आयुष्यातील पहिलेवहिले .. - प्रेम, बीअर आणि मंगळ !
..
"आयुष्यातले... पहिलेवहिले !..
हे दोन शब्द ऐकताच किमान अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आपले पहिले प्रेमच आठवते!
मग मी तरी त्याला अपवाद कसा ठरू !
..
"आयुष्यातले... पहिलेवहिले !..
हे दोन शब्द ऐकताच किमान अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आपले पहिले प्रेमच आठवते!
मग मी तरी त्याला अपवाद कसा ठरू !
(भाग - १ )
नमस्कार मित्रहो , पारवा हि कथा एका प्रेमी युगुलाच्या आयुष्यावर आधारित आहे . कथा थोडी फिल्मी आहे वाटते पण कथेतील सत्यता आणि पारदर्शकता फिल्मी नाही .
नरेश हा एक खाजगी कंपनी मध्ये अभियंता म्हणून काम करत होता , हि कथा आहे नरेश आणि त्याची अधुरी राहिलेल्या प्रेम कहाणीची .
गाठरलेली ती रात्र
आणि त्या रात्रीचा एकांतवास
वाऱ्याची एक झुळूक
हळूच आली आणि तिची
आठवण तीव्र करून गेली
मनामध्ये असंख्य विचारांचे
वादळ उठवून गेली
का मला इतकी आठवते ती....?
सतत माझ्या मनामध्ये
येऊन छळते मला
आता ह्या छळण्याने
जखम पण होऊ लागलीय
आणि या जखमावर उपाय काय....?
उपाय म्हणून डोक्यातून
काढून टाकलय तिला
पण, हृदयातून कसा काढणार ...?
आणि जर हृदयच
काढून टाकायचं म्हटलं तर...?
कदाचित हृदय टाकेलही काढून
पण मग त्या हृदयाला
कोण जपणार....?
आणि त्या हृदयातली ती...?
तिची काळजी कोण घेणार...?
ह्या हृदयाला तिने
स्वतःत सामावून घ्यावं ,
प्रेम का करू नये..........?
असं कुणी 'पैज' लावून म्हणत असेल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
जर समोरच्याच मन जपता आल,
तर नक्की करा प्रेम
जर सगळ्यांना आनंद देता आल,
तर तुम्ही नक्की करा प्रेम
एकाचे 'हसू' दुस-याचे अश्रू होणार नसतील,
तर नक्की करा प्रेम
आयुषभर सांभाळता आल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
कोणालाही न फसवता करता आल तर
तुम्ही नक्की करा प्रेम
स्वप्नांना खर करता आल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
प्रेम का करू नये..........?
असं कुणी 'पैज' लावून म्हणत असेल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
जर समोरच्याच मन जपता आल,
तर नक्की करा प्रेम
जर सगळ्यांना आनंद देता आल,
तर तुम्ही नक्की करा प्रेम
एकाचे 'हसू' दुस-याचे अश्रू होणार नसतील,
तर नक्की करा प्रेम
आयुषभर सांभाळता आल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
कोणालाही न फसवता करता आल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
स्वप्नांना खर करता आल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
कविता गोरे
मग कधीतरी .....
त्या समुद्राला उधाण असेल,
त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल
त्या विजेचाही कडकडाट असेल
मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार
चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल
त्या अंधारलेल्या पावसाळी,
तू आणि मी
माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी
तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार,
भिजलेली मनं, पेटलेली शरीरं
काहीतरी नक्कीच घडनार आज
पण कसेचे काय,
माझी बस येइल आणि मी निघून जाइल
पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल
मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल
नेहा,
कुठून आणि कशी सुरवात करू हे कळत नाही. पण विखुरलेला एक एक मोती जसा उचलून हातातल्या धाग्यात अलगदपणे गुंफून माळ तयार करावी तस-काहीस करणार आहे. काही वर्षांपूर्वी (२००५-६ असावे बहुधा) मी तुला खगोल मंडळाच्या कार्यक्रमात प्रथम पहिले तेंव्हाच तुझी हुशारी आणि निरागस हास्य मला आवडले होते. तशी आहेसच तू सुंदर ! कोणालाही आवडशील अशी. पण स्वतःच्या मनाची चलबिचल थांबवण्यसाठी एखद्या निस्तब्ध पाण्यात खडा टाकून ते पाणी ढवळून काढावे असे मला कधीच वाटले नाही. याउलट तिन्ही ऋतूत बहरणाऱ्या रंगीबेरंगी गुलमोहराप्रमाणे तू सदैव बहरत रहावेस अगदी तसाच आदर तुझ्याविषयी नेहमी वाटत राहीला.
आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!
आज राणी आठव कधी प्रेम केलं होतं
खुळ्या झुल्यावर मन उंच गेलं होतं
काही दिसेना जगात, फक्त दोन उरलं होतं
गुलाबी धुक्यात मन गुलाबी झालं होतं
डोळे पाहती तुलाच, बाकी काहीच दिसेना
तुझ्या आठवणीविना दिनरातही सरेना
जप तुझ्याच नावाचा, घुमे सदा अंतरात
फक्त तुच आणि तुच, दुजं काहीच सुचेना
वेडा वाराही आणतो तुझाच धुंद गंध
स्पर्शाच्या कळ्यांना जाणवे तुझाच अनुबंध
भाषा तेवढीच उरे, तुझे नाव, एक शब्द
पहाया प्रेमाचा उत्सव, सारे जग झाले स्तब्ध
झोकून देऊन प्रेम बीम पुस्तकी भाषा वाटते नाही. पण प्रत्येकाच्या मनात हि असीम प्रेमाची अढी असतेच कुठेतरी. प्रेम हवंच असतं कुणाचतरी. आपल्यावरही अगदी कुणी झोकून देऊन प्रेम करावं अस वाटत असतंच. पण करतांना मात्र आपण प्रेम करतो ते हातचं राखूनच…. प्रेम मिळवण्यापेक्षा स्वतः प्रेमात असतांना मिळणार सुख अधिक असतं. मिळवतांना किती मिळतंय ह्याचा हिशेब आपल्या हातात कुठेय पण देतांना हातचा सुद्धा शिल्लक न ठेवता अगदी अगदी ऋणात राहूनही देता येतं. सतत २४/७ प्रेमात राहण्याचं सुख ते काय ना ?