अध्यात्म

ज्ञानेश्वरी - गुपिते

Submitted by महेश ... on 22 February, 2017 - 01:34

ज्ञानेश्वरी अध्याय १५ पुरुषोत्तम योग

एक वादळी जीवन: ओशो!

Submitted by मार्गी on 25 January, 2017 - 00:05

एक वादळी जीवन: ओशो!

सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.

विषय: 

दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

Submitted by मार्गी on 18 September, 2016 - 12:10

प्रिय अदू. . . .

काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . .

देह देवाचे मंदिर.

Submitted by Suyog Shilwant on 9 September, 2016 - 17:37

लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.

" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई!"

Submitted by मार्गी on 8 July, 2016 - 00:50


सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद.

|| ॐ ||

दि. २७ एप्रिल २०१६

ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!

मी आणि माझे अध्यात्म

Submitted by पशुपति on 20 April, 2015 - 02:59

५८ वर्षांची सर्व्हिस झाल्यावर मी रिटायर व्हायचे ठरवले. कंपनीने मला २ वर्षांचे एक्स्टेंशन दिल्यामुळे ६० वर्षांपर्यंत मी काम केले. ५८ व्या वर्षी विचार केला पुढच्या २ वर्षांत विचार करूया साठीनंतर काय करायचे! पण २ वर्षे गेली तरी माझ्या डोक्यात काहीच आलं नाही...पण २ वर्षे तर निघून गेली. आणि मी पूर्णपणे वेळ रिकामा ठेवून रिटायर झालो. अशी ही माझी रिटायरमेंटची कथा. अनेक लोकांनी अनेक प्रकरचे सल्ले दिले. कोणी म्हणाले पुण्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम चालू असतात. रोज एकेका कार्यक्रमाला जरी गेलात तरी तुम्हाला वेळ पुरणार नाही.

शब्दखुणा: 

आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ - रसग्रहण, दिव्यबोध आणि तिरोभाव

Submitted by ब्रह्मांड आठवले on 7 July, 2014 - 11:12

भरतवर्षात चलच्चित्रपट जनतेस प्रिय झाल्याने कवींनी पार्श्वभागी वाजणा-या गीतांकरिता कविता लिहीण्यास सुरुवात केली. हिंदी नामक भाषेच्या चलचित्रपटांच्या सुवर्णकाळी अमिताभ बच्चन नामक देवाने जनतेस दर्शन देऊन बोध दिला. याकामी या दिव्यवाणीस एका पवित्र आणि आनंदी आत्म्याची साथ लाभली ज्यास सामान्य गण भप्पी लाहीरी या सामान्यनामाने ओळखत. अंजान या विशेषनामाने प्रत्यक्ष भगवंताचेच शब्द या स्वरसाजातून जनतेत रुजले ते असे..
प्रथम परीच्छेद (कडवे)

अरे अरे अरे ना ना ना...
आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ
आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ
हमें जो उठैइओ तो - 2, खुद भी रपट जैययो
हा खुद भी फिसल जैययो

सत्संगती आणि अनुभव

Submitted by पुरंदरे शशांक on 22 May, 2014 - 07:26

सत्संगती आणि अनुभव

मी स्वतः स्वामीजींचे (स्वामी स्वरुपानंद, पांवस) दर्शन घेऊ शकलो नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले त्यांच्याकडूनच स्वामीजींसंबंधीच्या आठवणी मला ऐकायला मिळाल्या.
सर्व साधारणतः कुठल्याही संतांकडे जेव्हा कोणी जातो तेव्हा त्याला या संतांनी केलेल्या चमत्काराचे फारच अप्रूप असते. त्या चमत्कारांबाबत ऐकण्या-बोलण्यातच त्याला सार्थकता वाटते.
मात्र काही असेही लोक असतात की जे स्वतः पारमार्थिक साधना करत असतात. स्वामीजींसारख्या संतांकडून त्या साधनेच्या संबंधी काही मार्गदर्शन मिळाले तर ते घेण्यासाठी ते जात असतात.

" मी "

Submitted by राहुल नरवणे. on 5 July, 2013 - 09:46

वर्तमानाला पडलेलं सुखद स्वप्नं
की, भविष्य काळाची काळजी.
जगाला पडलेला प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.

जगण्यातला तोच रटाळपणा
कि, वेगळेपणाचा घाट.
जगताना पडलेले अनेक प्रश्न
कि, उत्तर न शोधता घालवलेलं आयुष्य.

कला, साहित्य, संस्क्रती, अध्यात्माचा पाठपुरावा
कि, वासनेच्या भरात, परकीय संस्क्रतीत वाहत जाणारा भ्रष्ट समाज.

मी प्रतिक कोणाचं
आणि आदर्श कोणासाठी ?

मी पडलेला एक प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.

प्रांत/गाव: 

ताटकळलेला बुद्ध.

Submitted by आदित्य डोंगरे on 16 May, 2012 - 16:17

ताटकळलेला बुद्ध.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - अध्यात्म