डिस्क्लेमर - मी काउन्सिलर नाही की मानसोपचारतद्न्य नाही. फक्त एक अनुभव मांडते आहे.
रावपाटील यांची ( मोठी हो म्हणावंसं वाटत नाही) ही कविता वाचली, जी की त्यांनी अन्य एका याच विषयावरील, कवितेवरती 'प्रतिक्रिया' देताना, पोस्ट केलेली आहे. मनात विचारांचे तरंग उमटाले. ही कविता, माझ्या मते 'चाइल्ड ॲब्युझ किंवा गर्दीतील ओंगळ धक्के' या विषयास स्पर्श करते. तसे नसल्यास चू भू द्या घ्या.
इमारतीच्या घनदाट जंगलातून
मेंढर कोंबलीत दाटीवाटीने,
आता हळूहळू पडतील बाहेर.
मेंढर आता बदललेली असतील,
स्वाभिमानशून्य, लबाड ,लोभी
एक नवीन च जमात तयार होईल .
एक मेंढरु गेलं की अनेक धावतील ,
नवनवे शोध लागतील आता .
ओरबडण्याच्या पद्धती जुन्याच पण शक्कल नवी.
शोषणाच्या जाती जुन्या पण प्रयोग नवे.
दोघेही खुश लुबाडणारा न् लुबाडून घेणारा.
एकदा मान खाली घालून चालायचे ठरले
की.............निमुटपणे
कळपाने चालायचे,
कुठे जायचे माहित नाही,
कुणासोबत जायचे माहीत नाही.
कळपाला लागतो एक नेता,
डिस्क्लेमर: हा अनुभव "आपल्या आयुष्यातले थरार" अशा एका धाग्यावर पूर्वी मी प्रतिसाद म्हणून लिहिला होता. तोच इथे वेगळा धागा म्हणून चिकटवत आहे. त्यामुळे ज्यांनी आधी वाचलाय त्यांच्यासाठी पुनरुक्ती होईल. पण माझ्या लिखाणाच्या यादीत या अनुभवावर सुद्धा लेख असायला हवा असे वाटल्याने हा कॉपीपेस्टप्रपंच. शिवाय, मला लागलेल्या ठेचेमुळे योग्य तो बोध घेऊन पुढचे काहीजण व काहीजणी शहाणे होतील हा सुद्धा हेतू.
---
आमच्या बिल्डिंगमधून खाली उतरलात कि लगेच चौक लागतो. नेहमी गजबजलेला. अगदी प्रातिनिधिक असा. चार रस्ते चार बाजूंनी अस्ताव्यस्तपणे एकत्र येतात तिथे. एका कोपऱ्यातलं वाण्याचं दुकान फूटभर रस्त्यावर आलेलं असतंय. तिकडे तो भाज्या मांडतो. वरती लावलेल्या हिरव्या रंगाच्या दिव्याने त्या दिवसभर ताज्या दिसत राहतात. दुसऱ्या कोपऱ्यात चहावाल्याने त्याचा संसार थाटलाय. त्याने दुकानासमोर टाकलेल्या बाकड्यांवर दिवसभर गर्दी असते. एखादे टोपीवाले आजोबा, रोजंदारीवरचे मजूर, समोरच्या स्टॅन्डवरचे रिक्षावाले, काळ्या काचांच्या गाडीतून उतरणारे "गुंठामंत्री" आणि असे कित्येक जण. त्याबाजूलाच पोहे, मेदुवडा, इडली मिळते.
थिजल्या नजरेने समोर पडलेल्या अचेतन देहांकडे ती सगळी पाहत होती.
"काय करायचं?" बाक्रे गुरुजी स्वत:शीच पुटपुटले.
"’ऑफ’ झाले पाहता पाहता." बाक्रे वहिनी मृतदेहांकडे निरखून पाहत होत्या.
" ’ऑफ’ काय? बटण आहे का माणूस म्हणजे? काहीही तारे तोडता." बाक्रे गुरुजींचा अगदी संताप संताप झाला.
"सगळे तेच म्हणतात म्हणून म्हटलं." वहिनींची नजर अजूनही आजूबाजूला पडलेल्या देहांकडेच होती. कसेबसे त्या दोघांनी सगळे मृतदेह एकाठीकाणी आणले होते.
"काय करायचं ते सांगितलं नाहीत." गुरुजी खेकसले.
हात आहेत प्रत्येकाला दोन .
त्याचं काही कौतुक नाही ,कारण हात सगळ्यांनाच आहेत . सगळ्यांनाच असणारे दिवस-रात्र सोबत असणारे हात ईश्वरी रुपांप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपात समोर येतात.
चला हातांची विविध रूपे आपण पाहूया.
स्वतःचं पहिलं अपत्य हातात घेऊन नर्स येते आणि आपल्या हातावर आणून ठेवते ,आपण त्याला उराशी कवटाळतो ते हात .
पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करणाऱ्या बाळाचा हात हातात घेऊन चालवणारे हात.
लेखनाचा श्रीगणेशा करताना लेखणी हातात धरून लिहायला लावणारे हात आणि लिहून घेणारे हात.
प्रेयसीचा हात हातात धरून प्रेमाची पावती मागणारे प्रियकराचे हात .
आज माझा या परदेशतील शेवटचा दिवस होता. विमानात बसल्या बसल्या इथे घालवलेला काळ एखाद्या चित्रपटा प्रमाणे माझ्या नजरेपुढून सरकू लागला.
भारता पासून हजारो मैल लांब असलेल्या या परदेशात गेली कित्येक वर्षे मी इथे कामानिमित्त काढली. सुरवाती सुरवातीला हा अनोळखी देश, इथली अनोळखी लोकं आणि अनोळखी संस्कृती बघून दचकायला होत होतं. त्यामुळे मी थोडासा बुजूनच वावरत असे. पण ती अवस्था जास्त काळ टिकली नाही कारण सुदैवाने काही दिवसांनीच एका मॉल मध्ये गरजेच्या वस्तू खरेदी करायला गेलो असताना मुळचा पाटना येथील असलेला एक बिहारी व्यक्ती मला भेटला.
बर्याचदा आपण व्यक्त होतान उस्फूर्तपणे होत असतो. सोशल मिडियाही त्याला अपवाद नाही. त्या त्या वेळी उठणारे मानसिक, वैचारिक तरंग हा तात्कालिक घटक प्रभावी ठरत असतो.कधी तो स्कोअर सेटलिंगचा भाग असतो. वैचारिक उन्माद व्यक्त करणार्यात बुद्धीदांडग्यांना प्रतिक्रिया देताना संयत असणे आपण विवेकी मानतो.परंतु उन्मादाचा प्रभाव असणार्या् व्यक्तिच्या मेंदुपर्यंत ती पोहोचते का?
कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर
पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही.
आज तु फारच छान दिसत आहेस संजना... संजनाकडे बघत अक्षय म्हणाला.
Thank you... संजना लाजत म्हणाली.
तुझे हे सौंदर्य मी अजून जवळून बघू शकतो का संजना...संजनाच्या जवळ जात अक्षय ने विचारले.
अक्षयला आपल्या इतक्या जवळ येताना बघून संजना गोंधळली.. जसे अक्षयची पाऊले संजनाकडे वळली तसे आपसूकच संजनाची पाऊले मागे झाली.
अक्षयला कसे थांबवावे हे तिला कळत नव्हते. तर तिचे मागे सरकणे म्हणजे ती आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी परवानगी देत आहे असे अक्षयला वाटले.