रस्त्यानं रेतीवाला तो आला
रस्त्यावर उभी मी उन्हातान्हाची
टमटम येत नाही कधीची
येईल का कोनी गाडीवाला
नेईल का मला कोनी घरला
प्रश्न मला पडला, पडला, पडला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||धृ||
मी गोरी पोरी कोल्याची
हाय देखणी लई सुंदर
रंगानं काळी मी पडल
उन्हात उभी राहील्यावर
वेळेवर मदतीला धावला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||१||
गाडी रेतीनं हाय भरलेली
लाल रंगानं हाय सजवलेली
मला भुरळ तीची पडली
सार्या गाड्यांमधून आवडली
तिच्यामधे घेवून जायला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||२||
रेवदांड्याचा मैतर तो
सोडुन आले स्वप्ने सारी डोळ्यांच्या काठांवर
अजुनही फुलतील वसंत काही सोडलेल्या वाटांवर
भळभळत्या जखमांतून अश्रू अखंड वाहत रहातात
ते भळभळणारे अश्रू पिउन जखमा भरत जातात
आणि, माझ्या वाटेवरती धरू लागतो मोहर
वसंत दारी थाप देतो, मागतो माझा बहर
डोळ्यांच्या तळी हळूच दाटू लागतात स्वप्ने
पुन्हा एक काचेचं घर, पुन्हा नशीबी जपणे
या वेळी मी निवडून घेते फक्त रंगीत काचा
नव्या वाटेवर करीन म्हणते कॅलीडोस्कोप त्याचा ..
-सत्यजित.
वास्तव-प्रेमगाव-वास्तव
खेळत होतो मी मनाची गाडी
चालवत होता मेंदू अन कंडक्टर प्रेम दिवाणी !
कंडक्टरला वाटायचं सारखी बस भरावी
आत येऊ पाहणाऱ्यांची लाईन बघून खुदकन बस हसावी!
driver कधी चिडून मग घ्यायचा बस stop वर
म्हणायचा सीट नसलेल्यांनी उतराबघू पटकन!
तेवढयात त्याला दिसायचा कंडक्टर पायावर उभा
खास प्रवाशासाठी आपली सीट सोडून बघा !
पण तेवढी ढील driver द्यायचा बर का त्याला
कारण तोही होता थोडा प्रेमावरती फिदा!
'वास्तव-प्रेमगाव-वास्तव' होता बस चा रूट
गावी पोचल्यावर कंडक्टर म्हणे, आता तू एकटाच सूट!
येताना जेवढ्यानी केले हात, तेवढ्या वाजवल्या मी घंटा
केवढा कार्यक्षम तूझा हा मेद आहे
आज रेड्याच्या मूखी हा वेद आहे
सोहळे झाले पूरे त्या सोवळ्यांचे
चक्रव्यूहाचा कोणता ह्या भेद आहे
वर्तुळे आखीव रेखीव भोवताली
हाय व्यासाचाच त्यांना छेद आहे
साहते कल्लोळ आज स्पंदनांचा
जाहले जे त्याचा न खंत खेद आहे.
कितीही भरले तरी रिकामे
जीवनाचे रिते किती रकाने
उसने आणोन हास्य नभीचे
चांदण्याचे मनी सडे शिंपले
उदास वाटले जरी उसासे
कधी उलटे तर सुलटे फ़ासे
वादळ आले जरी घोंगावत
पाय रोवुनी तरी उभे घराणे
लाटामागुन जरी लाटा येती
पायाखालुन मग रेती नेती
दडलेले हिरे माणिक मोती
अशाच वेळी तर वर येती
हीच परिक्षा असते वेळोवेळी
सारेच देती ईथे आळीपाळी
कल्पी जोशी
०६/०४/२०११
सोनेरी कणांचा भार..
माझ्या मिटल्या पापण्यांवर..
किलकिलत्या डोळ्यांत
दिसलास फक्त तू..
मग तोच खुळा प्रयत्न..
तुला एक स्पर्श करण्याचा..
तुझ्या एक स्पर्शानं
सोनं होण्याचा..
तुझाही तोच खेळ
माझ्याशी..
माझ्या वेड्या मनाशी..
तुझ्या अभासांपाठी धावणारी मी..
अन मला बघून हसणारी तुझी सावली..
बेचैन होणं ही नेहमीचंच माझं..
आज मात्र थांबले क्षणभर..
वेडावणाऱ्या तुझ्या सावलीकडेच उत्तर मागितलं मी..
अन बघता बघता उमगलं,
माझ्या झोळीत मावणारा नाहीचेस तू..
मग तुझ्या त्या सोनसळी कणांना
एक एक करत वेचायचा
पुन्हा एक जीवघेणा खेळ..
ध्यास एकच..
एक पसाभर 'तू' मिळावास
मनभर व्यापून राहिलेलास..
ओल्या मातीच्या वासासवे
मन नकळत भूतकाळात जातं..
जुन्याशा त्या माजघरातून
धावतच मग अंगणात पोचतं..
छोटीशी पावलं तिथे
मातीभर उमटत जातात..
निरागस हास्याच्या लकेरी
अवघं आयुष्य व्यापून टाकतात!
इवल्याशा त्या ओंजळीत
पाउस झेलायचा प्रयत्न असतो..
छोट्याश्या अन् डोळ्यांमध्ये
आभाळाचाच रंग असतो!
एक मोठ्ठ आश्चर्य
मनभर दाटलेलं असतं..
'नक्की या ढगांमध्ये
पाणी कुठून येतं?'
काळ उलटत जातो..
पावसाचं गूढही उकलत..
लहानपणीच सगळं अप्रूप
तिथंच हरवून जातं..
अनुभवलीच नाही मी कधी..
पाऊसओली काळीभोर माती..
अन् गावासालीही नाहीत मला कधी..
त्यात भिजलेली नाती..
माझ्या प्राक्तनात नव्हतंच कधी
बरसणाऱ्या सरींमध्ये मनाचं हरवणं..
उधळलेल्या वाऱ्याबरोबर
मुक्त बेभान वावरणं..
माझं प्राक्तन होतं
फक्त गुरफटून राहणं..
गुरफटून राहणं,
माणुसकी हरवलेल्या
माणसांच्या’ जंगलात..
इथे माझं श्वास कोंडलेला..
थिजलेलाच राहिला..
माणूस’ नावाच्या मुखवट्यांकडे पाठ फिरवून
श्वासही मग निघून गेला..
मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...