गोष्ट एका वेन्धल्याची
स्वतःच्या अस्तित्वाची
दमलेल्या स्वप्नांची
गुरफटलेल्या नात्यांची
आणी अजाण वाटेवर चालणाऱ्या
माझ्या त्या निष्पाप मनाची
काळजावर पाय ठेवून
तरी मी चालतच होतो
अनुत्तरीत प्रश्नांची
उत्तरे मी शोधत होतो
आणी समजूत मी काढत होतो
माझ्या त्या निष्पाप मनाची
वाटेत त्या मला भेटले ते अनेक
रखडत रखडत चालत होता तो प्रत्येक
झुंज होती त्याची त्या दिवसाची
अपेक्षा होती ती उद्याच्या आनंदाची
अशीच एक आशा होती
माझ्या पण त्या निष्पाप मनाची
चालताना त्या वाटेत आला होता वीट
नकोसा वाटला असेल आयुष्याला त्या मी
हरता हरता पुरता हरलो होतो मी
विचारांचे चक्र आणि चक्राकार विचार कधीकधी डोके भंडावून सोडतात. हे सर्व का कशासाठी? कोणासाठी? कधीपर्यंत? चिचार आणि भाषा खरे तर आपणच तयार केलेली, आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजून घेता यावा आणि त्याप्रमाणे आपल्याला क्रिया करता यावी, आपले निर्णय घेता यावेत, सर्वांशी संवाद साधता यावा आणि तोही दर्जेदार, म्हणून. पण कधीकधी आजूबाजूला इतके काही घडत असतं- गोष्टी, बातम्या , शब्द ह्यांचा भडीमार होत असतो को त्यातले अचूकपणे काय घ्यावे आणि काय सोडावे समजत नाही.
चेहऱ्यावरील स्मितहास्य - खरोखरीच, किती सुंदर अभिव्यक्ती आहे ही! तुम्ही अशी माणसे पाहिली आहेत? हो, हो! निश्चितच पाहिली असतील! अशी माणसं कि ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य असते! आजकालच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात चेहऱ्यावर एखादे वेळेस उमटणारे हसू हे सुद्धा फार दुर्मिळ झालाय! मग कायमच्या स्मित हास्याची काय बात? पण अशी माणसे समाजात काही वेळेस आढळतात! स्वतःशीच गुणगुणणारी, स्वतःच्याच नादात असणारी, चेहऱ्यावर लोभसवाण हसू बाळगणारी! जणू विधात्याने समाजात पेरलेले देवदूतच!
मन का सैरभैर ?
दावा माझ्याशी ,
अन,उगाच हाडवैर
गैर न त्यात ,
दिली थोडी ,
त्यासही मुभा ,
नसता उच्छाद ,
अन मांडावा का ,
सवतासुभा ?
बजावले कितीदा ,
लावावी किती,
ती व्यवस्था ?
कटाक्ष एकच
तिचा,अन,
ह्याची ही अवस्था ?
माझ्या मना
माझ्या मना तू माझ्या मना
मला तू तरी समजून घे ना
उगा नको तू प्रश्न विचारू
उत्तर मला माहीत नसेल ना
न ऐकले तुझे अन भेटलो तिला
का भेटलो तेव्हा ते मला कळेना
दुर ती गेली निघूनी सोडून मला
आठवण तिची कधी काढू नको ना
होती का काही तिची मजबूरी?
ती तरी का सांगेल कोणा?
असेल का रे स्थिती तिची अशीच
माहीती का तुला? तू मला सांग ना!
- पाषाणभेद
या मनाचं सालं काही समजत नाही
जडल कुणावर काही उमगत नाही
लाल हिचे गाल कधी
लांब तिचे केसा कधी
घारे हिचे डोळे कधी
गोरा तिचा रंग कधी
भावल कुणाच काय नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही
जाईल तिथं घात करील
दिसेल तिला डोळा मारील
ही आली, धड-धड झाली
चाल तिची तुडवून गेली
कुठ काय कधी होइल नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही
आज पहा हिच्या प्रेमात
उद्या पहा तिच्या नादात
आज म्हणे "ही चांगली"
उद्या म्हणे "तीच बरी"
एकीवर पक्कं कधी बसताच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही
सांगावयाचे होते काही
परि शब्द आठवेना
कुंचल्याने यत्न केला
तरि रंग सापडेना
गाण्यात भाव बांधू
ताल-सूर ही जूळेना
हा प्रांत नाही माझा
विसरावे कसे कळेना
------------------------
http://anujit.wordpress.com/
आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं
असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ...
का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं ..
बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली.
खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता.
समोर रक्ताचा ओघळ वाहत असताना
त्याला सहन करतो पांढरपेशी माणूस
रक्ताला सरावलेली पावलं
घसरत नाहीत त्यावरून
आणि निर्ढावलेलं मन
बघू शकतं,
दुसरया मनांच्या झालेल्या चिरफाळ्या
थंडपणे
------------------------------------------------------------------------------------
माणसाला स्वप्नांची सवय झाली आहे
सुंदर, सुखी आणि आनंदी
माणसाला वास्तव नाही पचवता येत
कारण ते कटू असतं
वास्तवाच ओंगळ आणि गलिच्छ अस्तित्व
त्याला मान्य नसतं
आणि अशा वास्तवाचं दर्शन झाल्यावर
तो कोलमडून पडतो
------------------------------------------------------------------------------------
इथे मरण महाग आहे
मी एक अश्वत्थामा
मी एक अश्वत्थामा
वाहतं मन घेऊन फिरणारा
जगाच्या कुठल्याश्या कोपरयात
समदु:खी शोधणारा
मनाच्या भळाळत्या जखमेवर
दवापाणी शोधणारा
आणि सतत गर्दीत असूनही
सलग एकाकी असणा्रा
नाही मी चिरंजीव
पण वाहतं मन आहेच
म्हणूनच ठरलो कदाचित
मी एक अश्वत्थामा