पुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....
आचार्य विनोबांच्या साहित्याची ओळख झाली साधारणतः १९८१च्या सुमारास. त्याआधी आम्ही सगळे मित्र त्यांची टवाळकीच करायचो. पण एका मित्राला "गीता प्रवचने" पुस्तक मिळाले आणि त्याने पहिले स्फुल्लिंग पेटवले - अरे, कस्लं भारी पुस्तके हे....
झालं - त्या एका पुस्तकानेच जी मोहिनी पडली विनोबा वाङ्मयाची ती कायमचीच..
मग हळुहळु स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, प्रेरक पत्रांश, विचार पोथी, मधुकर, अष्टादशी या सगळ्या ग्रंथसंपदेनं काबीजच केलं अंतःकरण.
आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? हा विचार मनात आला. माहित असेलेल एक उत्तर – गणपतीला प्रिय म्हणून दुर्वा गणपतीला वाहिली जाते. पण माणूस स्वार्थी आहे स्वार्थ असल्या शिवाय तो कुणालाही काही ही वाहणार नाही. इंटरनेट वर बसून दुर्वाचे महत्व शोधू लागलो. सहजच यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक वाचण्यात आला.
काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि.
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च.
(यजुर्वेद १३.२०)
[ऋषी : अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]
हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर.
पुत्र स्वामींचे
आम्ही पुत्र स्वामींचे
अक्कलकोट वासीचे
आम्हा जन्म मृत्यूचे
भय नाही
धन्य आमुचा जन्म
झाले जन्माचे कल्याण
दृढ धरिता चरण
स्वामींचे
तुटली अवघी बंधन
संसार जाहला खेळण
जाता स्वामींस शरण
संपूर्ण
गेली मनाची तळमळ
सरली बुद्धीची खळखळ
शांती भोगतो निखळ
स्वरूपी
सुख दाटले आत
मावता मावेना मनात
मित्रां सांगतो हि मात
म्हणोनी
मज भेटले काही
वाटे भेटो तुम्हाही
विश्व ओसंडून वाही
कृपा त्यांची
नमस्कार,
आजच युट्युब वर संत मुक्ताबाईंचा हा अभंग ऐकला
http://www.youtube.com/watch?v=0qdUa1qBhBM
मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||
थोर नवलाव झाला | वांझे पुत्र प्रसवला ||
विंचु पाताळासी जाय | शेष माथा वंदी पाय ||
माशी व्याली घार झाली | देखोनी मुक्ताई हासली ||
नेटवर शोधल्यावर असा अर्थ मिळाला:
मुंगी हे सुक्ष्म जीवात्म्याचे रुप..ती परमात्म्याशी एकरुप झाली असता सहज सुर्यालाही पोटात घेउ शकते..
या आत्मसाक्षात्काराच्या अनुभवातुन पुर्णपणे गेल्यावर मुक्ताई स्वानंदाने हासते.
इथल्या इतर कोणी आणखी अर्थ विषद करुन सांगितल्यास आवडेल.
जगताना मी जीवनातलाआनंद जगुन घ्यावेहसतं जगावे जीवन सारेदुःख न समजु यावे
खंत नसावी कशाची मजरहीले काय असावेनिभावली सारी नाती गोतीउरले काय असावे
मरताना मज चेहे-यावरचेदुःख न कोणा दिसावेत्रुप्त दिसावे जातान आनकोनास न काही उमजावे
प्रत्येकाचे वेगवेगळे विश्व. विश्व नेमके कोणते हाच प्रश्न पडावा इतके भिन्न भिन्न विश्व. कुणाला संगीताची आवड. तर त्याला जिकडे तिकडे सुरांच्या मैफिली दिसतात. तर कुणी, ‘राजकारण’ पाहून त्यात रमलेले. प्रत्येकाला, आपआपल्या विश्वात आणि त्यात असणाऱ्या/जाणवणाऱ्या गोष्टींचे अप्रुफ. आणि प्रत्येकाला त्या विश्वातून डोके काढून बाहेर पाहायला वेळच नाही
दिवालि अन्कात लेख कसा पाथवावा या विशई माहिति हवि आहे.मला ज्योतिश विशयावर लेख पाथवायचा आहे, सध्या भारतात मि नाहि त्यामुले मदत हवि आहे....
ज्ञानेश्वरी. मराठी साहित्यातला सर्वोच्च मानदंड! अगदी आबालवृद्धांना माहित असलेली त्यातील असंख्य उद्धरणे, साहित्यात परत परत वापरले गेलेले त्यातले दृष्टांत, त्यातलं पसायदान, लहानपणी डोळ्यात पाणी आणून ऐकलेली ज्ञानेश्वरांची आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट आणि शाळेत-कॉलेजमधे अभ्यासाच्या पुस्तकात उल्लेखलेली ज्ञानेश्वरीच्या रचनेने केलेली सामाजिक क्रांती. फारतर आळंदीला जाऊन समाधीचे आणि नेवाशाला जाऊन घेतलेले पैसाच्या खांबाचे दर्शन आणि त्याने मनात उठलेले अननूभूत भावतरंग. आपल्या सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर-ज्ञानेश्वरीबद्दल असलेल्या माहितीचा हा ढोबळमानाने लसावि!
दैनिक तंटा हे एकेकाळचे अतिशय नावाजलेले अनियतकालिक आजच्या या अंकाने पुन्हा सुरू होत आहे.

मध्यंतरी माझ्या एका मित्राकडे त्याची आत्या आणि आतेबहीण काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या दोघीही शास्त्रीय गायन शिकतात आणि त्या संदर्भात श्री. विकास कशाळकर यांच्याकडे त्यांचे काही काम होते. या मित्राशी शास्त्रीय संगीताबद्दल बर्याचवेळा बोलणे होते त्यामुळे त्याने त्याच्या आत्याच्या रियाजाबद्दल बोलता बोलता माहिती दिली. रियाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दोघीही 'कालिदासविरचित श्यामलादण्डकम्' नावाचं स्तोत्र म्हणतात असे त्याने सांगितले.
नीती नियती आणि न्याय
माझ्या यापूर्वीच्या लेखनावरील प्रतीक्रीयावरून मायबोली कर अत्यंत सजग आणि संवेदनशील आहेत असे जाणवले ,यास्तव सर्वांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा मानस आहे .
न्याय ,नीती , धर्म या संकल्पना आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो? हिंसा ही प्रत्यक्ष घडल्यावरच होते की मानसिक हिंसा ही सुद्धा हिंसाच मानांवी?
BLACK MAGIC- FOR THOSE WHO BELIEVE ,NO PROOF IS NECESSARY ,AND FOR THOSE WHO DON’T BELIEVE, NO PROOF IS ENOUGH !
संदर्भ- http://vedicwisdom.com/blackmagic/spirit_world.php