दररोज अंगवळणी असले तरी
एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते
मग चुकत जातात हळूहळू
शंका कुशंकांची त्रिकोणे
आणि आपला शोध फिरत राहतो
गोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावर
माणसं येतात, स्पर्शून जातात
स्पर्शिकां सारखी, वर्तुळ भेदू शकत नाहीत
आपण आतच अडकून पडतो
चक्रव्यूहात...अभिमन्यू बनून
गावात प्रेमाचा पूर येतो, कविता वाहतात
गाव उध्वस्त होते, पूर ओसरून जातो
मागे उरतो, तो फक्त आठवांचा चिखल
गावात पसरलेला भावनांचा कुबट वास
विश्वासाच्या उडालेल्या चिंधड्या चिटकून
राहतात प्लास्टिक सारख्या...बाभळीला
प्रिय अदू. . . .
काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . .
माणूस.....
कसं विचित्र द्वंद्व चालू असते....
...आपल्या आतच ....
एकीकडे स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो
पण गाडीची डिलिव्हरी "अमावस्येला" नको म्हणतो
का शनिवारी काही देवळांसमोर लांब रांगा लागलेल्या
एका हाती ब्लॅकबेरी, दुसर्या हाती तेल घेतलेल्या
कुठून आलो या जगात ठाव काही लागत नाही
कुठे जाणार शेवटी ते ही ठाऊक नाही
कुणी म्हणो विज्ञानवादी कुणी म्हणो दैववादी
माणूस अखेर माणूसच .....
कळसूत्री बाहुल्यासारखा .....
दृश्य - अदृश्याच्या दोर्यांवर ....सदैवच लोंबकळणारा !!!!