समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सध्या कोरोनाप्रतापामुळे अनेकांच्या नोकर्या जात आहेत.कंत्राटी कामे मिळेनात.कधीतरी कोरोना अगदी नगण्य उरेलच; किंवा संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी पुन्हा नोकरी संशोधन किंवा नवे कंत्राटी काम मिळवायला लोक बाहेर पडतीलच.
खाजगी नोकरी शोधताना किंवा नोकरी करत असताना किंवा कंत्राटी कामे मिळवताना काही वेळा असे निदर्शनास येईल की आपण पात्र असूनही आपल्याला संधी मिळालेली नाही किंवा प्रमोशन मिळालेले नाही.उलट आपल्याला डावलून ज्याला संधी दिली गेलीय त्याला नक्की काय पाहून त्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली असावी किंवा नक्की काय तपासून कंत्राट दिले गेले असावे अशी शंका येते.
मी डिसेंबर १९८९ साली ओखा येथे नौदलाच्या आय एन एस द्वारका या स्थावर तळ (BASE) वर डॉक्टर म्हणून एक महिन्यासाठी तात्पुरता गेलो होता. त्यावेळी ओख्याला रेल्वे व नौदल सोडून काहीच नव्हते.नौदलाच्या मेस मध्ये राहत होतो. तेथे पाणी पूर्ण खारट होते.(मचूळ नव्हे अलिबाग नागाव रेवदंडा इथे मिळते तसे मचूळ नव्हे ). चहा किंवा कॉफी सुद्धा खारट होत असे. पहिले १० दिवस मी शीत पेयांवर काढली.(नमकीन चहा हा तिबेट किंवा लडाख मध्ये मिळतो ज्यात याकचे लोणी घालतात). अजून मी चहा कॉफी शिवाय दिवस काढू शकतो पण प्यायचे पाणी खारट म्हणजे फारच त्रासदायक.असो.
(डिस्क्लेमर: हे मनातले विचार आहेत आणि ते असंबद्ध, अतीरंजीत, चक्रम, अतार्किक,दुष्ट इ.इ वाटू शकतील.)
काम करता करता हेडफोन वर आवडती गाणी ऐकत होते. मनात भरपूर विचार चालू होते.आणि ऐकत असलेली गाणी कामाबद्दल लिहीलेली आहेत असं वाटायला लागलं.
"जपत किनारा शीड सोडणे ... नामंजूर.. अन वार्याची वाट पाहाणे नामंजूर..
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची..येईल त्या लाटेवर डुलणे.. नामंजूर .."
(बराय गाण्याचा नायक...साहेबाला रेफरल म्हणून सुचवायचा का? "तुम्ही गोष्टी ड्राईव्ह करा!! गोष्टी घडण्याची वाट पाहू नका..घडवून आणा" म्हणत असतो ना? हा गाण्यातला काल्पनीक प्राणी कसा छान गो- गेटर वाटतोय.)