नकार पुरस्काराला
प्रख्यात कवी यशवंत मनोहर सरांनी विदर्भ साहित्य संघाकडून मिळालेला ' जीवनव्रती ' पुरस्कार नाकारला आहे.
त्यांची भुमिका ही पुढीलप्रमाणे होती.
प्रख्यात कवी यशवंत मनोहर सरांनी विदर्भ साहित्य संघाकडून मिळालेला ' जीवनव्रती ' पुरस्कार नाकारला आहे.
त्यांची भुमिका ही पुढीलप्रमाणे होती.
ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.
कंपन्यांना त्यांचा माल तुम्हाला विकायचा असतो आणि त्यासाठी ते मार्केटिंग करतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. आता मार्केटिंग करायचे तर त्याला खर्च येतो. अनावश्यक खर्च झाला तर फायदा कमी होतो. त्यामुळे मार्केटिंग हे कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त, यशस्वी कसे होईल, जाहिराती योग्य त्या लोकांना किंवा कंपन्याना कश्या पोचतील हे बघणे, हे कंपन्यांचे उद्दिष्ट असते. (किंवा असायला हवे). एक उदाहरण म्हणजे समजा तुमची कंपनी, शेतीवर कीड लागू नये याचे फवारणी यंत्र बनवत असेल तर त्याची जाहिरात मुंबई, पुणे या शहरात करून काय फायदा? त्याची जाहिरात अशा ठिकाणी झाली पाहिजे की जिथे शेती होते.
Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.”
– UNHCR, Policy on Refugee Children
आज बातमी वाचली की गूगल कंपनीमधील एम्प्लॉई आणि काँट्रॅक्टर आता युनियन स्थापन करणार आहेत.
आय.टी. क्षेत्र हे तसे व्हाइट कॉलर प्रकारचे काम आणि भरपूर पगाराचे, कदाचित त्यामुळेच ते इतके दिवस युनियन या प्रकारापासून दूर राहिले होते. आता अमेरिकेत युनियन सुरू झाल्यामुळे भारतात पण आय.टी. मध्ये युनियन सुरू होईल का?
मी उगाच मारीत नाही फालतू बढाया
कधीतरी रागातून व्यक्त करतो प्रेमाची भाषा
कंठल्या स्वरात सांगतो,
विकासकावर बोलू काही....!
कोण कुठला आला आणि चाळीचा धनी ( विकासक) झाला
आश्वासनाच्या कढीभातावर बोळवण करीत
नव्या घराचं दिवास्वप्न अंधारात दाखवून गेला
खुणावते नव्या घराचा थाटमाट...
पण वारं उलटं वाहू लागलं
विकासकाच्या बोलण्यात इमाने नेक नाही
यायच्या अगोदर आलबेल होतं
आल्यानंतर त्याने दुहीचे बीज पेरले
त्यास्तव लाचारीचे कोंब उमलले..
सगळ्यानांच हवं असतं नवं घर
सुखाचं आणि समृद्धीचे
कुलस्वामीचे नांव घेत केले गृहदान
मला ह्या हिंदी चित्रपटांतील हिरोंचं काही कळतच नाही. एरवी चारचौघांसारखं आयुष्य न जगता हिरोगिरी करत असतात (अमोल पालेकर प्रभृती काही सन्मान्य अपवाद वगळता), तेव्हा 'चार लोक काय म्हणतील' ह्याचा विचार करणं ह्याला ते अजिबात म्हणजे अजिबात तुच्छ लेखतात. पण नंतर त्यांना ते चार लोक आठवतात. बरं, हिरोच्या वागण्यावर काहीतरी शेरेबाजी करण्याचा जन्मसिद्ध अधिकार असलेल्या त्या लोकांना एक सामूहिक नाव आपल्या चित्रपटसृष्टीने दिले आहे, ते म्हणजे 'दुनियावाले'. काही वेळा त्यांना 'जगवाले' असंही म्हणतात. तर हे दुनियावाले किंवा जगवाले जे कुणी असतील, ते कायम आपल्याला जज करत असतात असं जजमेंट हिरो लोक पास करतात.
बबन्या. खूप उनाड. तसं त्याचं बरं चाललंय. त्याचा मजूर बाप त्याला कानफाट्या म्हणतो. बबन्या बारावी काठावर पास आहे. आता त्यानं तालुक्याला काॅलेजात ॲडमिशन घेतलेलं आहे. आर्ट्स ला. तिथे तो अधून-मधून फारच बोअर झालं तर जातो. एरवी तो एकतर उनाडक्या करत असतो नाहीतर शेतावर मजूरी करायला जातो. मिळालेली मजूरी साठवून त्याने पहिल्यांदा काय केलं असेल तर एक सुमार स्मार्टफोन विकत घेतलाय. आता दिवसभर त्याचं व्हाट्सॲप, फेसबूक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब इ.इ. चालू असतं. यातल्या सगळ्यांचं स्पेलिंग अजून त्याचं पाठ व्हायचंय. पण त्याने फरक पडत नाही. नेट पॅक संपत आला की तो परत मजूरी करायला जातो आणि नेट पॅक मारतो.
जेम्स ब्लडवर्थ या ब्रिटिश पत्रकाराने ठरवून, प्लॅन करून सहा महिने ब्रिटिश कामगार वर्गाप्रमाणे तुटपुंज्या पगाराच्या नोकर्यांसाठी अर्ज करून चार प्रकारच्या नोकर्या केल्या. त्या त्या नोकरीच्या ठिकाणी त्याचे सहकारी, स्थानिक ज्या प्रकारे राहायचे तसंच तो देखील राहिला. (गलिच्छ वस्त्या, एका घरात दाटीवाटीने राहणारे कामगार) त्यांच्यासारखंच जेवण, ट्रान्स्पोर्ट, त्यांच्याप्रमाणेच महिन्याच्या कमाईत(च) कशीबशी गुजराण करून, त्याच लोकांच्यात मिसळून, त्यांच्याशी गप्पा मारून त्या सर्व अनुभवांवर त्याने हे पुस्तक लिहिलं आहे.
"बंड्या खोत, अनुपम पटेल, सुदेश जाधव हे सारे एकाच माळेचे मणी. मला जे सांगायचं आहे ते या प्रत्येकाच्या कहाणीत दडलेलं आहे." शेफालीची नजर फोटोंवर स्थिर होती तर समोर बसलेल्या प्राध्यापकांची तिच्यावर. तिच्यावर असंख्य प्राध्यापकांचे डोळे रोखलेले होते पण तिचं लक्ष्य साठेसर होते. साठ्यांना पटलं, आवडलं की काम फत्ते. एकेक करून तिला चित्रातली माणसं जिवंत करायची होती. त्यांची निवड तिने का केली, ही माणसं तिला कुठे भेटली, त्यांच्याशी तिचं काय बोलणं झालं हे सांगत त्यांचं आयुष्य जिवंत करायचं होतं. ही सगळी माणसं भेटली तर त्यांची आपली ओळख आहे असंच प्रत्येकाला वाटायला हवं याची तिने मनाशी खूणगाठ बांधली.