गद्यलेखन

समुद्र किनारा (भाग १०)

Submitted by नंदिनी on 3 December, 2013 - 00:56

वीर कपूर चालत चालत कंपाऊंडच्या बाहेर आला आणि अचानक थांबला. पायातले बूट काढून त्याने कंपाऊंडच्या आत फ़ेकले आणि उघड्या पायांनी तो वाळूतून चालायला लागला. सकाळचे साडेसहापण अजून वाजले नव्हते, पण बर्‍यापैकी उजाडलेले होते. समोरचा समुद्र अजून आळसावल्यासारखाच होता. इतक्या पहाटे या प्रायव्हेट बीचवर अजून कुणीही नव्हतं, त्याच्याशिवाय. तो दूरवर वाळूमधेच बसला होता. वीर चालत चालत त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला.

“हॅलो, मिस्टर नदीम शेख. हीअर वी मीट अगेन” वीर म्हणाला.

त्याने मान वळवून वर पाहिलं आणि तो हसला.. “वीर. शादी मुबारक!” तो बसल्याजागीच म्हणाला.

समुद्रकिनारा (भाग ९)

Submitted by नंदिनी on 2 December, 2013 - 05:04

राजन हातातला कागद उभा राहून परत परत वाचत होता. वीर तिथेच खाली जमिनीवर पडला होता. एक तर समुद्राच्या अगदी जवळ असल्याने दुपारचं ऊन भाजत होतं आणि त्यात भर म्हणून एसी काम करत नव्हता. त्यामुळे गार फ़रशीवर पडून रहायला बरं वाटत होतं. सारा बाजूलाच सोफ़्यावर पडून पुस्तक वाचत होती. परवाच्या लग्नासाठी म्हणून आजच दोन तासापूर्वी हे तिघे इथे आले होते. बाकीचा स्टाफ़ आणि गेस्ट उद्या परवा येणार होते.

“एवढंच? याला तर दीड तास पण लागणार नाही...” शेवटी त्या कादगाकडे अविश्वासाने बघत राजन म्हणाला.

सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

Submitted by पुरंदरे शशांक on 2 December, 2013 - 01:29

सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

श्रीनिवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताई या चार भावंडांनी त्यांच्या माता-पितरांच्या पश्चात कसे दिवस काढले असतील याची आपण याकाळात कल्पनाही करु शकत नाही !

त्यांच्या पिताश्रींनी (विठ्ठलपंत) संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात टाकलेले पाऊल - हा त्याकाळातील त्या समाजाने ठरवलेला एक अक्षम्य अपराध - ज्याला प्रथम बळी पडले ते विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई. जेव्हा समाजाने त्यांना वाळित टाकले (ग्रामण्य) ते त्या दोघांनी सहन करुन आळंदी गावाबाहेर रहाणे पसंत केले. त्यावेळेसचा समाजरोष पूर्णपणे स्वतःवर झेलून त्यांनी या चार मुलांचे जे संगोपन केले ते मोठे आश्चर्यच.

श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४

Submitted by पुरंदरे शशांक on 30 November, 2013 - 11:12

श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४

तत्वज्ञ म्हणून माऊली एखादा विषय कसा सुरेख दृष्टांत, उपमा, उदाहरणे देऊन सांगतात ते पाहूया..

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ||४७-अ. १८||

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ -गीताई॥

अगा आपुला हा स्वधर्मु| आचरणीं जरी विषमु|
तरी पाहावा तो परिणामु| फळेल जेणें ||९२३|| ...... (विषम = कठीण, अवघड, परिणाम=शेवटी)
अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरुपी मोठे फळ प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे.

फिनिक्स पान १७(समाप्त)

Submitted by पशुपति on 29 November, 2013 - 10:39

प्रभूंनी त्याला विचारले, “तू आम्हाला पलीकडे नेणार आहेस ते ठीक आहे. पण त्याचे मोल किती घेणार ते आधी सांग.”
तो चतुर केवट म्हणाला, “आपणदोघे सम-व्यावसायिक आहोत. त्यामुळे मला तुमच्याकडून मोल घेता येणार नाही. इतरांना जर हे कळले तर मला वाळीत टाकतील.”
प्रभू मनातल्या मनात हसले तरीपण वरकरणी विचारले, “ तुला आमच्याकडून मोल नको ते कबूल! पण आपण दोघे सम-व्यावसायिक कसे?”
त्यावरकेवटने खुलासा केला, “नाही कसे? तुम्ही आपल्या भक्तांना संसार सागरातून तरुन नेता, मी आलेल्या प्रवाश्यांनानदीपलीकडे नेतो. आता तुमचा पसारा माझ्यापेक्षा मोठा आहे, कबूल!! पण व्यवसाय मात्र तोच!”

फिनिक्स पान१६

Submitted by पशुपति on 28 November, 2013 - 10:14

सुब्रतोला आता क्षणाचीही फुरसत नव्हती. आलेल्या पैशातून स्टुडिओसाठी नवीन जागा घेतली. त्याचे आई-वडील पण पुण्याला कायमचे आले.सुनंदाने नोकरीचा राजीनामा देऊन स्टुडिओचे कामकाज सांभाळण्यासाठीस्वतःला वाहून घेतले.रामप्रसादला पणसुब्रतोचे श्रेय पाहून कौतुक वाटत होते. ‘अपनाकोलकत्तावाला!!’

फिनिक्स पान१४

Submitted by पशुपति on 27 November, 2013 - 04:40

तेवढे एकच वाक्य तिच्या विचारांच्या चालनेलापुरेसे होते. ती तडक उठली आणि ती बातमी सुब्रतोला वाचायला दिली. बातमी वाचून त्याला काहीही बोध झाला नाही.सुनंदाकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत तो म्हणाला, “एवढे ह्यात महत्वाचे मला सांगण्यासारखे काय आहे?”

जाडो की नर्म धुप

Submitted by विजय देशमुख on 27 November, 2013 - 04:19

शनीवारचा दिवस. पहाटे ८ लाच उठलो. इच्छा नव्हती उठायची, पण "बाबा, भुक लागली" ऐकुन उठावच लागलं. बाहेर बघितलं तर धुकं असावं असं वाटत होतं. थंडीने बघुदा सुर्यदेवही झोपले असावे.

"रोज शाळा असते तेंव्हा जबरदस्तीने उठवावं लागते, अन आज मुद्दाम लौकर उठलास?" मी दुध गरम करत विचारलं. तो काय बोलणार बिचारा. एक कार घेउन त्याची खेळायला सुरुवातही झाली होती.

फिनिक्स पान १४

Submitted by पशुपति on 26 November, 2013 - 09:39

तेवढे एकच वाक्य तिच्या विचारांच्या चालनेलापुरेसे होते. ती तडक उठली आणि ती बातमी सुब्रतोला वाचायला दिली. बातमी वाचून त्याला काहीही बोध झाला नाही.सुनंदाकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत तो म्हणाला, “एवढे ह्यात महत्वाचे मला सांगण्यासारखे काय आहे?”

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन