आता फारसं जाणं होत नाही
की जाववत नाही कुणास ठाऊक?
पण गेलो की जाऊन बसतो
विहीरीवर तासंतास
ही विहीर बघितली की
आठवतात तुझे कथिल पाणेरी डोळे..
कधी दुथडी भरुन वाहणारे
तर कधी गहन खोल
आता विहीरीच्या काठावरती
तुझ्या डोळ्यांची आर्त ओल
दिसते मा़झी छबी खोल
पण आता थोडीशी अंधूक
विहीर होते डोळ्या देखत
ओल्या आठवणींची संदूक
इतक्यात कुणी माहेरवाशीण
विहीरीचे ओढते पाणी
मी ओंझळ पसरुन मागुन घेतो
तिच्या कळशीतले थोडे पाणी
.....
...
-सत्यजित.
शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?
घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?
रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?
बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?
कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?
मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
आठवणींचे विणले जाळे
मोहक तंतू निळे जांभळे
उन्हात नाजूक असे लाकाके
हरेक वेढा विश्व निराळे
स्पर्श सुखावह मऊ मखमली
लखलखणार्या त्या रेघांचा
वेध मना मग उगाच लागे
लकाकणार्या त्या वेढ्यांचा.
थरारली ती हिरकणी जाळी
डोळाभेट जेव्हा जहाली
भूतकाळाचा काळा कोळी
कणाकणाने पुढ्यात येई
विस्तारले कर मी माझे दोन्ही
विस्मयित मग झाला तोही
वेडावाकडा असे जरीही
आलिंगन मी दिले त्यासही.
द्रुष्टीआड जरी काल लपवला
तरी तोही माझा, तोही माझा.
कितीक सारे मित्र 'च्याटले' फेसबुकावर
तुझे नि माझे नित्य 'फाटले' फेसबुकावर.
गल्लीमधली पुसती सारी 'कोण पाहुणा ?'
'विश्वची माझे सगे' वाटले फेसबुकावर.
सोशल त्याचा श्वाश जाहला, जगणे झाले
झुकरबर्ग ने द्रव्य लाटले फेसबुकावर.
अण्णा, बाबा सांगत सुटले 'देश वाचवा'
दुकान त्यांनी नवे थाटले फेसबुकावर.
प्रकांड ज्ञानी सवे बैसुनी चर्चा करती
कसे कुणाचे नाक छाटले फेसबुकावर.
आम्हास अमुचे पुस्तक प्यारे, छापुन घेऊ !
कसे रमेशा शब्द बाटले फेसबुकावर ?
- रमेश ठोंबरे
या देशाने काय पाळले गांधी नंतर ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर.
विटंबनाही रोज चालते इकडे-तिकडे
पुतळे कसले, तत्व जाळले गांधी नंतर
देश बदलला, देशाचा गणवेश बदलला
खादीलाही नित्य टाळले गांधी नंतर
शस्त्राहुनही खणखर असते निधडी छाती
हिंसेपुढती रक्त गाळले गांधी नंतर
गांधी 'हत्या' 'वध' ठरवण्या आमच्यासाठी ?
इतिहासाचे पान चाळले गांधी नंतर
देश आमचा गांधीवादी सांगत सुटलो,
नथुरामाला किती भाळले गांधी नंतर ?
नको 'रमेशा' निराश होऊ कातरवेळी
'राजघाट'ने नेत्र ढाळले गांधी नंतर.
मराठी प्रेम गीत.
व्हिडिओ फक्त चाल समजण्यासाठी पहा.
गाणं आपल्याला गायचं आहे.
तूं माझ्या हृदयी गे
तूं माझ्या हृदयी गे
वसली गे वसली गे
माझ्या श्वासांनागे
तूं सांगे तूं सांगे
आलिंगनी येउनी तूं
स्वप्नी तूं हरखुनी घे
तूं माझ्या हृदयी गे,
वसली गे वसली गे ॥धृ॥
पागल झालो मी बघ गे
प्रेमज्वराने पिडलो गे
हळूच जवळ तूं आली गे
न कळत हृदया कळले गे
नाही कुणाची भीती गे
जीवन मरणी साथी गे
तूं माझ्या हृदयी गे,
वसली गे वसली गे ॥१॥
जग नाकारे मजला गे
ही अशी माणसे
चेहरा नव्हता तयांना अन् नव्हते नावही
ना कोणता धर्म होता,पंथ, नव्हते गावही
माणसांची जात त्याच माणसांनी होती राखली
दुर्बलांची पापे सारी त्यानीच होती झाकली
जी माझ्याइतकीच जवळची वाटली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला
गर्दीत होते मिसळले पण त्याहुनी ते वेगळे
का होते वेगळे ते त्यांचेच त्यांना ना कळे
विलसणारे हास्य होते, गीतात होती वेदना
अंतरांचे प्रांत जिंकू हीच होती कामना
जन त्यांच्या प्राक्तनाची कोठली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला
ते न होते वीर कोणी, वा न होते षंढही
सांप्रताच्या या युगाशी त्यांनी न केले बंडही
गावाचं घर
तुटायची सर
उठायचा दर्वळ
भिजलेल्या ढेकळांना
आठवायची हिरवळ
उगवायचा सूर्य
रांगायचं ऊन
वासूदेवान वाड्याला
ऐकवायची धून
व्हायची दुपार
तपायचं रान
गळणाऱ्या घामाला
रहायचं ना भान
यायची सांज
विरायची धग
सारचं काही
आठवायचं मग
पडायचं चांदणं
लागायचे दिवे
निजलेल्या डोळ्यात
जगायचे थवे
दिवसामागून रात्रीचा
गळायचा प्रहर
शहराच्या मनात
गावाचं घर
गेला श्रावण मला खूप सुखावून गेला
कारण माझ्याही नकळत
‘ तो ‘ माझ्या आयुष्यात आला.
तो आला माझ्या आयुष्यात
तेव्हा कळलं
यालाच प्रेम म्हणतात.
मग मी वहातच गेले
प्रवाहासारखी खळाळून गात गेले
मी विचारलं त्याला, ” आपण कोण आहोत ?”
तो म्हणाला, ” आत्मा एक असलेली
वेगवेगळ्या ठिकाणी धडधडणारी दोन हृदयं.”
मग आम्ही दोन हृदयांना एक करण्यासाठी धडपडलो
वेळ पडली तेव्हा प्रवाहाच्या विरुद्धही पोहत गेलो.
मग लाभला आयुष्याला एक नवा सूर
कधी आनंदाचा पूर
कधी विरहाची हुरहूर
चिवचिवणारे पक्षी, आभाळातली नक्षी
वाटलं निसर्ग आपल्या प्रेमाला साक्षी……..
……………..
………………