नुकतेच एका सुंदर टेड टॉकचे मराठीत भाषांतर केले. मूळ टॉक इतका सुरेख आहे की भाषांतर करताना कुठेही अडखळायला झालं नाही आणि आपल्या मराठी भाषेची गोडी आणि समृद्धी दोन्ही जाणवली. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीचे/अभिव्यक्तीचे एक परिमाण हेही असते की ती कलाकृती इतरांना प्रेरणा देते. आणि ह्या भाषांतरादरम्यान असेच झाले. ह्या टॉकशी संबंधित जे अनेक नवे विचार/पैलू डोक्यात येत राहिले ते कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न. ह्या टॉकचे निरुपण/रसग्रहणच म्हणा ना. अर्थात मूळ टॉक ऐकून हा लेख वाचला तर तो अधिक भावेल पण स्वतंत्रपणे लेख म्हणून लिहिण्याचादेखील प्रयत्न केला आहे.
खडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...
(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)
हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय?
या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.
http://www.maayboli.com/node/48375
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा या वेळीही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाचे वर्ष स्पर्धेचे 5 वे वर्ष होते. यावर्षी प्रेम या विषयावर आधारीत कविता पाठवून महाराष्ट्रातील 104 कवी-कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व कवींनी पाठविलेल्या कवितांच्या काव्यलेखनाचे परीक्षण गझलकार श्री. दिपक करंदीकर, कवयित्री सौ. रश्मी तुळजापूरकर यांनी केले. त्यातील निवडक 22 कवींनी दिनांक 30 मार्च 2014 रोजी झालेल्या अंतिम फेरीत सहभाग घेतला. काव्यसादरीकरणाचे मुख्य परीक्षण कवयित्री श्रीमती जयश्री घुले आणि कवी श्री. सारंग भणगे यांनी केले.