आपले लाडके पंतप्रधान आदर्णीय नरेंद्रजी मोदी यांनी तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन आज २७ मे रोजी एक्स व फेसबुकवरून आवाहन केले आहे. त्याचा मजकूर असा
Different parts of India are witnessing soaring temperatures and the challenges that come with it. This heat is harsh on all of us and I urge you all to take as many precautions as possible. Please stay hydrated, keep water with you when stepping out. Offer a glass of water to others. In weather like this, such kindness goes a long way.
गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे चालत जाऊन सावलीत बसू शकतात त्यांनीआपलं सावलीतील अढळपद शोधलंय. पण जे चालू शकत नाहीत आणि ज्यांच्या पायांनी अन्नपाण्यासाठी जमिनीला जखडून घेतलंय ती झाडं मात्र सूर्याचा जाळ सोसत आणि पायवाल्यांना सावली देत उभे आहेत.
उन्हाळ्याचे स्वागत आपण काय हा उन्हाळा, कधी निघून जातील हे गर्मीचे दिवस असे बहुतांश मंडळी करत असतो. घरातला उकाडा आणि बाहेरचे उन्हाचे चटके अगदी नकोसे वाटतात. पण ह्या उकाड्या आणि चटक्यांची दाहकता दुर्लक्षित करायला काही आनंददायी बाबींमुळे सुसह्य होतो. चैत्रातली चैत्रपालवीचे दर्शन घेताना भर उन्हातही डोळे रंगीबेरंगी फुलोऱ्यात अजूनही शांत होतात. निसर्गातील पळस, पांगारा, बहावा, गिरिपुष्प, सोनमोहोर, पिंपळाची कोवळी तांबूस पालवी रस्त्यात फुललेली दिसली की मन कस प्रसन्न होत.
उन्हाळा संपता संपता पावसाची लागलेली चाहूल मनाला सुखावणारी असते आणि भिजवणारीही. ढग मोठ्या धिटाईने आकाशभर संचार करू लागलेले असतात. अवचित सुर्यालाही झाकण्याचं धाडस करू धजावतात ते. उन्हाची धग कमी होते आणि चाहूल लागते पावसाच्या पहिल्या सरीची. पावसाची वाट पाहण्याचा हा काळ, उन्हाळा संपतानाचा.
तपता अंबर, तपती धरती,
तपता रे जगती का कण-कण!
त्रस्त विरल सूखे खेतों पर
बरस रही है ज्वाला भारी,
चक्रवात, लू गरम-गरम से
झुलस रही है क्यारी-क्यारी,
चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन!
डॉ. महेंद्र भटनागर...
या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते.
नमस्कार मायबोलीकरहो..
दरवर्षीप्रमाणे उन्हाळा येऊन ठेपलेला आहे. आणि उष्म्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. उन्हाळ्यात घ्यायची आरोग्याची काळजी याविषयी सर्वसाधारण माहिती सगळ्यांना असतेच. तरीही सगळ्यांनी त्यात भर घातली तर फायद्याचे राहिल.
मला माहित असलेले काही मुद्दे:
१. भरपुर पाणी पिणे. (शक्यतो माठातले).
२. उन्हात जातांना आवर्जून डोके झाकणे.
३. गॉगल्स वापरणे.
४. घाम शोषुन घेतील असे कपडे वापरणे. हलक्या रंगाचे सुती (जमल्यास ढगळ) कपडे वापरावे.
५. शक्य असेल तर दोनदा अंघोळ करणे.
६. जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगणे.
या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.
माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्यापैकी सुसह्य करतो.