्र आपला घालत राहिला गस्त
काही वर्षात तिचे हाल बघून झाला त्रस्त!
एके दिवशी म्हणाला ब्रह्माला,
हा असा नग देवा, तुला कसा सुचला?
बाकी सगळी सृष्टी चालते नियमाने,
नियम मोडायच काम हा करी नेमाने!