लेख

मीरचा पर्यायी शेर

Submitted by समीर चव्हाण on 28 April, 2013 - 03:02

मायबोलीवरील गझल विभागात पर्यायी शेर आणि त्याला धरून चाललेले वाद-विवाद चांगलेच चर्चेला येत आहेत.
काही वर्षांपूर्वी समीक्षक रामनाथ सुमन ह्यांचा मीर हा समीक्षात्मक ग्रंथ वाचनात आला. त्यात मीरच्या जीवन आणि साहित्यप्रवास संबंधित अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यात मीरने दुस-यांच्या शेरांचे केलेले संशोधन सुध्दा दिले आहे. मीर बहुधा आपल्या आत्मकथेत अतिशय नम्रपणे म्हणतो की अमकातमका शेर मी लिहिला असता तर असा लिहिला असता. मीरने संशोधन केलेला एकच शेर इथे देत आहे. इस्लाह देणे चांगले की वाईट हा चर्चेचा मुद्दा ठरावा.

मूळ शेर आहे सज्जाद अकबराबादीचा:

हिज्र-ए-शीरी में क्योंकि काटेगा

विषय: 
शब्दखुणा: 

स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

मौज गणेशोत्सवाची ! - जागू

Submitted by संयोजक on 28 September, 2012 - 02:35

वळणदार सोंड, मोठाले सुपासारखे कान, बोलके आणि हसरे डोळे, चार हात आणि त्या हातात असणार्‍या वस्तू, मुकुट, पितांबराचा आकर्षक रंग, पुढ्यात बसलेले पिटुकले उंदीरमामा, कलाकुसर केलेली मखर अशा वैविध्यतेमुळे अगदी बालपणापासूनच बाप्पा आवडीचे. तशी काही माझी चित्रकला छान नव्हती पण चित्र काढायची समज आली तेव्हा बाप्पाचे खूप वेळा चित्र रेखाटले असेल. मला त्याची वेगवेगळी रूपं काढायला आवडायची. विशेष भर दिला जायचा कान, सोंड आणि मुकूटावर. गणपतीच्या दिवसांत येणार्‍या अंकातील, वर्तमान पत्रातील गणपतीचे फोटो पाहून तसे चित्र काढण्याचे प्रयत्न करायचे. मला वाटतं माझ्यासारखे बालपणी सगळ्यांनाच असे वाटत असावे.

विषय: 

काही गोड तर काही कडू...

Submitted by मोहना on 10 September, 2012 - 08:07

"आय एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,

शब्दखुणा: 

मुंजीचा कानमंत्र

Submitted by SuhasPhanse on 10 June, 2012 - 04:37

मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.
मुंजीचा कानमंत्र
काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।
प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥
हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।
नियोजिलेले काम बुद्धीने हात पाय करतात ॥
बुद्धी असता लुळे पांगळे मात करी व्यंगा ।
अंध सुरदासाची रचना सदा मना सांगा ॥
आळविता का जेव्हां तेव्हां, देव कुठे आहे?।
ओळखिले नाही का तुमच्या देव मनामधी आहे ॥
आळविण्याचा अर्थ असे की मला निग्रही बनवा ।

गुलमोहर: 

एकटेपणा व स्वातंत्र्य

Submitted by SuhasPhanse on 2 June, 2012 - 03:49

एकटेपणा व स्वातंत्र्य
स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे.

गुलमोहर: 

एक होता रोमेल

Submitted by निशदे on 7 May, 2012 - 23:45

====================================================================
आपल्यासमोर एक अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान शत्रू आहे आणि युद्ध बाजूला ठेवून मी म्हणेन की तो एक अत्यंत शूर सेनापतीही आहे.
-विन्स्टन चर्चिल (ब्रिटिश पार्लमेंटसमोर)

====================================================================

गुलमोहर: 

सत्यमेव जयते

Submitted by SuhasPhanse on 3 May, 2012 - 23:55

सत्यमेव जयते
भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. सत्य हे नाम आहे आणि जयचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे.
सत्य म्हणजे काय? सत्य भूतकाळात असतं कारण ’एखादी घटना घडली’, हे सत्य ती घटना घडल्यावरच अस्तित्वात येते.
वर्तमानात सत्य घडत असतं. सत्याचा भविष्यकाळाशी काही संबंध नसतो कारण जे घडलंच नाही ते सत्य कसे काय असू शकते?

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख