श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४
तत्वज्ञ म्हणून माऊली एखादा विषय कसा सुरेख दृष्टांत, उपमा, उदाहरणे देऊन सांगतात ते पाहूया..
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ||४७-अ. १८||
उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ -गीताई॥
अगा आपुला हा स्वधर्मु| आचरणीं जरी विषमु|
तरी पाहावा तो परिणामु| फळेल जेणें ||९२३|| ...... (विषम = कठीण, अवघड, परिणाम=शेवटी)
अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरुपी मोठे फळ प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे.
प्रभूंनी त्याला विचारले, “तू आम्हाला पलीकडे नेणार आहेस ते ठीक आहे. पण त्याचे मोल किती घेणार ते आधी सांग.”
तो चतुर केवट म्हणाला, “आपणदोघे सम-व्यावसायिक आहोत. त्यामुळे मला तुमच्याकडून मोल घेता येणार नाही. इतरांना जर हे कळले तर मला वाळीत टाकतील.”
प्रभू मनातल्या मनात हसले तरीपण वरकरणी विचारले, “ तुला आमच्याकडून मोल नको ते कबूल! पण आपण दोघे सम-व्यावसायिक कसे?”
त्यावरकेवटने खुलासा केला, “नाही कसे? तुम्ही आपल्या भक्तांना संसार सागरातून तरुन नेता, मी आलेल्या प्रवाश्यांनानदीपलीकडे नेतो. आता तुमचा पसारा माझ्यापेक्षा मोठा आहे, कबूल!! पण व्यवसाय मात्र तोच!”
सुब्रतोला आता क्षणाचीही फुरसत नव्हती. आलेल्या पैशातून स्टुडिओसाठी नवीन जागा घेतली. त्याचे आई-वडील पण पुण्याला कायमचे आले.सुनंदाने नोकरीचा राजीनामा देऊन स्टुडिओचे कामकाज सांभाळण्यासाठीस्वतःला वाहून घेतले.रामप्रसादला पणसुब्रतोचे श्रेय पाहून कौतुक वाटत होते. ‘अपनाकोलकत्तावाला!!’
तेवढे एकच वाक्य तिच्या विचारांच्या चालनेलापुरेसे होते. ती तडक उठली आणि ती बातमी सुब्रतोला वाचायला दिली. बातमी वाचून त्याला काहीही बोध झाला नाही.सुनंदाकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत तो म्हणाला, “एवढे ह्यात महत्वाचे मला सांगण्यासारखे काय आहे?”
शनीवारचा दिवस. पहाटे ८ लाच उठलो. इच्छा नव्हती उठायची, पण "बाबा, भुक लागली" ऐकुन उठावच लागलं. बाहेर बघितलं तर धुकं असावं असं वाटत होतं. थंडीने बघुदा सुर्यदेवही झोपले असावे.
"रोज शाळा असते तेंव्हा जबरदस्तीने उठवावं लागते, अन आज मुद्दाम लौकर उठलास?" मी दुध गरम करत विचारलं. तो काय बोलणार बिचारा. एक कार घेउन त्याची खेळायला सुरुवातही झाली होती.
तेवढे एकच वाक्य तिच्या विचारांच्या चालनेलापुरेसे होते. ती तडक उठली आणि ती बातमी सुब्रतोला वाचायला दिली. बातमी वाचून त्याला काहीही बोध झाला नाही.सुनंदाकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत तो म्हणाला, “एवढे ह्यात महत्वाचे मला सांगण्यासारखे काय आहे?”
सुब्रतोच्याट्रीट्मेंटला ३ महिने उलटून गेले. आता तो वॉकरच्या सहाय्याने चालू शकत होता.पेंटिंगची संख्या पण प्रदर्शन भरवण्याएवढी झाली होती.सुनंदाची आता वेगळीच धावपळ सुरु झाली होती. प्रदर्शनभरवण्यासाठी काय करायला हवे,हॉल बुक करणे, प्रदर्शनाची माहिती प्रसिद्धी माध्यमामार्फतप्रसारित करणे, इत्यादि सर्व करण्यात तिला दिवस-रात्र अपुरे पडत होते.सर्व आर्थिक भार सुब्रतोच्यावडिलांनी उचलला होता.एके दिवशी पेपरमध्ये एक बातमी झळकली......
सुब्रतो चक्रवर्ती ह्या नवीन कलाकाराच्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंग मंदिराच्या कलादालनात भरत आहे. प्रवेश फी नाही.
हल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३
मागील भागात आपण पाहिले की श्री ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. म्हणजेच इथे वाचकाच्या ह्रदयात सद्भाव असणे खूप गरजेचे आहे. भावपूर्ण, हळुवार अंतःकरणानेच हा ग्रंथ वाचावा, नव्हे तो अनुभवावा असे स्वतः माऊलींनीच सांगितले आहे.
आता माऊली किती रसिकतेने काय काय लिहितात ते पाहू ..... अध्याय पहिला - महाभारतकार व्यासांचे गुणगौरव माऊली करताहेत -
नाना कथारूपें भारती| प्रकटली असे त्रिजगतीं|
आविष्करोनि महामतीं| व्यासाचिये ||३२|| ...................(भारती = महाभारत)
म्हणौनि हा काव्यांरावो| ग्रंथ गुरुवतीचा ठावो|