मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..
पाऊस दारी येता
मी कवाडं तिरपी करते
तो टपटप वाजत रहातो
मी पाठमोरीशी होते
तो घेऊन येतो सा-या
हरविल्या सप्त सूरांना
मी विसरु पाहते सारे
तो जगवितो पुन्हा क्षणांना
तो बधत नाही मजला
अन कवाड वाजवित बसतो
मी हिरमुसली होत्साती
तो ओल्या नजरेनं पहातो
मी टाळून जेव्हा त्याला
ती बंद कवाडे करते
खिडकीवर पागोळ्यांची
सर ओघळून बरसते
वाटते मलाही तेव्हा
कवेत त्याला घ्यावे
उघडावे दार मनाचे
अन चिंब सरींत भिजावे
पहिला पाऊस
घनदाट मेघ हे आज दाटले,
नभी जमला रम्य देखावा.
अलगद चमके विद्युल्लता,
वाऱ्यासही का सुटला हेवा.
धरतीलाही ओढ सरींची,
आसमंत का अजाण सारा.
कुठे उडाली फुलपाखरे,
थुईथुई नाचे मोरपिसारा.
शीतल वारा मनी शहारा,
मातीलाही सुवास न्यारा.
मी मग मजला कसा सावरू,
का मी दवडू एक नजारा.
नव तरुणीसम सजली धरती ,
नेसून शालू गर्द हिरवा.
उठ उठ ते बळीराजा तू ,
गात आहे गोड पारवा.
गजानन बाठे
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात.
मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी
ब-याच दिवसात भेटला नाही
तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा
पण तूच माझ्याशी बोलत नाही
मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले
अगदी जवळ गेल्यासारखे भासविले
पण त्याचे मनात काही वेगळेच असेल
जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले
केस ओले न्हालेते
आले प्रेमाचे भरते
(पावसात केस ओले
प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!)
शिडकावा ओल्या थेंबांचा
चिंब भिजवून देण्याचा
गोरी काया ओलेती
तुझे लावण्य दाखवती
गाली लाज आलेली
शृंगाराविना सजलेली
अशी सामोरी ललना
मन हरखले ना !
साडी लपेटून उभी
येते कवेत कधी?
- पाषाणभेद
२६/०९/२०१९
पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं
आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला
हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी
हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी
आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे
पाऊस! पाऊस!!
पाऊस! पाऊस!! झाला सारा
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा
चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन
पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी
- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९
मिहीरातूनी वर्षासरी
भरभरून बरसताना
थेंब न् थेंब ती पिते त्वचेने
मुखावर अलवार झेलताना
जलधारांचा स्पर्श असा
अतृप्त करून सोडणारा
अनुभवला जरी कितीही
तरी हवाहवासा वाटणारा
भिजण्यात चूर ती असताना
नभ ते निरभ्र होई
निष्पाप त्या नयनात तिच्या
अवघी नीलिमा येई
अन् मग ती त्या नभास पुसते
थांबलास का रे असा अचानक
बरसशील का पुनः एकदा
मन तृप्त नाही झाले अजून