धार्मिक-साहित्य

BLACK MAGIC- नीती नियती आणि न्याय

Submitted by RISHIKESH BARVE on 10 April, 2012 - 01:55

नीती नियती आणि न्याय

माझ्या यापूर्वीच्या लेखनावरील प्रतीक्रीयावरून मायबोली कर अत्यंत सजग आणि संवेदनशील आहेत असे जाणवले ,यास्तव सर्वांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा मानस आहे .

न्याय ,नीती , धर्म या संकल्पना आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो? हिंसा ही प्रत्यक्ष घडल्यावरच होते की मानसिक हिंसा ही सुद्धा हिंसाच मानांवी?

BLACK MAGIC- FOR THOSE WHO BELIEVE ,NO PROOF IS NECESSARY ,AND FOR THOSE WHO DON’T BELIEVE, NO PROOF IS ENOUGH !
संदर्भ- http://vedicwisdom.com/blackmagic/spirit_world.php

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला

Submitted by मीरा जोशी on 7 April, 2012 - 06:21

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला

चौदा विद्या: चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र
वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद

सहा वेदांगे: १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या. ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र. ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान. ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.

प्रांत/गाव: 

पंच महाभुत व हिंदू धारणा

Submitted by विवेक नाईक on 11 December, 2011 - 06:24

पंच महाभुत,

आपण पंचमहाभुतां बद्द्ल ऐकतो की सर्व सजिव व नि र्जिवांचे अधिष्ठान ही पंचमहाभुत आहेत.
ह्या विषयाला ईतके पदर आहेत की एकच पदर उलगडत न्यायलाच आयुष्य पुरणार नाही.
हस्तमुद्रा ही भारताची खुप प्राचिन व सर्वात महत्वाची देणगी आहे व ह्या हस्तमुद्रा ही पंचमहाभुता वर आधारीत असतात.

आज आपण पंच महाभुताचे हाताच्या बोटातील आधिष्ठान बघू !
हाताच्या पाच बोटा पैकी प्रत्येक बोटाला एका पंच महाभुताचे आधिष्ठान असते.
उदा. हाताचा आंगठा म्हणजे अग्नी महाभुत, प्रथमा म्हणजे वायु.

दहा पारमिता

Submitted by rkjumle on 10 October, 2011 - 03:14

स्थविरवादामध्ये पारमितेला ‘पारमि’ असे संबोधले आहे. पूर्णत्व अथवा पूर्णत: असा त्याचा अर्थ होतो. पारमिता हा पाली शब्द आहे. ‘पारम’ म्हणजे दुसरा किनारा व ‘मिता’ म्हणजे जाणे, म्हणजेच दुसर्‍या किनार्‍याला जाणे असा त्याचा अर्थ होतो. मुशल कर्माच्या सहाय्याने दुसर्‍या किनार्‍यावर जाणे म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामधून विमुक्त होऊन निब्बाण अर्थात निर्वाण अवस्थेला पोहचणे होय.

शब्दखुणा: 

सीमोल्लंघन

Submitted by न.ना.गोखले on 30 September, 2011 - 21:31

|| श्री गुरुदेव ||
एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत येणे, वृत्ती अंतर्मुख होऊन चैतन्यमय होणे हा दसरा.
- प.पू.दासराम महाराज केळकर.

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

Submitted by जागोमोहनप्यारे on 26 September, 2011 - 10:18

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे

Submitted by जागोमोहनप्यारे on 24 September, 2011 - 06:44

रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे ( घरात वाचू नये) असे म्हणतात ते खरे आहे का?

आरण्यकही घरात वाचू नये असे म्हणतात.

महाभारत घरात वाचायचे नसते हे खरे असेल तर मग गीताही घरात वाचता येणार नाही ना? Happy

सम्यक मार्गाचे विवेचन

Submitted by rkjumle on 21 September, 2011 - 07:57

भगवान बुध्द बोधगयेला चार आठवडे ध्यानमग्न चिंतन करीत असतांना त्यांना ज्ञान प्राप्ती झाली त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्स्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्स्या आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्स्या.
त्यानंतर भगवान बुध्द त्यांना सोडून गेलेल्या पाच परिव्राजकांना धम्मोपदेश करण्याकरीता सारनाथ येथील इषिपतनच्या मृगदायवनात आले. त्या पाच परिव्राजकांसमोर भगवान बुध्दाने पहिले प्रवचन दिले. त्याला ’धम्मचक्क पवत्तन सु्त्त’ असे म्हणतात.

गणेशोत्सवानिमित्ते पोस्टर- मंत्रवत आरत्यांची परवड थांबवा

Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 02:09

कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र

Submitted by जागोमोहनप्यारे on 29 May, 2011 - 02:59

महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य