मन, पाऊस....
काळे काळे ढग येता
जाते सारे अंधारून
मन बसे कोपर्यात
बावरून सुनसान
येती थेंब टपटप
एक साखळी धरून
लय भिनता पुरती
चिंबतान होते मन
भिने गारवा मनात
पुन्हा पुन्हा थरारुन
मूकपणे गाळी आसू
जाते थिजून थिजून
काळी रात्र सरे जेव्हा
येई पुन्हा उजाडून
ऊन्ह रेशमी बिलगे
मन जाई आसावून
कोंब इवले नाजूक
ऊन्ह झेलती मस्तीत
कंच हिरव्या ओठांत
दहिवर चमकत....
कधी खुळं, कधी शहाणं, कधी भाबडं, कधी कलंदर. आपल्याशी सतत बोलणारं, तरीही कधीच नीटसं नं कळणारं, मन आपलं.
मानवी जीवनात प्रयेकालाच नैरश्याचा सामना करावा लागतो. कारणंं वेगवेगळी असली तरी तो अनुभव सारखाच असतो. या काळात अनेक लोक आपल्याला काही बाही सांगत असतात पण आपल्या निगेटीव्हीटी नैराश्य यावर त्याचा काहिही परिणाम होत नाही. अनेकजण बरेच ऊपाय सांगतात पण ते त्यावेळी खरच डीप्रेस किंवा निराश नसतात. माझ्यामते नैराश्य आलेल्या माणसाने दुसर्या नैराश्य आलेल्या माणसांशी बोलायला पाहिजे. तर हा धागा तुमच्या डिप्रेसीव्ह विचारांसाठी. तुमच्या आयुष्यातील निगेटीव्ह गोष्टी इथे लिहा.
कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली.
जेथे जातो तेथे मी माझा सांगाती
पुढे आणि पाठी मीच माझ्या
मीच माझी वाट मीच माझा दिवा
हि-याचा ताजवा मीच माझ्या
मीच माझी रुपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यात मीच त्यांना
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला
अशी माजी चाले नित्य मम पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे
एका सुंदर कार्यक्रमाहून परतत होते. गवयाचा गळा तापतो तशी माझीमाझीच मनाची मैफलही रंगली होती. त्याच तंद्रीत सिग्नलला उभी असताना अचानक एक अगदी टिपेचा चिरका स्वर कानावर पडला. थांबलेले सगळेच चमकून पलिकडच्या फुटपाथकडंं बघायला लागले आणि तिथंच खिळले. मीही रेंगाळलेच क्षणभरासाठी, खोटं का बोला, पण नशिबानं झटकन भानावर येऊन मान वळवली.
धुरकट झालं सारं
भरारलं वारं
मोतीपवळ्याचं लेणं
उतरलं धरतीवर
वीज लकाकता आकाशी
अवघी धरा उजळली
माय लेकराची मग
मनोमन भ्याली
पाखरू बावरे
घरट्यातच वावरे
उब घराचीच करी
सर्वा आश्वस्त
उधानलं नदी नालं
ओढ कशी आवरु
सासुरवाशीण सई
लगबगीत माहेरा जाई
असा ओलेता उत्सव
झाले हिरवे रान
शिळ घालिते कसे
आज उनाड मन
लहानपणी निरागस असतं
जसं देवाघरचं फूल असतं
पाप-पुण्याच्या बाहेर असतं
द्यायचं घ्यायचं काही नसतं
.
तरुणपणी भावनाप्रधान असतं
सगळं जग सुंदर दिसतं
हळुवार क्षणी कोणावर तरी जडतं
मग आपल्या हातात काही नसतं
.
उतारवयात हळवं होतं
गतस्मृतीत जास्त रमतं
दुःखद आठवणींनी डोळे टिपतं
आता सगळं विसरायचं असतं
.
मन खरं तर मुक्त असतं
उगाच वयाचा चष्मा चढवतं
कधीतरी वयाला चुकवायचं असतं
मनाला मनासारखं वागू द्यायचं असतं
.
ही गझल मायबोलीवरुन मी स्वत: वैयक्तिक कारणामुळे काढुन टाकत आहे.
मनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग २)
(संदर्भासाठी: गौतम बुद्धांच्या ध्यान पद्धतीवर संशोधन झाले असून, त्याचा उपयोग मानवी जीवनास व्हावा या हेतूने जगद्विख्यात वैज्ञानिक, मानसोपचार तज्ज्ञ, तत्वज्ञ, डॉक्टर्स, न्यूरो -सायंटिस्ट, आणि दलाई लामा यांच्याबरोबर ‘ माईंड अँड लाईफ XIII ‘ या नावाने २००५ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सि येथे घेतल्या गेलेल्या परिषदेमधील काही वक्त्यांचे निवडक विचार येथे देण्याचा प्रयत्न करत आहे. परिषदेचा विषय होता ‘द सायन्स अँड क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑफ मेडिटेशन’.)
भगीरथ तप तुटो
जटा सुटो
अवतरलेल्या गंगेला
पुन्हा प्रवाह फुटो....
खांब तुटो
शिळा फुटो
गाभाऱ्यातल्या देवाला
पुन्हा देहभान सुटो
किनारे तुटो
गुरुत्व सुटो
माणसांच्या धरित्रीला
पुन्हा विनाश नांदो
भाव तुटो
सत्व-रज-तम सुटो
उपद्व्यापी चैतन्याला
पुन्हा निराकार मिळो...
चितस्थधि