समाज

स्नेहीभेटी का करतात?

Submitted by राजसी on 24 June, 2020 - 11:18

सध्या कोरोनामुळे आमच्या सोसायटीमध्ये visitors ना येणे allowed नाहीये. मे च्या शेवटच्या आठवड्यापासून maids ना re-entry allow केली होती. बाकी फक्त दूध, भाज्या, औषधे, किराणा, अवजड वस्तू ह्या गोष्टींची doorstep delivery allowed आहे. पैशाला पासरी जे e-retail packages येतात ते एका coomon रूम मध्ये ठेवून मग लोकांनी तिथे येऊन घेऊन जायचे अशी सध्या सिस्टिम आहे.

ऑनलाईन शाळा

Submitted by सखा on 21 June, 2020 - 10:53

सध्या शाळांचे शिक्षक ऑनलाइन मुलांना शिकवत आहेत. शिक्षक आणि लहान मुले या दोघांची पण नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना खूप पंचाईत होत आहे. बऱ्याचदा शिक्षक म्युट वर असतात आणि ते बिचारे तळमळीने बोलत राहतात पण मुलांना ऐकू येत नाही.
अनेकदा पालकांना आपला व्हिडिओ म्यूट कसा करायचा हे माहीत नसतो त्यामुळे घरातले नको ते संवाद आणि आवाज सर्वजनिक होतात.
अगदीच लहान मुलांचा अटेंशन span कमी असतो त्यामुळे पडद्यावर चित्र इंटरेस्टिंग दिसले नाही तर ती पाच मिनिटातच कंटाळतात.

गेम

Submitted by सखा on 17 June, 2020 - 00:54

मी त्या कंपनीत काम करत असताना माझ्या हाताखाली एक सिनिअर मॅनेजरचे रिपोर्टिंग देण्यात आले. त्याला एक महत्वाचा प्रोजेक्ट दिला होता परंतु अनेक महिन्यापासून तो पूर्ण होत नव्हता त्यामुळे मॅनेजमेंट त्याच्यावर नाराज होते.
दोन मीटिंगमध्ये माझ्या असं लक्षात आलं की या माणसाकडे उत्तम टेक्निकल कौशल्य आहे मात्र त्याच्याकडे संभाषण आणि लीडरशिप क्वालिटी नाहीत. माझ्या असंही लक्षात आलं की त्याच्या हुशारीची जाणीव सगळ्यांनाच आहे मात्र आता सगळ्यांनी ठरवूनच त्याला वाळीत टाकायचे ठरवले आहे आणि प्रत्येक दिवशी लोक आज "इस्को साले को कैसा मजा चखाया" यावर बोलत.

समाजकारण आणि इन्ट्रोव्हर्जन

Submitted by अननस on 16 June, 2020 - 01:01

काल सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सिनेसृष्टी हादरली. ज्यांचा सिनेसृष्टीशी निकटचा संबंध नाही असा समाजही इतक्या तरुण, गुणी, यशस्वी आणि उमद्या कलाकाराच्या आत्महत्येने हळहळला. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी याचे मागणी त्याच्या घरच्यांनी केली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. एका प्रशोंत्तरात श्री सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एकूण होणाऱ्या आत्महत्यांनी व्यापकता सांगितली,वर्षांला साधारण पणे  ८ लाख आत्महत्या होतात ही संख्या दहशतवाद, युद्ध (सीरियन युद्ध यासारखे अपवाद सोडता), खून यापेक्षा जास्त आहे.

साडी

Submitted by आर्त on 15 June, 2020 - 03:16

ती ओरडत असते,
तिच्या आत्मेच्या देठापासून,
तिच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला,
दाहिदिशी पसरलेल्या दमट अंधारात,
कुणा तारकाचे लक्ष वेधायला.

तो अंधार काही ह्या जगातला नाही,
रात्र संपल्यावर पळणारा,
सूर्य अस्तित्वात नसलेला अंधार तो,
कालही तितकाच अनंत,
उद्याही तितकाच असणारा.

पण मला ऐकू येतंय ना,
फक्त मलाच.

साडीतच आली ती ह्या जगात,
भरजरी, मोररंगी प्रेतवस्त्रात,
त्याच्या चिवट विळख्यात तिला जन्मताच डांबले,
हात-पाय मारून श्वास आणखी तिचेच खोळंबले,

प्रभात फेरी (morning walk after lock down)

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 June, 2020 - 12:05

प्रभात फेरी (morning walk)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सैल झाल्यावरती मॉर्निंग वॉकसाठी निघणारी प्रचंड गर्दी पाहून सुचलेली ही कविता कदाचित ही कविता त्यांच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते .(जी मुर्खपणा आहे)
प्रभात फेरी मारू या
चला निरोगी राहू या
तोंडास मास्क लावुया
शुद्ध हवा नि घेऊया ॥
लॉकडाऊन संपला
चला चला चालायला
बुट ट्रॅक सूट घाला
त्वरा करा फिरायला ॥
तुज मिळे का मजला
जागा उभा रहायला
भीती आता ती कुणाला
पोलिस नाही रस्त्याला ॥
काय म्हणता कोरोना ?
झालाय आता तो जुना
बसलो घरी महिना

विषय: 

वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.

विश्वाचिया आर्ता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 June, 2020 - 04:48

विश्वाचिया आर्ता
***************
पांगुळले जग
चालवी रे दत्ता
हरवूनी सत्ता
विषाणूंची ॥
भिंगुळले डोळे
तोषवी रे दत्ता
दावूनिया वाटा
रुळलेल्या ॥
घाबरले जन
सावर रे दत्ता
बळ देत चित्ता
विश्वासाचे ॥
हरली उमेद
जागव रे दत्ता
चालण्यास रस्ता
दृढ बळे ॥
आणि चालणाऱ्या
सांभाळ रे दत्ता
शितल प्रारब्धा
करुनिया ॥
थांबव चालणे
वणवण दत्ता
निर्विष जगता
पुन्हा करी ॥
विक्रांत मागतो
तुजला श्री दत्ता
विश्वाचिया आर्ता
धाव घेई ॥
****

शब्दखुणा: 

NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण.

Submitted by सखा on 27 May, 2020 - 17:41

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांबद्दल साधारणपणे एक दुटप्पी धोरण असतं असा माझा अनुभव आहे.
खरं म्हणजे परदेशात जाणं आणि तिथेच स्थायिक होण हे एक फार मोठं डिसिजन असत आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु दुसऱ्याच्या या खासगी जीवनात नाक खुपसायची सवय असल्यामुळे आपल्याकडे त्याची चर्चा होतेच. बहुतेक वेळा टाकल आईबापाला इथं आणि तिकडे मस्त मजा मारत आहेत असे एक करूण चित्र उभे केले जाते. माझ्या मते ते फार स्टरियोटाइप आहे.

Pages

Subscribe to RSS - समाज