बोलका बुरुज.....
स्वराज्याचा दगड बनून मी
या सह्याद्रीत लढलो
लोटून गेला बहुत काळ
मी कणाकणा ने झिजलो...
- धीरज लोके
अशीच आहे आपल्या स्वराज्याच्या गडकोटांची अवस्था ...
पद्मदुर्ग वरील एक बुरुज
स्वराज्याचा दगड बनून मी
या सह्याद्रीत लढलो
लोटून गेला बहुत काळ
मी कणाकणा ने झिजलो...
- धीरज लोके
अशीच आहे आपल्या स्वराज्याच्या गडकोटांची अवस्था ...
पद्मदुर्ग वरील एक बुरुज
॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101...
मूळ संस्कृत श्लोक व मराठी अनुवाद
॥
१
॥
जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्
डमड्डमड्डमड्डम न्निनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्
जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो
डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा
करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा
॥
२
॥
जटा कटाहसंभ्रमभ्रम न्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके
इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.
इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.
पुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....
आचार्य विनोबांच्या साहित्याची ओळख झाली साधारणतः १९८१च्या सुमारास. त्याआधी आम्ही सगळे मित्र त्यांची टवाळकीच करायचो. पण एका मित्राला "गीता प्रवचने" पुस्तक मिळाले आणि त्याने पहिले स्फुल्लिंग पेटवले - अरे, कस्लं भारी पुस्तके हे....
झालं - त्या एका पुस्तकानेच जी मोहिनी पडली विनोबा वाङ्मयाची ती कायमचीच..
मग हळुहळु स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, प्रेरक पत्रांश, विचार पोथी, मधुकर, अष्टादशी या सगळ्या ग्रंथसंपदेनं काबीजच केलं अंतःकरण.
आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? हा विचार मनात आला. माहित असेलेल एक उत्तर – गणपतीला प्रिय म्हणून दुर्वा गणपतीला वाहिली जाते. पण माणूस स्वार्थी आहे स्वार्थ असल्या शिवाय तो कुणालाही काही ही वाहणार नाही. इंटरनेट वर बसून दुर्वाचे महत्व शोधू लागलो. सहजच यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक वाचण्यात आला.
काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि.
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च.
(यजुर्वेद १३.२०)
[ऋषी : अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]
हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर.
पुत्र स्वामींचे
आम्ही पुत्र स्वामींचे
अक्कलकोट वासीचे
आम्हा जन्म मृत्यूचे
भय नाही
धन्य आमुचा जन्म
झाले जन्माचे कल्याण
दृढ धरिता चरण
स्वामींचे
तुटली अवघी बंधन
संसार जाहला खेळण
जाता स्वामींस शरण
संपूर्ण
गेली मनाची तळमळ
सरली बुद्धीची खळखळ
शांती भोगतो निखळ
स्वरूपी
सुख दाटले आत
मावता मावेना मनात
मित्रां सांगतो हि मात
म्हणोनी
मज भेटले काही
वाटे भेटो तुम्हाही
विश्व ओसंडून वाही
कृपा त्यांची
नमस्कार,
आजच युट्युब वर संत मुक्ताबाईंचा हा अभंग ऐकला
http://www.youtube.com/watch?v=0qdUa1qBhBM
मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||
थोर नवलाव झाला | वांझे पुत्र प्रसवला ||
विंचु पाताळासी जाय | शेष माथा वंदी पाय ||
माशी व्याली घार झाली | देखोनी मुक्ताई हासली ||
नेटवर शोधल्यावर असा अर्थ मिळाला:
मुंगी हे सुक्ष्म जीवात्म्याचे रुप..ती परमात्म्याशी एकरुप झाली असता सहज सुर्यालाही पोटात घेउ शकते..
या आत्मसाक्षात्काराच्या अनुभवातुन पुर्णपणे गेल्यावर मुक्ताई स्वानंदाने हासते.
इथल्या इतर कोणी आणखी अर्थ विषद करुन सांगितल्यास आवडेल.
जगताना मी जीवनातलाआनंद जगुन घ्यावेहसतं जगावे जीवन सारेदुःख न समजु यावे
खंत नसावी कशाची मजरहीले काय असावेनिभावली सारी नाती गोतीउरले काय असावे
मरताना मज चेहे-यावरचेदुःख न कोणा दिसावेत्रुप्त दिसावे जातान आनकोनास न काही उमजावे
प्रत्येकाचे वेगवेगळे विश्व. विश्व नेमके कोणते हाच प्रश्न पडावा इतके भिन्न भिन्न विश्व. कुणाला संगीताची आवड. तर त्याला जिकडे तिकडे सुरांच्या मैफिली दिसतात. तर कुणी, ‘राजकारण’ पाहून त्यात रमलेले. प्रत्येकाला, आपआपल्या विश्वात आणि त्यात असणाऱ्या/जाणवणाऱ्या गोष्टींचे अप्रुफ. आणि प्रत्येकाला त्या विश्वातून डोके काढून बाहेर पाहायला वेळच नाही
ज्ञानेश्वरी. मराठी साहित्यातला सर्वोच्च मानदंड! अगदी आबालवृद्धांना माहित असलेली त्यातील असंख्य उद्धरणे, साहित्यात परत परत वापरले गेलेले त्यातले दृष्टांत, त्यातलं पसायदान, लहानपणी डोळ्यात पाणी आणून ऐकलेली ज्ञानेश्वरांची आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट आणि शाळेत-कॉलेजमधे अभ्यासाच्या पुस्तकात उल्लेखलेली ज्ञानेश्वरीच्या रचनेने केलेली सामाजिक क्रांती. फारतर आळंदीला जाऊन समाधीचे आणि नेवाशाला जाऊन घेतलेले पैसाच्या खांबाचे दर्शन आणि त्याने मनात उठलेले अननूभूत भावतरंग. आपल्या सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर-ज्ञानेश्वरीबद्दल असलेल्या माहितीचा हा ढोबळमानाने लसावि!