समाज

कायद्यासमोर सर्व समान?

Submitted by सचिन पगारे on 24 February, 2021 - 06:44

सध्या महाराष्ट्रात जे पुजा चव्हाण हीच्या मरणा वर राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्र युपीच्या रांगेत उभा राहतोय की काय असे वाटण्याजोगे दुर्दैवी आहे. एक जीव गेलाय त्यावर राजकारणी त्यांची पोळी भाजत आहे. ज्या मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध आहे असे बोलले जातेय तो मंत्री बारा दिवस पसार काय होतो नंतर समाजापुढे येउन भाषण काय देतो हे सर्व लाजीरवाणे आहे.

हेल्पलाईन नंबर (?)

Submitted by Kavita Datar on 9 February, 2021 - 04:14
Cyber Crime

"अरे दिपक ! हे आर ओ वॉटर प्युरीफायर कालपासून चालतच नाहीये. प्यायला पाणी कसे मिळणार ?"

"कंपनीच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून कंप्लेंट दे. ते सर्विस मॅन पाठवतील. त्याच्याकडून दुरुस्त करून घे." "हेल्पलाइन नंबर तुला माहित आहे का ?"

"नाही ग ! गुगलवर शोध ना .."

"अरे हो.. विसरलेच.." ज्योतीने लगेच गुगल वरून वॉटर प्युरीफायर कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधून कॉल केला आणि कम्प्लेंट दिली. सर्विस मॅनला दुपारी दोन वाजता पाठवतो, असे त्या हेल्पलाइन वर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

विषय: 
शब्दखुणा: 

महात्मा गांधीना भावपुर्ण श्रध्दांजली

Submitted by सचिन पगारे on 30 January, 2021 - 06:02

आज महात्मा गांधी पुण्यतिथी. महात्म्यांचा क्रुर खुन होउन ७२ वर्षे झालीत. खुन्यांना फासावर टांगले गेले.खुनी कुप्रसिद्ध झाले तर
महात्मा अमर झाला.

भारतात बुध्द व गांधीजी हे दोन महापुरुष होउन गेले. गौतम बुद्ध व गांधीचा देश म्हणुन जग भारताला ओळखते..

अश्या ह्या भारताच्या स्वातंत्र्य नायक असलेल्या महात्म्याचा आज स्म्रृतिदिन. महात्मा गांधीना भावपुर्ण श्रध्दांजली.

महात्मा गांधी हा विषय काही सहा सात ओळीत मांडण्यासारखा नाही. सहा वर्षापुर्वी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक देत आहे.

नकार पुरस्काराला

Submitted by सचिन पगारे on 15 January, 2021 - 23:47

प्रख्यात कवी यशवंत मनोहर सरांनी विदर्भ साहित्य संघाकडून मिळालेला ' जीवनव्रती ' पुरस्कार नाकारला आहे.
त्यांची भुमिका ही पुढीलप्रमाणे होती.

विषय: 

मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२१

Submitted by हर्पेन on 14 January, 2021 - 07:31

ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.

प्रायव्हसी

Submitted by उपाशी बोका on 13 January, 2021 - 18:13

कंपन्यांना त्यांचा माल तुम्हाला विकायचा असतो आणि त्यासाठी ते मार्केटिंग करतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. आता मार्केटिंग करायचे तर त्याला खर्च येतो. अनावश्यक खर्च झाला तर फायदा कमी होतो. त्यामुळे मार्केटिंग हे कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त, यशस्वी कसे होईल, जाहिराती योग्य त्या लोकांना किंवा कंपन्याना कश्या पोचतील हे बघणे, हे कंपन्यांचे उद्दिष्ट असते. (किंवा असायला हवे). एक उदाहरण म्हणजे समजा तुमची कंपनी, शेतीवर कीड लागू नये याचे फवारणी यंत्र बनवत असेल तर त्याची जाहिरात मुंबई, पुणे या शहरात करून काय फायदा? त्याची जाहिरात अशा ठिकाणी झाली पाहिजे की जिथे शेती होते.

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’

Submitted by ललिता-प्रीति on 8 January, 2021 - 04:05
क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स

Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.”
– UNHCR, Policy on Refugee Children

विषय: 

गूगलमध्ये नोकरी करणारे आता युनियन करणार

Submitted by उपाशी बोका on 5 January, 2021 - 11:27

आज बातमी वाचली की गूगल कंपनीमधील एम्प्लॉई आणि काँट्रॅक्टर आता युनियन स्थापन करणार आहेत.
आय.टी. क्षेत्र हे तसे व्हाइट कॉलर प्रकारचे काम आणि भरपूर पगाराचे, कदाचित त्यामुळेच ते इतके दिवस युनियन या प्रकारापासून दूर राहिले होते. आता अमेरिकेत युनियन सुरू झाल्यामुळे भारतात पण आय.टी. मध्ये युनियन सुरू होईल का?

शब्दखुणा: 

विकासकावर बोलू काही....

Submitted by ASHOK BHEKE on 22 December, 2020 - 11:00

मी उगाच मारीत नाही फालतू बढाया
कधीतरी रागातून व्यक्त करतो प्रेमाची भाषा
कंठल्या स्वरात सांगतो,
विकासकावर बोलू काही....!
कोण कुठला आला आणि चाळीचा धनी ( विकासक) झाला
आश्वासनाच्या कढीभातावर बोळवण करीत
नव्या घराचं दिवास्वप्न अंधारात दाखवून गेला
खुणावते नव्या घराचा थाटमाट...
पण वारं उलटं वाहू लागलं
विकासकाच्या बोलण्यात इमाने नेक नाही
यायच्या अगोदर आलबेल होतं
आल्यानंतर त्याने दुहीचे बीज पेरले
त्यास्तव लाचारीचे कोंब उमलले..
सगळ्यानांच हवं असतं नवं घर
सुखाचं आणि समृद्धीचे
कुलस्वामीचे नांव घेत केले गृहदान

विषय: 

दुनियावाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड

Submitted by हरचंद पालव on 22 December, 2020 - 02:53

मला ह्या हिंदी चित्रपटांतील हिरोंचं काही कळतच नाही. एरवी चारचौघांसारखं आयुष्य न जगता हिरोगिरी करत असतात (अमोल पालेकर प्रभृती काही सन्मान्य अपवाद वगळता), तेव्हा 'चार लोक काय म्हणतील' ह्याचा विचार करणं ह्याला ते अजिबात म्हणजे अजिबात तुच्छ लेखतात. पण नंतर त्यांना ते चार लोक आठवतात. बरं, हिरोच्या वागण्यावर काहीतरी शेरेबाजी करण्याचा जन्मसिद्ध अधिकार असलेल्या त्या लोकांना एक सामूहिक नाव आपल्या चित्रपटसृष्टीने दिले आहे, ते म्हणजे 'दुनियावाले'. काही वेळा त्यांना 'जगवाले' असंही म्हणतात. तर हे दुनियावाले किंवा जगवाले जे कुणी असतील, ते कायम आपल्याला जज करत असतात असं जजमेंट हिरो लोक पास करतात.

Pages

Subscribe to RSS - समाज