बंडलवाडीचा बाँड - केस नं. १
गज्या म्हात्र्याच्या दुकानात चोरी झाल्याची खबर बंडलवाडीत वणव्यासारखी पसरली. चंदन आळीतल्या डागेवर गज्या म्हात्र्याचं किराणा मालाचं दुकान आहे. गावातील इतर दुकानांत न मिळणारी कुठलीही वस्तू गज्याच्या दुकानात हमखास मिळते. आणि धंद्याचं म्हणाल तर, एकेकाळच्या गज्याची कबड्डी वा क्रिकेटच्या भव्य स्पर्धा अथवा इतर कुठल्याही सटरफटर उत्सवाच्या निमंत्रणपत्रिकांत 'गज्याशेट' अशी प्रगती झाली होती.
आजही कात्रज-हडपसर बस गर्दीनं गच्च भरलेली होती, हिवाळ्यातले दिवस, अंधार लवकर, त्यामुळे तर गर्दी आणखी जास्त. खरं तर अशी गर्दी करण्याची `त्यांना' आता काहीएक गरज नव्हती पण, सवय.. ती अशी सहजासहजी मोडणारी थोडीच ?
" पुढे सरका, आत येणार्यांना जागा द्या ", " जरा सरकून घ्या की, बाकीचेही तिकीट घेऊनच प्रवास करतायत " आवाजांची सरमिसळ प्रत्येक थांब्यावर आणखी वाढत जात होती.
मध्येच कुणाचंतरी भांडण उसळलं, पार धक्काबुक्कीपर्यंत, या सगळ्या भानगडीत बसला एक झटका बसला. तसे सगळेच शांत झाले. बस भैरोबा नाल्याला थांबली होती. आधीच भैरोबाचं नांव, त्यात ते घडलं ....
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ६ - एक वेगळा पैलू.
श्री ज्ञानेश्वर महाराज हे नक्की होते तरी कोण ?
योगी ? का भक्त ? का तत्वज्ञानी ? का कविश्रेष्ठ ? का विरक्त संत ? का ज्ञानराज ???
माझ्यामते तर ते या सगळ्या गोष्टी मिळून तयार झालेले आणि या सगळ्या विशेषणांच्याही पलिकडले एक अद्भुत रसायन होते .....
"जिन्यातले दिवेही नेमके आजच कुठे तीर्थयात्रेला गेलेत देव जाणे!!"
''मोतीबाबू आहेत का?'' सुरेशबाबूंनी बाहेरूनच विचारले. आश्रमातील बंगल्याच्या व्हरांड्यात पायाशी शेगडी ठेवून, वेताच्या खुर्चीत आरामात वर्तमानपत्र वाचत बसलेल्या जयंतीबेन त्यांना पाहून जरा दचकल्याच!
''या, या सुरेशबाबू.... आज आमच्या बंगल्याची पायधूळ कशी काय झाडलीत? या ना, बसा, बसा. मोतीबाबू आत जप करत आहेत. येतीलच पाच-दहा मिनिटांत. काही काम होतं का?'' जयंतीबेन हातातील वर्तमानपत्र बाजूला सारत उद्गारल्या.
अमृतधारा - स्वामी स्वरूपानंद (पांवस)
आजारपण हे काही आपल्यापैकी कोणालाही नवीन नाही. कुणाकुणाची आजारपणे लिहून काढायची म्हटली तर प्रत्येकाचा एकेक ग्रंथ होईल इतकी विविधता अणि व्यापकता त्यात आहे.
पण याच आजारपणाचा उपयोग आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी कोणी करुन घेतल्याचे ना ऐकिवात आहे ना पहाण्यात आहे.
पांवसचे पूजनीय श्री स्वामी स्वरुपानंद यांनी हा अनुभव स्वतः घेतला व तो "अमृतधारा" या अगदी छोटेखानी पुस्तकात लिहून ठेवला. अतिशय सुरेख व प्रासादिक साकीवृत्तात हे सर्व त्यांनी लिहिले आहे. हे सगळे अनुभव म्हणजे एका साधकाचा सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास म्हणायलाही हरकत नाही.
||श्री||
इतनीसी बात – २: http://www.maayboli.com/node/46713
नऊवारी नेसलेल्या, सुपारीएवढा अंबाडा झालेल्या पण तेजस्वी गोऱ्या रंगाच्या सुमतीबाई, तिन्हीसांज उलटून रात्र झाली तरी अजून कुणीच कसं भेटायला आलं नाही म्हणून स्वतःच बघावं अश्या विचाराने खोलीच्या बाहेर आल्या.
त्यांना रागारागाने गच्चीवर चाललेल्या वसुंधराबाई दिसल्या. त्यांना तसं पाहून सुमतीबाई पुढे न जाता किंचीत आडोशाला जिन्याजवळच थांबल्या. वसुंधराबाई धुमसत बडबडत होत्या,""काहीही बोलयचं! म्हणे मी चरणोकी दासी आहे म्हण! निदान आपल्या वयाचा तरी काही विचार!"
फोकनाड !!
एका सायंदैनिकात मंत्रालयातील पब्लिसिटी खात्याचा एक अधिकारी पार्टटाईम बातमीदारी करायचा. एकदा तो एक फालतू बातमी घेऊन आला. साहेबाच्या हातात त्याने तो कागद दिला.
साहेबांची नजर हातातल्या कागदावरच्या बातमीवरून फिरत होती आणि हा समोर बसून साहेबाच्या चेहर्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत होता...
साहेबानी बातमी वाचून संपवली. कागद बाजूला ठेवला...
याला साहेबाच्या प्रतिक्रियेचा काहीच अंदाज येत नव्हता..
शेवटी न राहवून त्याने विचारले, 'साहेब कशीय बातमी?'...
'एकदम फोकनाड'... हसतहसत साहेब म्हणाले.
याला अर्थ कळला नाही, पण साहेब हसत होते, म्हणजे चांगली असणार असे समजून तो आनंदला.