धडा पहिला:
एकदा एक कुक्कुटपालन केंद्र असतं. तिथे दोन कोंबड्या एकमेकींशी बोलत असतात.
पहिली कोंबडी: काय ग तुझं हल्ली कामात लक्ष नसतं हं. किती छोटी अंडी देतेस. कोणी चार रुपयाला पण विकत नाही घेणार. माझी अंडी बघ. साडेचार रुपयाला सहज विकली जातात.
दुसरी कोंबडी: (एखाद्या बाईसारखा मानेला हलकेच झटका देऊन) जाउदे ग. आठ आण्यांसाठी एवढा जास्त बोचा ताणायला कोणी सांगितलंय.
हाँगकाँगमधील मायबोलीकर
हाँगकाँगमध्ये कुणी मायबोलीकर आहेत का? तिथे आरोग्य व्यवस्था कशी आहे? डॉक्टरला किती पगार मिळतो ? जीवनमान कसे असते?
"अरे तुझ्यासारख्या विद्यार्थ्याचा हा विषय नाही" हे वाक्य प्रोफेसर महाशय इंग्रजीत म्हणाले आणि निराश व्हायला तयार असलेला मी त्यांच्या केबीनमधुन बाहेर पडलो. पीएचडीसाठी गाईड मिळणं दुरापस्त झालं होतं. बाकी सर्वांना गाईड मिळाले होते. माझ्या बाबतीत माझी अवस्था मीच अवघड करुन ठेवली होती. मला ज्या विषयात संशोधन करायचं होतं तो विषय बदलण्याची तर सोडाच पण त्यात कसलीच तडजोड करण्याची इच्छा नव्हती. इथे तर गाईडच आपल्या आवडीची विषय सुचवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आधी एकदा अतिशय नावजलेल्या प्रोफेसरच्या हाताखाली काम करायला मिळावे म्हणुन आवडत्या विषयाला काहीशी मुरड घालण्याचा गाढवपणा हातुन घडला होता.
आजकाल इंग्रजी भाषा आवश्यक झाली आहे. आपल्याला आवडो वा नावडो, कधीतरी कुठेतरी असं वाटुनच जातं की आता इंग्रजीवरही प्रभुत्व हवच. आपापल्या क्षेत्रांत आवश्यक असणारे संभाषण, प्रेझेंटेशन्स वगैरे फारशी जड जात नाही. ती सवयीने जमायला लागतात, पण आपल्या क्षेत्राच्या बाहेर विचार करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे फारसं जमत नाही. असं नाही की इंग्रजी बोलताच येत नाही, पण वेळेवर नेमके शब्द आठवत नाही किंवा काय बोलावं, ते सुचत नाही. कित्येकदा इतर लोकं धडाधड सिडने शेल्डॉन {माझ्या काळातली} वगैरे कादंबरी लेखकांची नावे घेतात, तेंव्हा वाटते की अरे, आपण काहीच वाचत नाही की काय?
ओनामा
शेवटी एकदाची आमची दुक्कल मुक्कामाच्या ठिकाणी पोचली. मी आणि माझी सखी. काम माझं. ती सोबतीला. कारण माझ्यापेक्षा ती अनुभवी म्हणून. सकाळी पाचची एस्टी पकडलेली. झोप काढावी असं खरंतर डोक्यात होतं पण दोघींच्या धावपळीच्या वेळापत्रकातून बरेच महिन्यांनी निवांत मोकळा वेळ मिळालेला तेव्हा प्रवासभर अखंड टकळी सुरू होती - इतके दिवसांच्या साठलेल्या गप्पा, गॉसिप, पुस्तकं अन् काय. शिवाय माझ्यासाठी सगळ्यात मोठ्ठी एक्साइटमेन्ट म्हणजे माझ्या संशोधनाच्या फील्डवर्कचा ओनामा.
सिरींजमध्ये दडलेला मृत्यू!
26 डिसेंबर 2004:
विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.
१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
डॉ. थालमान यांनी केला संजीवनी-विद्येचा प्रयोग !
एखाद्या उत्तुंग इमारतीवरून पडत असलेल्या मुलीला झुपकन येवून पडतापडता अलगदपणे झेलून सुखरूपपणे जमिनीवर आणून सोडणारा 'सुपरमॅन' अथवा 'शक्तिमान' आपण आपल्या मुलांसोबत टी व्ही वर पाहून नक्कीच टाळ्या वाजवल्या असतील. पण एखाद्या हिमतळयात बुडून लौकिक अर्थाने अर्धा तासभर मेलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीला पुन्हा जीवित करण्याचा 'संजीवनी विद्या प्रयोग' केला होता एका सुपर-डॉक्टरने !
१८१८ साली मराठेशाहीचा अंत झाला आणि टोपीकराचा अंमल दख्खनदेशी सुरू झाला. या भूमीवर राज्य करायचे तर इथले लोक, ही भूमी, इथली समाजव्यवस्था समजून घेतली पाहिजे हे उघड होतं. नव्याने आर्थिक घडी बसवायची तर जमीन मोजणीपासून आणि नव्याने करपद्धती घालून देण्यापासून सुरूवात करणं नवीन राज्यकर्त्यांच्या दृष्टीने आवश्यक होतं. राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा हा या शेतसार्यापासून आणि जमीनविषयक इतर करांमधून येणार असल्याने साहाजिकच इथली ग्रामीण अर्थव्यवस्था ब्रिटिशांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय बनली. भारतात इतरत्रही हेच होत होतं.